शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : ९५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध, चांदा ते बांदा नावीन्यपूर्ण योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 15:03 IST

चांदा ते बांदा या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ९५ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील नैसर्गिक व्यवसायाला आधुनिकीकरणाची जोड देऊन शाश्वत विकास करणे हे या चांदा ते बांदा या योजनेचे उद्दिष्ट आहे.

ठळक मुद्दे९५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध, चांदा ते बांदा नावीन्यपूर्ण योजना शाश्वत विकास करणे हेच योजनेचे उद्दिष्ट

सिंधुदुर्गनगरी : चांदा ते बांदा या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ९५ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील नैसर्गिक व्यवसायाला आधुनिकीकरणाची जोड देऊन शाश्वत विकास करणे हे या चांदा ते बांदा या योजनेचे उद्दिष्ट आहे.राज्याच्या दोन टोकांवर असलेल्या परंतु नैसर्गिक व्यवसायाने प्रगत असणाऱ्या सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा शाश्वत विकास करण्यासाठी ९ जून २०१६ रोजी सरकारने शासन निर्णय जारी केला. चांदा ते बांदा असे या योजनेला नाव देऊन वित्त राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली.योजनेच्या अंमलबजावणीसाठी केसरकर यांनी अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बैठका घेतल्या. अखेर शासनाने खास सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी चांदा ते बांदा योजनेंतर्गत तब्बल ९५ कोटी रुपये मंजूर करून ते प्राप्तदेखील झाले आहेत. यातील मच्छिमारांना आऊट बोटसाठी ५२ लाखांचे वाटप केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मच्छिमार व्यवसाय, काजू उद्योग, काथ्या व्यवसाय, शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. चंद्रपूर जिल्ह्यातही नैसर्गिक व्यवसाय व्यापक प्रमाणावर आहेत. या नैसर्गिक व्यवसायांना जर आधुनिकीकरणाची जोड देऊन शाश्वत विकास साधला तर हे दोन जिल्हे समृद्ध होऊ शकतील म्हणून राज्यात चांदा ते बांदा ही योजना सुरू झाली.

चांदा ते बांदा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनाने जिल्हा समन्वयक पदाची नियुक्ती केली आहे. या पदावर जिल्हा समन्वयक म्हणून जी. एस. धनावडे हजर झाले आहेत. हे जिल्हा कार्यालय जिल्हा नियोजन विभागात आहे.२0२0 पर्यंत निधी खर्च करणे बंधनकारक२0२0 पर्यंत हा निधी खर्च करणे बंधनकारक आहे. यापूर्वी हा निधी खर्च झाल्यास दुसऱ्या टप्प्यात आणखीन निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा निधी विविध योजनांवर खर्च केला जाणार आहे. सन २0१७-१८ या आर्थिक वर्षात चांदा ते बांदा योजनेंतर्गत सिंधुदुर्गसाठी ९५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

टॅग्स :Planning Commissionनियोजन आयोगsindhudurgसिंधुदुर्ग