शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : वनविभाग, वीज कंपनीमुळे ४० घरे विजेपासून वंचित : राजन तेली यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 11:25 IST

वनविभागाकडून वीज अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या नोटिसा देण्यात आल्यामुळे चौकुळ बेरडकी येथील आदिवासी वाड्यातील तब्बल चाळीस घरे विजेपासून आजही वंचित आहेत.

ठळक मुद्देवनविभाग, वीज कंपनीमुळे ४० घरे विजेपासून वंचित राजन तेली यांचा आरोप तोडगा काढा, अन्यथा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा

सिंधुदुर्ग : वनविभागाकडून वीज अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या नोटिसा देण्यात आल्यामुळे चौकुळ बेरडकी येथील आदिवासी वाड्यातील तब्बल चाळीस घरे विजेपासून आजही वंचित आहेत. याला वनविभाग आणि वीज वितरणच्या अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचे मुख्य कारण समोर येत आहे.

तरीही लोकांचा प्रश्न लक्षात घेता लवकरात लवकर यावर तोडगा काढून कामे पूर्ण करा, अन्यथा संबंधित विभागाच्या मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी दिला.तालुक्यातील चौकुळ-चिखलव्हाळ बेरडकी भागात राहणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांनी गेल्या सहा वर्षांपूर्वीपासून आपल्या झोपड्यात वीजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्या मागणीनुसार संबंधितांनी दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पंचायत समिती उपसभापती महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली येथील वीज कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यानंतर त्यांना वीजपुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता.दरम्यान, गेले काही महिने हे काम सुरू होते. मात्र विजेचे खांब घालण्यात येणारा काही भाग हा वनजमिनीत येत असल्याचे कारण पुढे करुन त्याठिकाणी वीज कार्यालयाकडून करण्यात आलेले काम रोखण्यात आले आहे. तसेच आपली कोणतीही परवानगी न घेता काम सुरू ठेवल्यास तुमच्यावर गुन्हे दाखल करू, असा इशारा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. आपल्यावर गुन्हे दाखल होऊ नयेत या भीतीने त्याठिकाणच्या अधिकाऱ्यांनी वीज खांब उभारण्याचे काम अर्धवट टाकले आहे.दरम्यान, याबाबत तेथील लोकांनी तेली यांच्याकडे तक्रार केली होती. दरम्यान, दोन्ही कार्यालयांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय साधून याबाबत योग्य तो तोडगा काढावा आणि ते काम पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकाराबाबत आपण संबंधित खात्यांच्या मंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे, असे तेली यांनी यावेळी सांगितले. यावेळी राजू गावडे, सीताराम परब आदी उपस्थित होते.समन्वयाअभावी काम रखडलेतेली यांनी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत दोन्ही कार्यालयात समन्वय नसल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे समोर आले. उपवनसंरक्षक चव्हाण म्हणाले, वनविभागाच्या हद्दीत काम करण्यास कायद्याने परवानगी मिळू शकते. मात्र तेथील जबाबदारी असलेले वीज अधिकारी चुकीच्या पध्दतीने आमची कोणतीही परवानगी न घेता काम करीत आहेत. त्यामुळे हा प्रकार घडला. त्यांनी रितसर परवानगी मागितल्यास आमचा कोणताही विरोध असणार नव्हता, मात्र तशी प्रक्रिया संबधितांकडून झाली नाही, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rajan Teliराजन तेली sindhudurgसिंधुदुर्ग