शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

सिंधुदुर्ग :  मालवणी बोलीला राजाश्रय मिळाला पाहिजे : गंगाराम गवाणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 17:15 IST

अलीकडील तरूण मालवणी बोलीभाषेचे संवर्धन करतीलच. मच्छिंद्र कांबळी, दूरदर्शन कलाकार वैभव मांगले आदी कलाकारांनी मालवणी भाषेची चांगली प्रसिद्धी केलेली आहे. पण या मालवणी बोली भाषेला राजाश्रय मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन मालवणी बोली भाषा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी केले.

ठळक मुद्देमालवणी बोलीला राजाश्रय मिळाला पाहिजे : गंगाराम गवाणकर कणकवलीतील साहित्य संमेलनात प्रतिपादन

सिंधुदुर्ग : अलीकडील तरूण मालवणी बोलीभाषेचे संवर्धन करतीलच. मच्छिंद्र कांबळी, दूरदर्शन कलाकार वैभव मांगले आदी कलाकारांनी मालवणी भाषेची चांगली प्रसिद्धी केलेली आहे. पण या मालवणी बोली भाषेला राजाश्रय मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन मालवणी बोली भाषा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी केले.मालवणी बोली आणि साहित्य संशोधन केंद्र सिंधुदुर्गने सिंधुभूमी कला अकादमी सिंधुदुर्गच्यावतीने येथील आचरेकर प्रतिष्ठानमध्ये पाचवे मालवणी बोली साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी संमेलनाध्यक्ष महेश केळुसकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, विश्वास मेहेंदळे उपस्थित होते.संदेश पारकर यांनी मालवणी बोली भाषा महाराष्ट्राच्या नकाशावर आली पाहिजे. या भाषेत प्रेम व आपुलकी आहे. या भाषेमुळे गोडवा निर्माण होतो. या भाषेमुळे सिंधुदुर्गातील ज्वलंतपणा दिसला, असे त्यांनी सांगितले.गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांनी कार्यक्रमास आलेल्या व्यक्तींवर लिहिलेल्या चारोळ्या म्हणून दाखविल्या. यावेळी ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर, प्रा. नामदेव गवळी, अजय कांडर, कवयित्री सुनंदा कांबळी, मधुसूदन नानिवडेकर यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विलास खानोलकर यांनी केले.कला क्षेत्राबाबत प्रशिक्षण वर्ग सुरू करूसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, मालवणी बोलीचे जतन करणे आवश्यक आहे. साहित्य व कला क्षेत्रात सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी एखादे प्रशिक्षण सुरू करता येईल का याचा विचारविनिमय आम्ही करू. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू हेसुद्धा सिंधुदुर्गातीलच आहेत. त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कला क्षेत्राबाबत प्रशिक्षण वर्ग सुरू करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

प्रमोद जठार यांनी यावेळी मुंबईत असतानाचे आपले अनुभव सांगितले. मुंबईतून आल्यानंतर आपण मालवणीतच बोलत असल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. मुंबईत जरी शिक्षण झाले असले तरी मालवणी भाषेवरचे प्रेम कमी झालेले नाही, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनाराliteratureसाहित्य