शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

सिंधुदुर्ग : वनविभाग, वीज कंपनीमुळे ४० घरे विजेपासून वंचित : राजन तेली यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 11:25 IST

वनविभागाकडून वीज अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या नोटिसा देण्यात आल्यामुळे चौकुळ बेरडकी येथील आदिवासी वाड्यातील तब्बल चाळीस घरे विजेपासून आजही वंचित आहेत.

ठळक मुद्देवनविभाग, वीज कंपनीमुळे ४० घरे विजेपासून वंचित राजन तेली यांचा आरोप तोडगा काढा, अन्यथा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा

सिंधुदुर्ग : वनविभागाकडून वीज अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या नोटिसा देण्यात आल्यामुळे चौकुळ बेरडकी येथील आदिवासी वाड्यातील तब्बल चाळीस घरे विजेपासून आजही वंचित आहेत. याला वनविभाग आणि वीज वितरणच्या अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचे मुख्य कारण समोर येत आहे.

तरीही लोकांचा प्रश्न लक्षात घेता लवकरात लवकर यावर तोडगा काढून कामे पूर्ण करा, अन्यथा संबंधित विभागाच्या मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी दिला.तालुक्यातील चौकुळ-चिखलव्हाळ बेरडकी भागात राहणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांनी गेल्या सहा वर्षांपूर्वीपासून आपल्या झोपड्यात वीजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्या मागणीनुसार संबंधितांनी दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पंचायत समिती उपसभापती महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली येथील वीज कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यानंतर त्यांना वीजपुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता.दरम्यान, गेले काही महिने हे काम सुरू होते. मात्र विजेचे खांब घालण्यात येणारा काही भाग हा वनजमिनीत येत असल्याचे कारण पुढे करुन त्याठिकाणी वीज कार्यालयाकडून करण्यात आलेले काम रोखण्यात आले आहे. तसेच आपली कोणतीही परवानगी न घेता काम सुरू ठेवल्यास तुमच्यावर गुन्हे दाखल करू, असा इशारा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. आपल्यावर गुन्हे दाखल होऊ नयेत या भीतीने त्याठिकाणच्या अधिकाऱ्यांनी वीज खांब उभारण्याचे काम अर्धवट टाकले आहे.दरम्यान, याबाबत तेथील लोकांनी तेली यांच्याकडे तक्रार केली होती. दरम्यान, दोन्ही कार्यालयांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय साधून याबाबत योग्य तो तोडगा काढावा आणि ते काम पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकाराबाबत आपण संबंधित खात्यांच्या मंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे, असे तेली यांनी यावेळी सांगितले. यावेळी राजू गावडे, सीताराम परब आदी उपस्थित होते.समन्वयाअभावी काम रखडलेतेली यांनी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत दोन्ही कार्यालयात समन्वय नसल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे समोर आले. उपवनसंरक्षक चव्हाण म्हणाले, वनविभागाच्या हद्दीत काम करण्यास कायद्याने परवानगी मिळू शकते. मात्र तेथील जबाबदारी असलेले वीज अधिकारी चुकीच्या पध्दतीने आमची कोणतीही परवानगी न घेता काम करीत आहेत. त्यामुळे हा प्रकार घडला. त्यांनी रितसर परवानगी मागितल्यास आमचा कोणताही विरोध असणार नव्हता, मात्र तशी प्रक्रिया संबधितांकडून झाली नाही, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rajan Teliराजन तेली sindhudurgसिंधुदुर्ग