शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

सिंधुदुर्ग : राष्ट्रीय आरोग्य अभियान : मोर्चाची शासनाकडून दखल न घेतल्याने निर्णय, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 15:31 IST

आपल्या विविध न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी बुधवारी जिल्हाधिकारी भवनावर काढलेल्या भव्य मोर्चाची शासनाकडून गंभीर दखल घेतली गेली नाही. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी शुक्रवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग : राष्ट्रीय आरोग्य अभियान मोर्चाची शासनाकडून दखल न घेतल्याने निर्णय कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी : आपल्या विविध न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी बुधवारी जिल्हाधिकारी भवनावर काढलेल्या भव्य मोर्चाची शासनाकडून गंभीर दखल घेतली गेली नाही. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी शुक्रवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.शासन सेवेत विनाशर्त समायोजन करणे, कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण लागू करणे यासह अन्य विविध न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी बुधवारी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने जिल्हाधिकारी भवनावर शेकडोंच्या संख्येने मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

मागण्या मान्य नाही झाल्या तर १३ एप्रिलपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा या संघटनेने दिला होता. मात्र, शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने शुक्रवारपासून या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, या आंदोलनकर्त्यांना आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य जान्हवी सावंत यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.

राज्यात २००५ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू झाले. जिल्ह्यात या अभियानातंर्गत ४५६ अधिकारी व कर्मचारी आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी या अभियानाचा मोठा सहभाग आहे. यातील सर्व कर्मचारी हे कंत्राटी स्वरूपाचे असून नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच पूर्ण वेळ काम करत आहेत. मिळालेल्या अल्प मोबदल्यात शासनाने दिलेल्या सर्व कामकाजांची पूर्तता करत आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याने १० ते १२ वर्षे सेवा बजावली आहे.

एवढा कालखंड या सेवेत घालवल्यानंतर प्रत्येक वर्षी प्रतिनियुक्ती प्रक्रियेमध्ये काही अन्यायकारक बदल करण्यात येत आहेत. एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्यादृष्टीने सरकारने एक समिती नियुक्त केली आहे.

या समितीने तीन महिन्यांत याबाबत शासनास अहवाल सादर करणे आवश्यक होते. परंतु आश्वासनाशिवाय कोणतीही कार्यवाही झाली नाही. मात्र, या समितीचा निर्णय येण्यापूर्वीच शासन नवीन भरती प्रक्रिया राबवून पुनर्नियुक्तीमध्ये जाचक अटींद्वारे अनुभवी प्रशिक्षित कर्मचाºयांवर अन्याय करणार आहे.या प्रमुख मागण्यांसाठी कामबंदएनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना विनाअट शासनसेवेत सामावून घ्यावे, अभियानातील अनुभवी व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना शासनाच्या सरळ सेवा भरतीत प्राधान्य द्यावे व वयाची अट शिथिल करावी, कामावर आधारित गुण पध्दत रद्द करावी, समान काम, समान वेतन कायदा लागू करावा, आरोग्याचे खाजगीकरण करण्यात येऊ नये, अभियानातील महिला कर्मचाऱ्यांना गरोदर व प्रसुती कालावधीची १८० दिवसांची भर पगारी रजा मिळावी, जिल्ह्याअंतर्गत बदली प्रस्तावाला मान्यता द्यावी, आशा व गटप्रवर्तक यांना किमान वेतन देण्यात यावे, विमा संरक्षण मिळावे, प्रवास व मोबाईल भत्ता मिळावा. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhospitalहॉस्पिटलGovernmentसरकार