शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

सिंधुदुर्ग : हिम्मत असेल तर पालकमंत्र्यांनी मालवणमध्ये मच्छिमार बैठक घ्यावी : उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 17:35 IST

परप्रांतीय मासेमारी रोखण्यासाठी आवश्यक असलेली गस्ती नौका मत्स्य विभागाकडे नाही. त्यामुळे हिम्मत असेल तर मच्छिमारांच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांनी मालवणात जाहीर बैठक घ्यावी, असे खुले आव्हान मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिले आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देहिम्मत असेल तर पालकमंत्र्यांनी मालवणमध्ये मच्छिमार बैठक घ्यावी : परशुराम उपरकरदोन्ही सत्ताधाऱ्यांनी मच्छिमारांची केली फसवणूक; मत्स्य विभागात ३२ पैकी १८ कर्मचारी रिक्त

सिंधुदुर्ग : काँग्रेस आघाडी आणि आताच्या युती सरकारने मच्छिमारांचा केवळ मतांसाठी उपयोग करून घेतला. मच्छिमारांचे प्रश्न या दोन्ही सत्ताधाऱ्यांना सोडविण्यात अपयश आले आहे. मत्स्य विभागात ३२ कर्मचाऱ्यांपैकी १८ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

परप्रांतीय मासेमारी रोखण्यासाठी आवश्यक असलेली गस्ती नौका मत्स्य विभागाकडे नाही. त्यामुळे हिम्मत असेल तर मच्छिमारांच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांनी मालवणात जाहीर बैठक घ्यावी, असे खुले आव्हान मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिले आहे.कणकवली येथे मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब व मनसे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, समुद्र किनारी परराज्यातील मच्छिमार येऊन मासेमारी करतात. ती मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य आयुक्तांकडे एकच गस्ती नौका आहे. परप्रांतीय येऊन माशांची लयलूट करत आहेत. १२ नॉटिकल नौका नसल्याने कारवाई करता येत नाही़.

मच्छिमारांसाठी कॉरीडॉर करण्याची घोषणा सरकारने केली़ परंतु अद्यापही कोणतीही कारवाई होताना दिसत नाही़ पारंपरीक मच्छिमारांना आर्थिक अडचणीत आणण्याचे काम हे सरकार करत आहे़ कर्जावर घेतलेल्या बोटी व केलेले गुंतवणूकीमुळे मच्छिमार अडचणित आहे़ त्यामुळे बोटी ताब्यात घेऊन मच्छिमारांना कर्जमुक्त करावे आणि मच्छिमारांना सरकारने समाधानाने व्यवयाय मुक्त करावे, असा टोला परशुराम उपरकर यांनी लगावला.विमानाने चाकरमानी केव्हा येणार?जुन्या पालकमंत्र्यांनी विमानतळाचे तीन वेळा नारळ फाडले़ या पालकमंत्र्यांनी पुन्हा १२ डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उध्दव ठाकरे येणार असल्याचे जाहीर केले. परंतु या विमानतळावर चाकरमानी केव्हा येणार? हे पालकमंत्र्यांनी सांगितले नाही़ नारायण राणे यांनी विमानतळाच्या बाबतीत गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. 

पहिला गुन्हा त्या कंपनीवर होणार आहे आणि पालकमंत्र्यांना जर अधिकार नसतील तर त्यावेळी राणे पालकमंत्री असताना सीवर्ल्ड आणि औष्णिक उर्जा प्रकल्पात तडीपारीची भाषा का करत होते ? असा सवाल परशुराम उपरकर यांनी यावेळी उपस्थित केला.

वैभव नाईक यांनी मच्छिमारांचे प्रश्न सोडविले असे सांगत सत्कार स्विकारले. पण प्रत्यक्षात मच्छिमारांची निराशा झाली आहे.असेही परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग