शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
5
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
6
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
7
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
9
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
10
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
11
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
12
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
13
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
14
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
15
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
16
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
17
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
18
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
19
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
20
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!

सिंधुदुर्ग : पालकमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही :निलेश राणे यांचा गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 16:27 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याला संसदपटूंची परंपरा आहे. मात्र, तुमचे आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही. त्यामुळे जिल्हा विकासात सातत्याने मागे जात आहे, अशी खंत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही :निलेश राणे यांचा गौप्यस्फोटशिवसेनेच्या मंत्री, आमदार, खासदारांमुळे जिल्हा विकासात मागे

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याला संसदपटूंची परंपरा आहे. मात्र, तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींमुळे ही परंपरा खंडित झाली आहे. तुमचे आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही. त्यामुळे जिल्हा विकासात सातत्याने मागे जात आहे, अशी खंत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने आंब्रड विभागातील पक्षाच्या सभासद नोंदणीच्या शुभारंभावेळी ते बोलत होते.महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने विभागीयस्तर सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. या नोंदणीचा शुभारंभ निलेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, स्वाभिमान पक्षाचे उपाध्यक्ष विकास कुडाळकर, तालुकाध्यक्ष दीपक नारकर, माजी सभापती मोहन सावंत, सरपंच विठ्ठल तेली, उपसरपंच विजय परब, माजी जिल्हा परिषद सदस्या कल्पिता मुंज, पंचायत समिती सदस्य अरविंद परब, माजी सरपंच विकास राऊळ, आबा परब, सदानंद परब, दिनेश राणे आदी उपस्थित होते.

सदस्य नोंदणी मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी निलेश राणे पुढे म्हणाले, आमदार वैभव नाईक यांनी फक्त गणेश चतुर्थीला धूप, अगरबत्ती वाटून तुम्हांला गृहीत धरले आहे. पण गावासाठी विकासनिधी दिलेला नाही. हे तुम्हांला येणाऱ्या काळात समजून चुकेल. वैभव नाईक यांचा भाऊ विनयभंग प्रकरणात अटक झालेला होता. तसेच स्वत: आमदार नाईक यांच्यावर वाळू चोरीसंदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे. असे आमदार विकासनिधी आणून गावाचा विकास काय करणार? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.आमदार नाईक यांनी एकदा तरी सरकारला अंगावर घेतले, असा क्षण दाखवा, असे ते म्हणाले. खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव या गावामध्येच अनेक प्रश्न आहेत, ते त्यांना सुटत नाहीत. शेजारीच असलेल्या एका गरीब कुटुंबाचे घर पावसाळ्यामध्ये पडले. या घटनेला वर्ष होऊनसुद्धा त्या ठिकाणी खासदारांनी भेट दिली नाही. एक कुटुंबीय खासदारांना भेटायला गेले होते. मात्र, त्या ठिकाणीही ते भेटले नाहीत. असे खासदार या मतदारसंघात काम काय करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या पालकमंत्री, आमदार, खासदार यांना प्रशासन जुमानत नाही.नारायण राणे मंत्री असताना प्रशासनावर त्यांचा वचक होता. ते बोलण्यापूर्वीच या जिल्ह्यासाठी मंत्रालयातून निधी येत होता. आता तशी परिस्थिती नाही, असे सांगून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद ही नारायण राणेंच्या अधिपत्याखाली असल्यामुळे सुरक्षित आहे. रत्नागिरीतील जिल्हा परिषद शिवसेनेच्या अधिपत्याखाली असल्यामुळे आता ती दिवाळखोरीत निघाली असल्याचे त्यांनीसांगितले.यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सांगितले की, त्यांना सातत्याने बारामती निवडून देते. त्या ठिकाणी व्यक्ती बघितली जाते. आपला विकास कोण करू शकतो हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे सातत्याने अजित पवार, सुप्रिया सुळे हे निवडून येत आहेत, असेही ते म्हणाले.सतीश सावंत हे अनुभवी कार्यकर्ते आहेत. नारायण राणेंच्या पहिल्या निवडणुकीपासून ते त्यांच्यासोबत आहेत. त्यांचा असलेला अनुभव हा निश्चितच या मतदारसंघाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप परब यांनी केले तर प्रास्ताविक आबा मुंज यांनी केले.सदस्य नोंदणीसाठी युवकांची उसळली गर्दीमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची सदस्य नोंदणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत सुरू झाली. या सदस्य नोंदणीला जनतेकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आंब्रड येथील विभागीय सदस्य नोंदणीलासुद्धा भरभरून प्रतिसाद मिळाला. या सदस्य नोंदणीवेळी युवकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या विभागातून सुमारे पाच हजार सदस्य हे स्वाभिमान पक्षाचे केले जातील, असे जिल्हा परिषद सदस्य सतीश सावंत यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग