शहरं
Join us  
Trending Stories
1
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
2
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
3
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
4
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
5
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
6
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
7
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
8
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
9
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
10
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
11
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
12
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
13
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
14
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
15
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
16
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
17
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
18
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
19
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
20
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग :  मालवणी बोलीला राजाश्रय मिळाला पाहिजे : गंगाराम गवाणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 17:15 IST

अलीकडील तरूण मालवणी बोलीभाषेचे संवर्धन करतीलच. मच्छिंद्र कांबळी, दूरदर्शन कलाकार वैभव मांगले आदी कलाकारांनी मालवणी भाषेची चांगली प्रसिद्धी केलेली आहे. पण या मालवणी बोली भाषेला राजाश्रय मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन मालवणी बोली भाषा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी केले.

ठळक मुद्देमालवणी बोलीला राजाश्रय मिळाला पाहिजे : गंगाराम गवाणकर कणकवलीतील साहित्य संमेलनात प्रतिपादन

सिंधुदुर्ग : अलीकडील तरूण मालवणी बोलीभाषेचे संवर्धन करतीलच. मच्छिंद्र कांबळी, दूरदर्शन कलाकार वैभव मांगले आदी कलाकारांनी मालवणी भाषेची चांगली प्रसिद्धी केलेली आहे. पण या मालवणी बोली भाषेला राजाश्रय मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन मालवणी बोली भाषा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी केले.मालवणी बोली आणि साहित्य संशोधन केंद्र सिंधुदुर्गने सिंधुभूमी कला अकादमी सिंधुदुर्गच्यावतीने येथील आचरेकर प्रतिष्ठानमध्ये पाचवे मालवणी बोली साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी संमेलनाध्यक्ष महेश केळुसकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, विश्वास मेहेंदळे उपस्थित होते.संदेश पारकर यांनी मालवणी बोली भाषा महाराष्ट्राच्या नकाशावर आली पाहिजे. या भाषेत प्रेम व आपुलकी आहे. या भाषेमुळे गोडवा निर्माण होतो. या भाषेमुळे सिंधुदुर्गातील ज्वलंतपणा दिसला, असे त्यांनी सांगितले.गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांनी कार्यक्रमास आलेल्या व्यक्तींवर लिहिलेल्या चारोळ्या म्हणून दाखविल्या. यावेळी ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर, प्रा. नामदेव गवळी, अजय कांडर, कवयित्री सुनंदा कांबळी, मधुसूदन नानिवडेकर यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विलास खानोलकर यांनी केले.कला क्षेत्राबाबत प्रशिक्षण वर्ग सुरू करूसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, मालवणी बोलीचे जतन करणे आवश्यक आहे. साहित्य व कला क्षेत्रात सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी एखादे प्रशिक्षण सुरू करता येईल का याचा विचारविनिमय आम्ही करू. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू हेसुद्धा सिंधुदुर्गातीलच आहेत. त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कला क्षेत्राबाबत प्रशिक्षण वर्ग सुरू करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

प्रमोद जठार यांनी यावेळी मुंबईत असतानाचे आपले अनुभव सांगितले. मुंबईतून आल्यानंतर आपण मालवणीतच बोलत असल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. मुंबईत जरी शिक्षण झाले असले तरी मालवणी भाषेवरचे प्रेम कमी झालेले नाही, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनाराliteratureसाहित्य