शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कणकवलीतील उध्वस्त व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी नियोजन सुरु : समीर नलावडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 12:13 IST

मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात शंभर टक्के उध्वस्त होणाऱ्या तसेच फळ, फूल , भाजी विक्रेत्यांबरोबरच इतर व्यापाऱ्याचे पुनर्वसन करण्यासाठी आमचे नियोजन सुरु आहे. डी.पी. रोड जवळ नगरपंचायतीचे आरक्षण विकासक विकसित करीत आहे. या ठिकाणी दूकान गाळे तसेच कट्टे बांधण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकणकवलीतील उध्वस्त व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी नियोजन सुरु : समीर नलावडे दूकान गाळे तसेच कट्टे बांधण्यात येणार

कणकवली : मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात शंभर टक्के उध्वस्त होणाऱ्या तसेच फळ, फूल , भाजी विक्रेत्यांबरोबरच इतर व्यापाऱ्याचे पुनर्वसन करण्यासाठी आमचे नियोजन सुरु आहे. डी.पी. रोड जवळ नगरपंचायतीचे आरक्षण विकासक विकसित करीत आहे. या ठिकाणी दूकान गाळे तसेच कट्टे बांधण्यात येणार असून त्याठिकाणी संबधित व्यापारी तसेच विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बांधकाम सभापती अभिजीत मुसळे उपस्थित होते.समीर नलावडे पुढे म्हणाले, कणकवली शहरातील व्यापारी, रिक्षा व्यावसायिक , झाडे अशा अनेक गोष्टी महामार्ग चौपदरीकरणात बाधित होत आहेत. त्यामुळे याबाबत राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्याबरोबर मुख्याधिकारी , नगरसेवक यांची आम्ही बैठक घेतली होती. या बैठकी दरम्यान विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली . आमचे म्हणणे आम्ही मांडले.त्यामध्ये कणकवली शहरातील जेवढी झाडे तोडली जातील त्याच्या दुप्पट झाडे लावली जाणार आहेत. त्यासाठी जागा नगरपंचायत उपलब्ध करून देणार आहे. नगरपंचायतीच्या मालकीचे विजेचे खांब काढून महामार्ग प्राधिकरणने ठेकेदाराच्या माध्यमातून आमच्या ताब्यात दिले आहेत. महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर पुन्हा विजेचे खांब ते उभारून देणार आहेत.शहरात फ्लाय ओव्हर झाल्यावर सुमारे 500 मीटर अंतरावर एक अशी शहरात स्वच्छता गृहे बांधून देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. पदपथांबरोबरच महामार्गाच्या दुतर्फा गटारे बांधली जाणार असल्याने शहरातील सांडपाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे.डी.पी. रोड जवळील आरक्षण विकसित झाल्यावर नगरपंचायत नियमाला अधीन राहून तेथील गाळ्यात व्यापारी, विक्रेते तसेच इतर व्यावसायिक यांचे पुनर्वसन नगरपंचायत करणार आहे. कोणतीही वशीले बाजी न करता सर्वाना समान न्याय दिला जाईल.इतरत्र महामार्ग चौपदरीकरणाचे काम जोरदार सूरू असताना आमदार नीतेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे निदान एक वर्ष तरी कणकवलीतील व्यापाऱ्याना व्यवसाय करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो.महामार्गाच्या 45 मीटर अंतराच्या निसबाहेर 6 मीटर अंतर सोडून नवीन बांधकाम करायला परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी रिक्षा स्टॅण्ड उभरण्याबाबत आमचे नियोजन सुरू आहे. तसेच व्यापारी , नगरसेवक , मुख्याधिकारी यांची एकत्र बैठक घेऊन नवीन बांधकामा बाबत निर्णय घेण्यात येईल.शहरातील व्यापारी, हॉकर्स, भाजी विक्रेते यांची यादी बनविण्यात आली आहे. सद्य स्थितीत भाजी विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. हर्णे आळी तसेच अन्य ठिकाणी जागा मालकांबरोबर बोलणी सुरु आहेत.भेळ तसेच इतर खाद्य पदार्थ विक्रेते यांना त्यांच्या गाड्या लावण्यासाठी जानवली नदिवरील गणपती साना येथील रस्त्याच्या दुतर्फा जागा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याठिकाणी खाऊ गल्ली उभारण्याचा आमचा विचार आहे. असेही समीर नलावडे यावेळी म्हणाले....तर व्यापारी वाचले असते!कणकवली शहरातील व्यापारी तसेच झाडांचा पुळका काही सत्ताधाऱ्याना आता आला आहे. पूर्ण क्षमतेने यापूर्वीच त्यांनी प्रयत्न केले असते तर उध्वस्त होण्यापासून व्यापारी निश्चितच वाचले असते. झाडेही नष्ट झाली नसती. मात्र, महामार्गाचे सत्तर टक्के काम पूर्ण झाल्यानंतर या सत्ताधाऱ्याना आता जाग आली आहे. अशी टिका समीर नलावडे यांनी यावेळी केली.

टॅग्स :Marketबाजारsindhudurgसिंधुदुर्ग