शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सिंधुदुर्ग : वनविभाग, वीज कंपनीमुळे ४० घरे विजेपासून वंचित : राजन तेली यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 11:25 IST

वनविभागाकडून वीज अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या नोटिसा देण्यात आल्यामुळे चौकुळ बेरडकी येथील आदिवासी वाड्यातील तब्बल चाळीस घरे विजेपासून आजही वंचित आहेत.

ठळक मुद्देवनविभाग, वीज कंपनीमुळे ४० घरे विजेपासून वंचित राजन तेली यांचा आरोप तोडगा काढा, अन्यथा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा

सिंधुदुर्ग : वनविभागाकडून वीज अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या नोटिसा देण्यात आल्यामुळे चौकुळ बेरडकी येथील आदिवासी वाड्यातील तब्बल चाळीस घरे विजेपासून आजही वंचित आहेत. याला वनविभाग आणि वीज वितरणच्या अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचे मुख्य कारण समोर येत आहे.

तरीही लोकांचा प्रश्न लक्षात घेता लवकरात लवकर यावर तोडगा काढून कामे पूर्ण करा, अन्यथा संबंधित विभागाच्या मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी दिला.तालुक्यातील चौकुळ-चिखलव्हाळ बेरडकी भागात राहणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांनी गेल्या सहा वर्षांपूर्वीपासून आपल्या झोपड्यात वीजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्या मागणीनुसार संबंधितांनी दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पंचायत समिती उपसभापती महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली येथील वीज कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यानंतर त्यांना वीजपुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता.दरम्यान, गेले काही महिने हे काम सुरू होते. मात्र विजेचे खांब घालण्यात येणारा काही भाग हा वनजमिनीत येत असल्याचे कारण पुढे करुन त्याठिकाणी वीज कार्यालयाकडून करण्यात आलेले काम रोखण्यात आले आहे. तसेच आपली कोणतीही परवानगी न घेता काम सुरू ठेवल्यास तुमच्यावर गुन्हे दाखल करू, असा इशारा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. आपल्यावर गुन्हे दाखल होऊ नयेत या भीतीने त्याठिकाणच्या अधिकाऱ्यांनी वीज खांब उभारण्याचे काम अर्धवट टाकले आहे.दरम्यान, याबाबत तेथील लोकांनी तेली यांच्याकडे तक्रार केली होती. दरम्यान, दोन्ही कार्यालयांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय साधून याबाबत योग्य तो तोडगा काढावा आणि ते काम पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकाराबाबत आपण संबंधित खात्यांच्या मंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे, असे तेली यांनी यावेळी सांगितले. यावेळी राजू गावडे, सीताराम परब आदी उपस्थित होते.समन्वयाअभावी काम रखडलेतेली यांनी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत दोन्ही कार्यालयात समन्वय नसल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे समोर आले. उपवनसंरक्षक चव्हाण म्हणाले, वनविभागाच्या हद्दीत काम करण्यास कायद्याने परवानगी मिळू शकते. मात्र तेथील जबाबदारी असलेले वीज अधिकारी चुकीच्या पध्दतीने आमची कोणतीही परवानगी न घेता काम करीत आहेत. त्यामुळे हा प्रकार घडला. त्यांनी रितसर परवानगी मागितल्यास आमचा कोणताही विरोध असणार नव्हता, मात्र तशी प्रक्रिया संबधितांकडून झाली नाही, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rajan Teliराजन तेली sindhudurgसिंधुदुर्ग