शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सिंधुदुर्ग : रत्नागिरीत कोकण विद्यापीठ झालेच पाहिजे, विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 15:57 IST

रत्नागिरी येथे कोकण विद्यापीठ झालेच पाहिजे अशी मागणी कला व वाणिज्य महाविद्यालय खारेपाटणच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत कोकण विद्यापीठ झालेच पाहिजे कला, वाणिज्य महाविद्यालय खारेपाटणच्या विद्यार्थ्यांची मागणी

सिंधुदुर्ग : रत्नागिरी येथे कोकण विद्यापीठ झालेच पाहिजे अशी मागणी कला व वाणिज्य महाविद्यालय खारेपाटणच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.विदर्भ व मराठवाडा येथे विद्यापीठ असून पश्चिम महाराष्ट्रात तीन विद्यापीठे आहेत. सोलापूर जिल्ह्यासाठी एक विद्यापीठ आहे. मग कोकणात विद्यापीठ का नको? असा सवाल अनिकेत सौंदळकर, भूषण पाकळे, हर्षद पोहले, राकेश गेहलोत, सायली शिंदे, प्रथमेश पांचाळ, मयुरी कुळकर्णी, प्रणाली पांचाळ आदी विद्यार्थ्यांनी केला आहे.या संबंधीचे निवेदन कणकवली प्रांताधिकारी कार्यालयातील शिरस्तेदार पी. बी. पळसुले यांना खारेपाटण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिले. या निवेदनात म्हटले आहे की, घिसाडघाईने पेपर तपासत असल्याने उत्तरपत्रिकांचे अचूक मूल्यमापन होत नाही. त्यामुळे पुनर्मूल्यमापन करून घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.गहाळ झालेल्या उत्तरपत्रिकांचे काय करायचे हा तर मोठा प्रश्न आ वासून उभा आहे. त्यामुळे आमचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. गेल्या २-३ वर्षांत अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यमापनासाठी अर्ज केले तेव्हा त्यातील बहुसंख्य विद्यार्थी उत्तीर्ण झाले.त्यामुळे विद्यापीठाची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे, असा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडमधील विद्यार्थ्यांना रत्नागिरी हे मध्यवर्ती ठिकाण होईल व विद्यापीठाशी संपर्क साधणे सोयीचे होईल, असे म्हटले आहे. निवेदनावर आठ विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत.

विद्यापीठ झाले नापासदोडामार्ग ते मुंबई हे अंतर सातशे किलोमीटर आहे. मुंबई विद्यापीठ कोकणच्या एका टोकाला आहे. तेथे विद्यापीठात जाऊन काम करून यायला सहज चार पाच दिवस जातात व हजारो रुपये खर्च होतात. शिवाय प्रचंड गर्दी असल्यामुळे दोन- चार तास आपल्या कामासाठी रांगेत उभे रहावे लागते.

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात उत्तम शैक्षणिक दर्जाबरोबर उत्तम प्रशासन ठेवणे, संशोधन करणे, योग्य वेळी परीक्षा घेऊन पारदर्शकपणे कारभार करणे ही विद्यापीठाची प्रमुख कामे आहेत. पण त्यात मुंबई विद्यापीठच नापास झाले आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गuniversityविद्यापीठ