शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

सिंधुदुर्ग : मच्छिमारांना प्लास्टिक कचऱ्याची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 12:02 IST

पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी हंगाम सुरू झाला आहे. किनारपट्टी भागात मासेमारी करण्यास अजूनही जोर आला नाहीये, मात्र मच्छिमार बांधव मासेमारी करत असलेल्या रापण पद्धतीच्या जाळीतून मासळीबरोबरच मोठ्या प्रमाणात मिळत असलेला प्लास्टिकचा कचरा मोठी डोकेदुखी ठरत आहे.

ठळक मुद्देमच्छिमारांना प्लास्टिक कचऱ्याची डोकेदुखीसमुद्र्किनारा स्वच्छता उपक्रमांमधून जनजागृती

मालवण : पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी हंगाम सुरू झाला आहे. किनारपट्टी भागात मासेमारी करण्यास अजूनही जोर आला नाहीये, मात्र मच्छिमार बांधव मासेमारी करत असलेल्या रापण पद्धतीच्या जाळीतून मासळीबरोबरच मोठ्या प्रमाणात मिळत असलेला प्लास्टिकचा कचरा मोठी डोकेदुखी ठरत आहे.महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक बंदी आणली. त्यानंतर प्लास्टिक पिशव्यांवर बंदीबाबत प्रशासनाकडून कडक धोरण अवलंबून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मात्र मानवनिर्मित झालेल्या प्लास्टिक कचऱ्याचा भस्मासूर रोखण्यात यंत्रणांना अपयश येत आहे. समुद्र्र किनारे स्वच्छ राहण्यासाठी सरकारकडून अनेक उपक्रम हाती घेण्यात येत असले तरी प्लास्टिकचा भस्मासूर रोखण्यास अद्याप म्हणावे तसे यश येत नाहीय.

मालवण दांडी समुद्र किनारी शुक्रवारी सकाळी एका रापण संघाच्या रापणीमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा मिळून आला. त्यामुळे मत्स्य हंगामात मासळीबरोबरच मिळणारा प्लास्टिक कचरा मच्छिमार बांधवांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

प्लास्टिक पिशव्या बंदी आणि समुद्र्किनारा स्वच्छता उपक्रमांमधून होणाऱ्या जनजागृतीमुळे हानिकारक प्लास्टिक कचऱ्यापासून सागरी पर्यावरण वाचवू शकू याविषयी मात्र मच्छिमार आशावादी आहेत.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीsindhudurgसिंधुदुर्ग