शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सिंधुदुर्ग : आगामी पाच वर्षे स्वाभिमान पक्षाला द्या, नारायण राणे यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 16:13 IST

परिवर्तन घडण्यासाठी आगामी पाच वर्षे स्वाभिमान पक्षाला संधी द्या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यांनी वेंगुर्ले येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले.

ठळक मुद्देआगामी पाच वर्षे स्वाभिमान पक्षाला द्या : नारायण राणे मासेमारी, पर्यटन, रेडी बंदर यातून वेंगुर्ले तालुक्यात आर्थिक सुबत्ता येईल

वेंगुर्ले : परिवर्तन घडण्यासाठी आगामी पाच वर्षे स्वाभिमान पक्षाला संधी द्या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यांनी वेंगुर्ले येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले.

मासेमारी, पर्यटन आणि रेडी बंदर यामुळे वेंगुर्ले तालुक्याचा विकास होऊ शकतो आणि त्यामुळे तालुक्यात आर्थिक सुबत्ता येईल. गेल्या काही वर्षात जिल्हा मागे राहिला आहे. पैशाच्या आमिषाला बळी पडू नका. स्वाभिमान पक्ष हा जिल्ह्यापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण महाराष्ट्रात आहे. मतदारांना तेल देऊन आम्ही मते मागत नाही, तर विकास करुनच मते मागतो.वेंगुर्लेतील साईदरबार सभागृहात स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व सभासद नोंदणी कार्यक्रम खासदार राणे यांच्या उपस्थितीत झाला.

यावेळी माजी खासदार निलेश राणे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, संदीप कुडतरकर, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, विकास कुडाळकर, तालुकाध्यक्ष मनीष दळवी, दीपक नारकर, प्रज्ञा परब, सारिका काळसेकर, दादा कुबल, समिधा नाईक, पूजा कर्पे, निकिता परब, गौरी पाटील, वंदना किनळेकर, सुनील भोगटे, प्रकाश गडेकर, दाजी परब, बाबली वायंगणकर, वसंत तांडेल उपस्थित होते.यावेळी राणे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले, गृहराज्यमंत्री आपला पालकमंत्री असताना जिल्ह्यात चोऱ्या, मारामाऱ्या, घरफोड्या होतात ही शोकांतिका आहे. रेडी बंदर सुरु करण्यासाठी मी प्रयत्न केले, मात्र ते बंदर बंद करायला पालकमंत्री केसरकर पुढे सरसावले. पण आता ते बंदर लवकरच सुरु होणार आहे.

मी मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्हा टँकरमुक्त केला होता. आता याच जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. आपल्या कार्यकाळातले रस्ते आणि आताचे रस्ते पहा. आता प्रवास करताना रस्त्यावर आहोत की होडीत आहोत तेच समजत नाही अशी महामार्गाची अवस्था झाल्याची टीका त्यांनी केली.

यावेळी संदीप कुडतरकर, दत्ता सामंत, प्रणिता पाताडे, विकास कुडाळकर यांनीही मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन व आभार काका सावंत यांनी मानले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्ग