शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

सिंधुदुर्ग : मच्छिमारांवरील अन्यायाबाबत नारायण राणे यांनी पोलिसांचे वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 20:25 IST

गोव्यातील मासेमारी करणाऱ्या बोटी सिंधुदुर्गात येऊन बेकायदेशीर मासेमारी करतात व या किनारपट्टीवरील मासे लुटून नेतात. त्यामुळे मालवणच्या मच्छिमारांनी गोव्यातील त्या बेकायदेशीर बोटी पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याची भूमिका घेतली. मात्र. त्या बोटींवर कोणत्याही प्रकारचा दरोडा घातला नव्हता, त्यामुळे पोलिसांची कारवाई चुकीची आहे.

ठळक मुद्देमच्छिमारांवरील अन्यायाबाबत नारायण राणे यांनी पोलिसांचे वेधले लक्ष कारवाई चुकीची, राणे यांनी घेतली अधीक्षकांची भेट

सिंधुदुर्गनगरी : मच्छिमारांना पोलिसांकडून त्रास होऊ नये यासाठी आपण जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत त्यांचे मच्छिमारांवरील अन्यायाबाबत लक्ष वेधले असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी दिली.गोव्यातील मासेमारी करणाऱ्या बोटी सिंधुदुर्गात येऊन बेकायदेशीर मासेमारी करतात व या किनारपट्टीवरील मासे लुटून नेतात. त्यामुळे मालवणच्या मच्छिमारांनी गोव्यातील त्या बेकायदेशीर बोटी पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याची भूमिका घेतली. मात्र. त्या बोटींवर कोणत्याही प्रकारचा दरोडा घातला नव्हता, त्यामुळे पोलिसांची कारवाई चुकीची आहे.  यापुढे

मालवण समुद्रात गोव्यातील मच्छिमार बोटी अनधिकृतरित्या येऊन प्रकाशझोतातील मासेमारी करतात. यामुळे येथील मच्छिमारांचे मोठे नुकसान होते. या बोटी मालवण येथील मच्छिमारांनी ताब्यात घेत त्या पोलिसांच्या ताब्यात दिल्या. यानंतर मालवणच्या या मच्छिमारांवर पोलिसांनी दरोड्याचे गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड सुरु केली आहे. हा विषय गंभीर बनला आहे.या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांची भेट घेतली. यावेळी स्वाभिमान पक्षाचे जिल्हाधक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई, अशोक सावंत, सुरेश सावंत, संदीप कुडतरकर, एकनाथ नाडकर्णी, मिलिंद मेस्त्री आदींसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.पालकमंत्र्यांना लगावला टोलापोलीस अधीक्षकांना भेटून आल्यावर पत्रकारांशी बोलताना नारायण राणे म्हणाले की, मालवणच्या मच्छिमारांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. आणि गोव्याहून सिंधुदुर्गमध्ये येऊन मासेमारी करणे हे चुकीचे आहे. आणि तेही प्रकाश झोतात.

बाहेरून येणारे मच्छिमार येथील मासे घेऊन जातात आणि येथील मच्छिमारांवर उपासमारीची पाळी येते. त्यामुळे अशा बेकायदेशीररित्या मच्छिमारी करणाऱ्या बोटींविरोधात आंदोलन करत या बोटी पकडून पोलिसांकडे दिल्या. हा काही त्यांचा गुन्हा नाही! असे असतानाही या मच्छिमारांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

ही चुकीची पद्धत आहे. खरे म्हणजे गस्तीनौकांच्या माध्यमातून अशा या नौका सरकारने पकडणे आवश्यक आहे. मात्र हे होताना दिसत नाही. असे सांगतानाच आपण पालकमंत्री असताना चार चार गस्तीनौका होत्या, असा टोलाही राणे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांना लगावला. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्गfishermanमच्छीमार