शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : धरणग्रस्तांनी जगायचे कसे? : संगीता देसाई, पाटबंधारे महामंडळाच्या अभियंत्यांना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 12:14 IST

तिलारी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे पुनर्वसन गावठणात जायला पूर्वी रस्ता नव्हता आणि आता तर मृत व्यक्तीला स्मशानभूमीत नेण्यासाठीही रस्ता नाही. ज्यांनी धरणासाठी जमिनी दिल्या, त्यांनाच आता पिण्यासाठी पाणी मिळत नाही, अशी अवस्था पुनर्वसन गावठणाची आहे. आता तुम्हीच सांगा धरणग्रस्तांनी जगायचे कसे, अशी तीव्र व्यथा कुडासे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता देसाई यांनी प्रकल्प अधिकाºयांसमोर मांडली.

ठळक मुद्देधरणग्रस्तांनी जगायचे कसे? : संगीता देसाई पाटबंधारे महामंडळाच्या अभियंत्यांना सवाल

दोडामार्ग : तिलारी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे पुनर्वसन गावठणात जायला पूर्वी रस्ता नव्हता आणि आता तर मृत व्यक्तीला स्मशानभूमीत नेण्यासाठीही रस्ता नाही. ज्यांनी धरणासाठी जमिनी दिल्या, त्यांनाच आता पिण्यासाठी पाणी मिळत नाही, अशी अवस्था पुनर्वसन गावठणाची आहे. आता तुम्हीच सांगा धरणग्रस्तांनी जगायचे कसे, अशी तीव्र व्यथा कुडासे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता देसाई यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांसमोर मांडली.दक्षिण कोकण पाटबंधारे महामंडळाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक तिलारी दौऱ्यावर आले असता सरपंच सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला. त्याचबरोबर पुनर्वसन गावठणातील धरणग्रस्तांच्या व्यथाही कथन केल्या.यावेळी प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी अभियंता राकेश धाकतोडे, सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण गवस, कुडासे खुर्द सरपंच संगीता देसाई, झरेबांबर सरपंच स्नेहा गवस, कोनाळ सरपंच पराशर सावंत, खोक्रल सरपंच देव शेटकर, परमे सरपंच आनंद नाईक, मांगेली सरपंच सूर्यनारायण गवस, घोटगे उपसरपंच प्रथमेश सावंत, झरेबांबरचे माजी सरपंच पांडुरग गवस, अनिल शेटकर, संजय नाईक, मनसे तालुका उपाध्यक्ष मायकल लोबो आदी उपस्थित होते.तालुक्यातील पिकुळे, उसप, मोर्ले, खोक्रल, केर, झरेबांबर आदी गावांना धरणाचे पाणी देण्याची मागणी असताना प्रकल्प अधिकारी दुर्लक्ष करतात. मात्र नको त्या ठिकाणी प्रकल्पाचे कोट्यवधी रूपये खर्ची घातले जातात. केवळ ठेकेदारांचे चोचले पुरविण्यासाठी हा आटापिटा अधिकारी करताहेत, असा आरोप सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण गवस यांनी केला

 तर तिलारी धरणाशेजारी उभारलेल्या बगीचाच्या देखभालीवर पाच लाख खर्ची घालण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात बागेची दुरवस्था झाली आहे. यामागचे नेमके गौडबंगाल काय? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.मनसेचे तालुका उपाध्यक्ष मायकल लोबो यांनी धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करीत धरणावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कामात गोलमाल झाल्याचा आरोप केला. सीसीटीव्हीसाठी ३९ लाख रूपये खर्ची घालण्यात आले. पण हे कॅमेरे सहा महिनेच चालले. पण त्यानंतर ते बंद पडले. त्यामुळे धरणाची सुरक्षितता धोक्यात आहे. परिणामी हे ३९ लाख गेले कुठे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.यावेळी अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांनी ज्या गावांना तिलारीचे पाणी देणे शक्य आहे, त्या गावांचा सर्व्हे करून देण्याची मागणी आहे. त्या गावांचा सर्व्हे करून दोन महिन्यात बैठक लावली जाईल तसेच कु डासे खुर्दमधील प्रश्नही सोडविला जाईल, असे सांगितले.

बैठकीची फलनिष्पती काय ?सरपंच सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षिण कोकण पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, तिलारीचे कार्यकारी अभियंता राकेश धाकतोडे यांची भेट घेऊन तालुक्यातील शेतकरी व धरणग्रस्तांच्या व्यथा मांडल्या. तसेच प्रकल्पांतर्गत चाललेल्या अनागोंदी कारभाराचा पाढाही अधिकाऱ्यांसमोर वाचला. मात्र या चर्चेत ठोस कार्यवाही किंवा सकारात्मक बाब घडलीच नाही. सरपंचांनी पोटतिडकीने मांडलेल्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांनी केवळ सारवासारव केली.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTilari damतिलारि धरण