शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

सिंधुदुर्ग : पालकमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही :निलेश राणे यांचा गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 16:27 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याला संसदपटूंची परंपरा आहे. मात्र, तुमचे आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही. त्यामुळे जिल्हा विकासात सातत्याने मागे जात आहे, अशी खंत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही :निलेश राणे यांचा गौप्यस्फोटशिवसेनेच्या मंत्री, आमदार, खासदारांमुळे जिल्हा विकासात मागे

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याला संसदपटूंची परंपरा आहे. मात्र, तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींमुळे ही परंपरा खंडित झाली आहे. तुमचे आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही. त्यामुळे जिल्हा विकासात सातत्याने मागे जात आहे, अशी खंत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने आंब्रड विभागातील पक्षाच्या सभासद नोंदणीच्या शुभारंभावेळी ते बोलत होते.महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने विभागीयस्तर सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. या नोंदणीचा शुभारंभ निलेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, स्वाभिमान पक्षाचे उपाध्यक्ष विकास कुडाळकर, तालुकाध्यक्ष दीपक नारकर, माजी सभापती मोहन सावंत, सरपंच विठ्ठल तेली, उपसरपंच विजय परब, माजी जिल्हा परिषद सदस्या कल्पिता मुंज, पंचायत समिती सदस्य अरविंद परब, माजी सरपंच विकास राऊळ, आबा परब, सदानंद परब, दिनेश राणे आदी उपस्थित होते.

सदस्य नोंदणी मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी निलेश राणे पुढे म्हणाले, आमदार वैभव नाईक यांनी फक्त गणेश चतुर्थीला धूप, अगरबत्ती वाटून तुम्हांला गृहीत धरले आहे. पण गावासाठी विकासनिधी दिलेला नाही. हे तुम्हांला येणाऱ्या काळात समजून चुकेल. वैभव नाईक यांचा भाऊ विनयभंग प्रकरणात अटक झालेला होता. तसेच स्वत: आमदार नाईक यांच्यावर वाळू चोरीसंदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे. असे आमदार विकासनिधी आणून गावाचा विकास काय करणार? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.आमदार नाईक यांनी एकदा तरी सरकारला अंगावर घेतले, असा क्षण दाखवा, असे ते म्हणाले. खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव या गावामध्येच अनेक प्रश्न आहेत, ते त्यांना सुटत नाहीत. शेजारीच असलेल्या एका गरीब कुटुंबाचे घर पावसाळ्यामध्ये पडले. या घटनेला वर्ष होऊनसुद्धा त्या ठिकाणी खासदारांनी भेट दिली नाही. एक कुटुंबीय खासदारांना भेटायला गेले होते. मात्र, त्या ठिकाणीही ते भेटले नाहीत. असे खासदार या मतदारसंघात काम काय करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या पालकमंत्री, आमदार, खासदार यांना प्रशासन जुमानत नाही.नारायण राणे मंत्री असताना प्रशासनावर त्यांचा वचक होता. ते बोलण्यापूर्वीच या जिल्ह्यासाठी मंत्रालयातून निधी येत होता. आता तशी परिस्थिती नाही, असे सांगून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद ही नारायण राणेंच्या अधिपत्याखाली असल्यामुळे सुरक्षित आहे. रत्नागिरीतील जिल्हा परिषद शिवसेनेच्या अधिपत्याखाली असल्यामुळे आता ती दिवाळखोरीत निघाली असल्याचे त्यांनीसांगितले.यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सांगितले की, त्यांना सातत्याने बारामती निवडून देते. त्या ठिकाणी व्यक्ती बघितली जाते. आपला विकास कोण करू शकतो हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे सातत्याने अजित पवार, सुप्रिया सुळे हे निवडून येत आहेत, असेही ते म्हणाले.सतीश सावंत हे अनुभवी कार्यकर्ते आहेत. नारायण राणेंच्या पहिल्या निवडणुकीपासून ते त्यांच्यासोबत आहेत. त्यांचा असलेला अनुभव हा निश्चितच या मतदारसंघाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप परब यांनी केले तर प्रास्ताविक आबा मुंज यांनी केले.सदस्य नोंदणीसाठी युवकांची उसळली गर्दीमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची सदस्य नोंदणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत सुरू झाली. या सदस्य नोंदणीला जनतेकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आंब्रड येथील विभागीय सदस्य नोंदणीलासुद्धा भरभरून प्रतिसाद मिळाला. या सदस्य नोंदणीवेळी युवकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या विभागातून सुमारे पाच हजार सदस्य हे स्वाभिमान पक्षाचे केले जातील, असे जिल्हा परिषद सदस्य सतीश सावंत यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग