शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर बॉक्सवेलसाठी ठिय्या, तेर्सेबांबर्डे, मांडकुली ग्रामस्थ आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 15:17 IST

कुडाळ महामार्गावर तेर्सेबांबडे-मळावाडी येथे बॉक्सवेल बांधावा, या मागणीसाठी तेर्सेबांबर्डे, मांडकुली व भोयाचे केरवडे येथील सरपंच, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी मंगळवारी ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्गावर बॉक्सवेलसाठी ठिय्यातेर्सेबांबर्डे, मांडकुली ग्रामस्थ आक्रमक  उपविभागीय अभियंत्यांच्या आश्वासनानंतर माघार

कुडाळ : महामार्गावर तेर्सेबांबडे-मळावाडी येथे बॉक्सवेल बांधावा, या मागणीसाठी तेर्सेबांबर्डे, मांडकुली व भोयाचे केरवडे येथील सरपंच, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी मंगळवारी ठिय्या आंदोलन केले.

महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश शेडेकर यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, १० मे पर्यंत मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.कुडाळ तालुक्यात मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महामार्गाच्या पलीकडे शेतकऱ्यांची शेती, नदीवर पाण्यासाठी जाणाऱ्या गुरांचा मार्ग, स्मशानभूमी असल्यामुळे मांडकुली, भोयाचे केरवडे या दोन गावांना जोडणारा तेर्सेबांबडे-मळावाडी येथे बॉक्सवेल बांधण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले.या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना या तिन्ही गावांच्या ग्रामपंचायतींमार्फत निवेदनेही देण्यात आली होती. मात्र, जिल्हाधिकारी प्रशासनाने यावर केवळ ग्रामस्थांच्यादृष्टीने समाधानकारक कार्यवाही करावी, असा शेरा मारून महामार्ग विभागाला पत्र देण्याचीच कार्यवाही केली. त्यामुळे तीनही गावातील संतप्त ग्रामस्थांनी अखेर रस्त्यावर उतरत प्रस्तावित मागणीच्या ठिकाणीच लाक्षणिक ठिय्या आंदोलन छेडले.महामार्ग विभागाचे उपकार्यकारी अभियंता शेडेकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. महामार्ग चौपदरीकरण कामाचा आराखडा पूर्णत: तयार झाला असून त्यात कोणताही बदल करायचा झाल्यास त्याचा वाढीव खर्च व वाढणारा वेळ याचा प्रशासन स्तरावरून गांभीर्याने विचार केला जातो.

यासाठी तांत्रिक मंजुरीसाठी एक समिती काम करते. त्यामुळे ग्रामस्थांच्या या मागणीचा विचार करून आपण तसा प्रस्ताव आपल्या कार्यालयात तयार करून तो वरिष्ठांकडे पाठवू. यासंदर्भात आपण काय कार्यवाही करणार आहात, याचे लेखी उत्तर तत्काळ बुधवारपर्यंत तिन्ही ग्रामपंचायतींना पाठविले जाईल. मात्र तोपर्यंत नियमानुसार व टेंडरनुसार काम करू द्या, असे त्यांनी सांगितले.जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी यांच्याशी महामार्ग प्रकल्पग्रस्तांची भेट निश्चित केली आहे. ग्रामस्थांनी आपले म्हणणे सादर करावे, असे सूचित केले. ग्रामस्थांनी या सर्व मागण्यांच्या पूर्ततेसाठी १० मे ची मुदत दिली आहे. अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

या आंदोलनात तेर्सेबांबर्डे सरपंच संतोष डिचोलकर, मांडकुली सरपंच तुषार सामंत, रुपेश कानडे, दिलीप निचम, अजय डिचोलकर, बाबुराव सावंत, गुणाजी जाधव, सागर कोरगावकर, सूर्यकांत कानडे, मधुकर दळवी, गुरूनाथ मराठे, केशव राणे, नयना कोरगावकर, भागिरथी कानडे, सुप्रिया कानडे, संजय डिचोलकर यांनी सहभाग घेतला. माजी उपसभापती बबन भोगटे, पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक, स्वाभिमानचे कुडाळ तालुकाध्यक्ष दीपक नारकर, दिनेश साळगावकर, सचिन धुरी, समीर हळदणकर यांनी यावेळी भेट दिली....तर महामार्गावरच प्रतीकात्मक चिताआमच्या मागण्या प्रशासनाच्या कानी जात नसतील, तर झाराप येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ढोल बडवत जावे लागेल, अशा भावना व्यक्त करतानाच यापुढे महामार्गावर अपघातात एकाचा जरी मृत्यू झाला, तर महामार्गावरच प्रतीकात्मक चिता रचून तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्ग