शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

सिंधुदुर्ग : रत्नागिरीत कोकण विद्यापीठ झालेच पाहिजे, विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 15:57 IST

रत्नागिरी येथे कोकण विद्यापीठ झालेच पाहिजे अशी मागणी कला व वाणिज्य महाविद्यालय खारेपाटणच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत कोकण विद्यापीठ झालेच पाहिजे कला, वाणिज्य महाविद्यालय खारेपाटणच्या विद्यार्थ्यांची मागणी

सिंधुदुर्ग : रत्नागिरी येथे कोकण विद्यापीठ झालेच पाहिजे अशी मागणी कला व वाणिज्य महाविद्यालय खारेपाटणच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.विदर्भ व मराठवाडा येथे विद्यापीठ असून पश्चिम महाराष्ट्रात तीन विद्यापीठे आहेत. सोलापूर जिल्ह्यासाठी एक विद्यापीठ आहे. मग कोकणात विद्यापीठ का नको? असा सवाल अनिकेत सौंदळकर, भूषण पाकळे, हर्षद पोहले, राकेश गेहलोत, सायली शिंदे, प्रथमेश पांचाळ, मयुरी कुळकर्णी, प्रणाली पांचाळ आदी विद्यार्थ्यांनी केला आहे.या संबंधीचे निवेदन कणकवली प्रांताधिकारी कार्यालयातील शिरस्तेदार पी. बी. पळसुले यांना खारेपाटण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिले. या निवेदनात म्हटले आहे की, घिसाडघाईने पेपर तपासत असल्याने उत्तरपत्रिकांचे अचूक मूल्यमापन होत नाही. त्यामुळे पुनर्मूल्यमापन करून घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.गहाळ झालेल्या उत्तरपत्रिकांचे काय करायचे हा तर मोठा प्रश्न आ वासून उभा आहे. त्यामुळे आमचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. गेल्या २-३ वर्षांत अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यमापनासाठी अर्ज केले तेव्हा त्यातील बहुसंख्य विद्यार्थी उत्तीर्ण झाले.त्यामुळे विद्यापीठाची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे, असा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडमधील विद्यार्थ्यांना रत्नागिरी हे मध्यवर्ती ठिकाण होईल व विद्यापीठाशी संपर्क साधणे सोयीचे होईल, असे म्हटले आहे. निवेदनावर आठ विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत.

विद्यापीठ झाले नापासदोडामार्ग ते मुंबई हे अंतर सातशे किलोमीटर आहे. मुंबई विद्यापीठ कोकणच्या एका टोकाला आहे. तेथे विद्यापीठात जाऊन काम करून यायला सहज चार पाच दिवस जातात व हजारो रुपये खर्च होतात. शिवाय प्रचंड गर्दी असल्यामुळे दोन- चार तास आपल्या कामासाठी रांगेत उभे रहावे लागते.

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात उत्तम शैक्षणिक दर्जाबरोबर उत्तम प्रशासन ठेवणे, संशोधन करणे, योग्य वेळी परीक्षा घेऊन पारदर्शकपणे कारभार करणे ही विद्यापीठाची प्रमुख कामे आहेत. पण त्यात मुंबई विद्यापीठच नापास झाले आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गuniversityविद्यापीठ