शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

सिंधुदुर्ग : गावाच्या विकासासाठी आदर्श सरपंच बनावे : विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 13:45 IST

गावाचा विकास करताना सरपंचांनी कॉन्ट्रॅक्टर सरपंच न बनता आदर्श सरपंच बनावे. आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा योग्य वापर करून गावाचा झपाट्याने विकास करावा, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी सरपंच-उपसरपंच मार्गदर्शन कार्यशाळेत केले. शरद कृषी भवन येथे शिवसेना पक्षाच्यावतीने आयोजित शिबिराचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देगावाच्या विकासासाठी आदर्श सरपंच बनावे : विनायक राऊतओरोस येथील सरपंच, उपसरपंच मार्गदर्शन कार्यशाळेत आवाहन

सिंधुदुर्गनगरी : गावाचा विकास करताना सरपंचांनी कॉन्ट्रॅक्टर सरपंच न बनता आदर्श सरपंच बनावे. आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा योग्य वापर करून गावाचा झपाट्याने विकास करावा, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी सरपंच-उपसरपंच मार्गदर्शन कार्यशाळेत केले.शरद कृषी भवन येथे शिवसेना पक्षाच्यावतीने आयोजित शिबिराचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, गटनेते नागेंद्र परब उपस्थित होते.खासदार राऊत म्हणाले, शासनाने आता गावाच्या विकासाची संपूर्ण धुरा सरपंचांवर सोपविली आहे. त्यामुळे गावाचा विकास करण्यासाठी सरपंचांना असलेले अधिकार याची त्यांना माहिती मिळावी, हे अधिकार कशाप्रकारे वापरावेत याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी हे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. त्यामुळे हे शिबिर लोकप्रतिनिधींना दिशादर्शक असे ठरणार आहे.

ग्रामपंचायतीला आता मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. हा सर्व निधी खर्च करण्याची सर्वश्री जबाबदारी सरपंच यांचीच आहे. मात्र ही जबाबदारी पार पाडत असताना सरपंचांनी कॉन्ट्रॅक्टर न बनता ह् आदर्श सरपंच बनावे, असे आवाहन राऊत यांनी केले. तसेच ग्रामसेवकांवर अवलंबून न राहता या मार्गदर्शन शिबिरातून अधिकारांची माहिती घेऊन गावाचा विकास करावा.आमदार वैभव नाईक म्हणाले, गावात काम करताना सरपंचांना त्यांचे अधिकार माहीत नसल्याने अनेक अडचणी येतात. त्यामुळे त्यांना काय करावे हे कळत नाही. परिणामी त्यांना ग्रामसेवकांवर अवलंबून रहावे लागते. मात्र या मार्गदर्शन शिबिरात सरपंचांना ग्रामपंचायतविषयक विविध मुद्यांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यांना अधिकारांची माहिती दिली जाणार आहे. या शिबिराचा लाभ घेऊन सरपंचांनी गावात विविध उपक्रम राबवावेत असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी ग्रामपंचायत अ‍ॅक्टमधील महत्त्वाच्या तरतुदीतील लेखासंहिता, ग्रामसभा, मासिक सभा, सरपंच, उपसरपंच यांचे अधिकार व कर्तव्ये यावर सुधीर बालम यांनी, आपला गांव आपला विकास, लोकसहभागाचे महत्त्व व त्यातून ग्रामविकास, ग्रामविकासातील प्रेरणास्त्रोत कार्यानुभव या विषयांवर भारत पाटील यांनी तर १४ वा वित्त आयोग व आपला गांव आपला विकास यावर नारायण परब यांनी मार्गदर्शन केले. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग