शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

सिंधुदुर्ग : रत्नागिरीत कोकण विद्यापीठ झालेच पाहिजे, विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 15:57 IST

रत्नागिरी येथे कोकण विद्यापीठ झालेच पाहिजे अशी मागणी कला व वाणिज्य महाविद्यालय खारेपाटणच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत कोकण विद्यापीठ झालेच पाहिजे कला, वाणिज्य महाविद्यालय खारेपाटणच्या विद्यार्थ्यांची मागणी

सिंधुदुर्ग : रत्नागिरी येथे कोकण विद्यापीठ झालेच पाहिजे अशी मागणी कला व वाणिज्य महाविद्यालय खारेपाटणच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.विदर्भ व मराठवाडा येथे विद्यापीठ असून पश्चिम महाराष्ट्रात तीन विद्यापीठे आहेत. सोलापूर जिल्ह्यासाठी एक विद्यापीठ आहे. मग कोकणात विद्यापीठ का नको? असा सवाल अनिकेत सौंदळकर, भूषण पाकळे, हर्षद पोहले, राकेश गेहलोत, सायली शिंदे, प्रथमेश पांचाळ, मयुरी कुळकर्णी, प्रणाली पांचाळ आदी विद्यार्थ्यांनी केला आहे.या संबंधीचे निवेदन कणकवली प्रांताधिकारी कार्यालयातील शिरस्तेदार पी. बी. पळसुले यांना खारेपाटण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिले. या निवेदनात म्हटले आहे की, घिसाडघाईने पेपर तपासत असल्याने उत्तरपत्रिकांचे अचूक मूल्यमापन होत नाही. त्यामुळे पुनर्मूल्यमापन करून घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.गहाळ झालेल्या उत्तरपत्रिकांचे काय करायचे हा तर मोठा प्रश्न आ वासून उभा आहे. त्यामुळे आमचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. गेल्या २-३ वर्षांत अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यमापनासाठी अर्ज केले तेव्हा त्यातील बहुसंख्य विद्यार्थी उत्तीर्ण झाले.त्यामुळे विद्यापीठाची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे, असा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडमधील विद्यार्थ्यांना रत्नागिरी हे मध्यवर्ती ठिकाण होईल व विद्यापीठाशी संपर्क साधणे सोयीचे होईल, असे म्हटले आहे. निवेदनावर आठ विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत.

विद्यापीठ झाले नापासदोडामार्ग ते मुंबई हे अंतर सातशे किलोमीटर आहे. मुंबई विद्यापीठ कोकणच्या एका टोकाला आहे. तेथे विद्यापीठात जाऊन काम करून यायला सहज चार पाच दिवस जातात व हजारो रुपये खर्च होतात. शिवाय प्रचंड गर्दी असल्यामुळे दोन- चार तास आपल्या कामासाठी रांगेत उभे रहावे लागते.

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात उत्तम शैक्षणिक दर्जाबरोबर उत्तम प्रशासन ठेवणे, संशोधन करणे, योग्य वेळी परीक्षा घेऊन पारदर्शकपणे कारभार करणे ही विद्यापीठाची प्रमुख कामे आहेत. पण त्यात मुंबई विद्यापीठच नापास झाले आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गuniversityविद्यापीठ