शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

सिंधुदुर्ग : हिम्मत असेल तर पालकमंत्र्यांनी मालवणमध्ये मच्छिमार बैठक घ्यावी : उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 17:35 IST

परप्रांतीय मासेमारी रोखण्यासाठी आवश्यक असलेली गस्ती नौका मत्स्य विभागाकडे नाही. त्यामुळे हिम्मत असेल तर मच्छिमारांच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांनी मालवणात जाहीर बैठक घ्यावी, असे खुले आव्हान मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिले आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देहिम्मत असेल तर पालकमंत्र्यांनी मालवणमध्ये मच्छिमार बैठक घ्यावी : परशुराम उपरकरदोन्ही सत्ताधाऱ्यांनी मच्छिमारांची केली फसवणूक; मत्स्य विभागात ३२ पैकी १८ कर्मचारी रिक्त

सिंधुदुर्ग : काँग्रेस आघाडी आणि आताच्या युती सरकारने मच्छिमारांचा केवळ मतांसाठी उपयोग करून घेतला. मच्छिमारांचे प्रश्न या दोन्ही सत्ताधाऱ्यांना सोडविण्यात अपयश आले आहे. मत्स्य विभागात ३२ कर्मचाऱ्यांपैकी १८ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

परप्रांतीय मासेमारी रोखण्यासाठी आवश्यक असलेली गस्ती नौका मत्स्य विभागाकडे नाही. त्यामुळे हिम्मत असेल तर मच्छिमारांच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांनी मालवणात जाहीर बैठक घ्यावी, असे खुले आव्हान मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिले आहे.कणकवली येथे मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब व मनसे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, समुद्र किनारी परराज्यातील मच्छिमार येऊन मासेमारी करतात. ती मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य आयुक्तांकडे एकच गस्ती नौका आहे. परप्रांतीय येऊन माशांची लयलूट करत आहेत. १२ नॉटिकल नौका नसल्याने कारवाई करता येत नाही़.

मच्छिमारांसाठी कॉरीडॉर करण्याची घोषणा सरकारने केली़ परंतु अद्यापही कोणतीही कारवाई होताना दिसत नाही़ पारंपरीक मच्छिमारांना आर्थिक अडचणीत आणण्याचे काम हे सरकार करत आहे़ कर्जावर घेतलेल्या बोटी व केलेले गुंतवणूकीमुळे मच्छिमार अडचणित आहे़ त्यामुळे बोटी ताब्यात घेऊन मच्छिमारांना कर्जमुक्त करावे आणि मच्छिमारांना सरकारने समाधानाने व्यवयाय मुक्त करावे, असा टोला परशुराम उपरकर यांनी लगावला.विमानाने चाकरमानी केव्हा येणार?जुन्या पालकमंत्र्यांनी विमानतळाचे तीन वेळा नारळ फाडले़ या पालकमंत्र्यांनी पुन्हा १२ डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उध्दव ठाकरे येणार असल्याचे जाहीर केले. परंतु या विमानतळावर चाकरमानी केव्हा येणार? हे पालकमंत्र्यांनी सांगितले नाही़ नारायण राणे यांनी विमानतळाच्या बाबतीत गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. 

पहिला गुन्हा त्या कंपनीवर होणार आहे आणि पालकमंत्र्यांना जर अधिकार नसतील तर त्यावेळी राणे पालकमंत्री असताना सीवर्ल्ड आणि औष्णिक उर्जा प्रकल्पात तडीपारीची भाषा का करत होते ? असा सवाल परशुराम उपरकर यांनी यावेळी उपस्थित केला.

वैभव नाईक यांनी मच्छिमारांचे प्रश्न सोडविले असे सांगत सत्कार स्विकारले. पण प्रत्यक्षात मच्छिमारांची निराशा झाली आहे.असेही परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग