शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

सिंधुदुर्ग : महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतून पुढची पिढी समृद्ध होईल : अतुल रावराणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 16:37 IST

राज्य सरकार कोकणाकडे विकासाच्या दृष्टीकोनातून पहात असल्यामुळेच अर्थसंकल्पात उद्योग, पर्यटन, बंदरविकास, किल्ले संवर्धन व शेतीसाठी भरीव तरतूद केली आहे. त्यातून भाजपच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळून कोकणातील पुढची पिढी समृद्ध झालेली पहायला मिळेल, असा आशावाद भाजप नेते अतुल रावराणे यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ठळक मुद्देमहत्त्वाकांक्षी प्रकल्पांतून पुढची पिढी समृद्ध होईल : अतुल रावराणेअर्थसंकल्पात भरीव तरतूदकोकणच्या विकासाबाबत भाजप सरकार सकारात्मक

वैभववाडी : राज्य सरकार कोकणाकडे विकासाच्या दृष्टीकोनातून पहात असल्यामुळेच अर्थसंकल्पात उद्योग, पर्यटन, बंदरविकास, किल्ले संवर्धन व शेतीसाठी भरीव तरतूद केली आहे. त्यातून भाजपच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळून कोकणातील पुढची पिढी समृद्ध झालेली पहायला मिळेल, असा आशावाद भाजप नेते अतुल रावराणे यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात रावराणे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सज्जन रावराणे, बंडू मुंडल्ये, सभापती लक्ष्मण रावराणे, कणकवली तालुकाध्यक्ष संदेश सावंत, सुनील नारकर, धुळाजी काळे उपस्थित होते.रावराणे पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग किल्ला आणि पर्यटन ही जिल्ह्याची खरी ओळख आहे. त्यामुळे किल्ल्याच्या रुपाने ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी १० कोटी, इको-टुरिझमसाठी १२० कोटी, खारबंधाऱ्यांसाठी ६० कोटी, कार्यालयात उद्योगासाठी १० कोटी रुपये तसेच गोरगरीब रुग्णांसाठी ६० कोटींच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाला २० कोटी रुपये अशी भरीव तरतूद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. त्यामध्ये संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण यांचेही मोठे योगदान आहे.

पंतप्रधानांनी कोकणचे सुपुत्र केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे हवाई उड्डाण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविल्यामुळे चिपी विमानतळाचे लांबलेले काम नजीकच्या काळात पूर्णत्वास जाऊन जिल्ह्यात लवकरच विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे.ते पुढे म्हणाले की, कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी नाणारचा रिफायनरी प्रकल्प, बंदरजेटी, महामार्ग चौपदरीकरण हे भाजपने महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणले आहेत. ते निश्चितपणे पूर्णत्वास जातील. त्यातून कोकणातील पुढची पिढी समृद्ध झालेली पहायला मिळेल. त्यामुळे एनडीएची ध्येयधोरणे, आणि भाजपचा विकासाचा दृष्टीकोन मित्रपक्षांनी समजून घेऊन विकासाला सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन शिवसेना आणि स्वाभिमान पक्षाला उद्देशून रावराणे यांनी केले.अखेर स्वाभिमानचे रोंबाट इच्छितस्थळी पोचलेकाँग्रेसमध्ये असताना गेल्यावर्षीच्या शिमग्यात नारायण राणे यांनी सुरू केलेले रोंबाट अखेर वर्षभराने इच्छितस्थळी पोचले आहे. कोकणच्या हितासाठी राणेंनी शिवसेना सोडली. कोकण विकासासाठी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वाभिमान पक्ष स्थापन करून एनडीएत सामील होत राज्यसभेची आॅफर स्वीकारली. तेथे त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग होईल. त्यांनी राज्यसभेत राहून महाराष्ट्राला मार्गदर्शन करावे, आम्ही ते घेऊ, अशी कोपरखळी रावराणे यांनी मारली.शिवसेना आणि स्वाभिमान पक्ष हे दोन्ही एनडीएचे मित्रपक्ष आहेत. त्यामुळे कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप कोणासोबत युती करणार? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता, शिवसेना आणि स्वाभिमान पक्षाने स्वबळावर लढण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपही स्वबळावर लढण्यासाठी सज्ज आहे. भाजपचे संपर्कमंत्री १५ रोजी जिल्ह्याच्या कोअर कमिटीसोबत चर्चा करुन अंतिम निर्णय घेतील. ते घेतील तो निर्णय आम्हांला मान्य असेल, असे अतुल रावराणे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBudgetअर्थसंकल्प