शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

सिंधुदुर्ग : राष्ट्रीय आरोग्य अभियान : मोर्चाची शासनाकडून दखल न घेतल्याने निर्णय, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 3:31 PM

आपल्या विविध न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी बुधवारी जिल्हाधिकारी भवनावर काढलेल्या भव्य मोर्चाची शासनाकडून गंभीर दखल घेतली गेली नाही. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी शुक्रवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग : राष्ट्रीय आरोग्य अभियान मोर्चाची शासनाकडून दखल न घेतल्याने निर्णय कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी : आपल्या विविध न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी बुधवारी जिल्हाधिकारी भवनावर काढलेल्या भव्य मोर्चाची शासनाकडून गंभीर दखल घेतली गेली नाही. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी शुक्रवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.शासन सेवेत विनाशर्त समायोजन करणे, कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण लागू करणे यासह अन्य विविध न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी बुधवारी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने जिल्हाधिकारी भवनावर शेकडोंच्या संख्येने मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

मागण्या मान्य नाही झाल्या तर १३ एप्रिलपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा या संघटनेने दिला होता. मात्र, शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने शुक्रवारपासून या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, या आंदोलनकर्त्यांना आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य जान्हवी सावंत यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.

राज्यात २००५ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू झाले. जिल्ह्यात या अभियानातंर्गत ४५६ अधिकारी व कर्मचारी आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी या अभियानाचा मोठा सहभाग आहे. यातील सर्व कर्मचारी हे कंत्राटी स्वरूपाचे असून नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच पूर्ण वेळ काम करत आहेत. मिळालेल्या अल्प मोबदल्यात शासनाने दिलेल्या सर्व कामकाजांची पूर्तता करत आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याने १० ते १२ वर्षे सेवा बजावली आहे.

एवढा कालखंड या सेवेत घालवल्यानंतर प्रत्येक वर्षी प्रतिनियुक्ती प्रक्रियेमध्ये काही अन्यायकारक बदल करण्यात येत आहेत. एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्यादृष्टीने सरकारने एक समिती नियुक्त केली आहे.

या समितीने तीन महिन्यांत याबाबत शासनास अहवाल सादर करणे आवश्यक होते. परंतु आश्वासनाशिवाय कोणतीही कार्यवाही झाली नाही. मात्र, या समितीचा निर्णय येण्यापूर्वीच शासन नवीन भरती प्रक्रिया राबवून पुनर्नियुक्तीमध्ये जाचक अटींद्वारे अनुभवी प्रशिक्षित कर्मचाºयांवर अन्याय करणार आहे.या प्रमुख मागण्यांसाठी कामबंदएनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना विनाअट शासनसेवेत सामावून घ्यावे, अभियानातील अनुभवी व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना शासनाच्या सरळ सेवा भरतीत प्राधान्य द्यावे व वयाची अट शिथिल करावी, कामावर आधारित गुण पध्दत रद्द करावी, समान काम, समान वेतन कायदा लागू करावा, आरोग्याचे खाजगीकरण करण्यात येऊ नये, अभियानातील महिला कर्मचाऱ्यांना गरोदर व प्रसुती कालावधीची १८० दिवसांची भर पगारी रजा मिळावी, जिल्ह्याअंतर्गत बदली प्रस्तावाला मान्यता द्यावी, आशा व गटप्रवर्तक यांना किमान वेतन देण्यात यावे, विमा संरक्षण मिळावे, प्रवास व मोबाईल भत्ता मिळावा. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhospitalहॉस्पिटलGovernmentसरकार