शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

सिंधुदुर्ग : आगामी पाच वर्षे स्वाभिमान पक्षाला द्या, नारायण राणे यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 16:13 IST

परिवर्तन घडण्यासाठी आगामी पाच वर्षे स्वाभिमान पक्षाला संधी द्या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यांनी वेंगुर्ले येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले.

ठळक मुद्देआगामी पाच वर्षे स्वाभिमान पक्षाला द्या : नारायण राणे मासेमारी, पर्यटन, रेडी बंदर यातून वेंगुर्ले तालुक्यात आर्थिक सुबत्ता येईल

वेंगुर्ले : परिवर्तन घडण्यासाठी आगामी पाच वर्षे स्वाभिमान पक्षाला संधी द्या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यांनी वेंगुर्ले येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले.

मासेमारी, पर्यटन आणि रेडी बंदर यामुळे वेंगुर्ले तालुक्याचा विकास होऊ शकतो आणि त्यामुळे तालुक्यात आर्थिक सुबत्ता येईल. गेल्या काही वर्षात जिल्हा मागे राहिला आहे. पैशाच्या आमिषाला बळी पडू नका. स्वाभिमान पक्ष हा जिल्ह्यापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण महाराष्ट्रात आहे. मतदारांना तेल देऊन आम्ही मते मागत नाही, तर विकास करुनच मते मागतो.वेंगुर्लेतील साईदरबार सभागृहात स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व सभासद नोंदणी कार्यक्रम खासदार राणे यांच्या उपस्थितीत झाला.

यावेळी माजी खासदार निलेश राणे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, संदीप कुडतरकर, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, विकास कुडाळकर, तालुकाध्यक्ष मनीष दळवी, दीपक नारकर, प्रज्ञा परब, सारिका काळसेकर, दादा कुबल, समिधा नाईक, पूजा कर्पे, निकिता परब, गौरी पाटील, वंदना किनळेकर, सुनील भोगटे, प्रकाश गडेकर, दाजी परब, बाबली वायंगणकर, वसंत तांडेल उपस्थित होते.यावेळी राणे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले, गृहराज्यमंत्री आपला पालकमंत्री असताना जिल्ह्यात चोऱ्या, मारामाऱ्या, घरफोड्या होतात ही शोकांतिका आहे. रेडी बंदर सुरु करण्यासाठी मी प्रयत्न केले, मात्र ते बंदर बंद करायला पालकमंत्री केसरकर पुढे सरसावले. पण आता ते बंदर लवकरच सुरु होणार आहे.

मी मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्हा टँकरमुक्त केला होता. आता याच जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. आपल्या कार्यकाळातले रस्ते आणि आताचे रस्ते पहा. आता प्रवास करताना रस्त्यावर आहोत की होडीत आहोत तेच समजत नाही अशी महामार्गाची अवस्था झाल्याची टीका त्यांनी केली.

यावेळी संदीप कुडतरकर, दत्ता सामंत, प्रणिता पाताडे, विकास कुडाळकर यांनीही मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन व आभार काका सावंत यांनी मानले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्ग