शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सिंधुदुर्ग : जबरदस्तीने धर्मांतर; कारवाई करा, नीतेश राणेंची पोलिसांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 16:37 IST

पोलिसांनी हिंदू धर्मीयांचे जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा कडक शब्दात आमदार नीतेश राणे यांनी दोडामार्गचे प्रभारी निरीक्षक जयदीप कळेकर यांना ठणकावून सांगितले.

ठळक मुद्दे जबरदस्तीने धर्मांतर; कारवाई करा, नीतेश राणेंची पोलिसांकडे मागणीदोडामार्गमध्ये हिंदूंचे ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर प्रकरण

दोडामार्ग : दोडामार्गमध्ये धर्मांतरावरून सुरू झालेल्या वादास जर पोलीसच साथ देत असतील तर आम्ही कधीही खपवून घेणार नाही. आज शहरात हा प्रकार घडला, यापुढे तालुक्याच्या ग्रामीण भागातही असे प्रकार घडतील. त्यामुळे पोलिसांनी हिंदू धर्मीयांचे जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा कडक शब्दात आमदार नीतेश राणे यांनी दोडामार्गचे प्रभारी निरीक्षक जयदीप कळेकर यांना ठणकावून सांगितले.दोन दिवसांपूर्वीच दोडामार्ग शहरात हिंदू धर्मीयांचे ख्रिस्ती धर्मात जबरदस्तीने धर्मांतर करण्यावरून वाद निर्माण झाला होता. याबाबत पोलिसांत तक्रारही देण्यात आली होती. त्यानुसार शहरातील गोपाळ गावडे यांच्यासह पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी आमदार नीतेश राणे यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्याला भेट देत प्रभारी पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्याशी चर्चा केली.हिंंदू धर्मीयांचे जबरदस्तीने ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचा प्रकार आज दोडामार्ग शहरात घडला. तो प्रकार पुढे ग्रामीण भागातही घडू शकतो. त्यामुळे याला वेळीच आवर घालायला हवा. पोलिसांनी याची पाळेमुळे खोदून काढली पाहिजेत, असे राणे यांनी सांगितले.

या प्रकरणात पोलिसांनी हिंदू धर्मीयांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. ते चुकीचे आहे. जे त्यावेळी हजर नव्हते, अशांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून ज्यांचा या प्रकरणाशी संबंध नाही, त्यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत.

जर पोलीसच जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांना साथ देत असतील, तर ते आम्ही कदापी खपवून घेणार नाही, असे राणे यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात आता पुढे कोणती कारवाई होते आणि कोणाची नावे वगळली जातात याकडे लक्ष लागून राहिले आहे.सखोल चौकशीअंती त्यांची नावे वगळणारकसई-दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी पोलिसांना याबाबत चार महिन्यांपूर्वी कल्पना दिली होती. मात्र त्यांनी ठोस कारवाई केली नाही. त्यामुळेच हा प्रकार निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी पोलिसांवर केला.यावर जयदीप कळेकर यांनी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून जे घटनेवेळी उपस्थित नव्हते त्यांची नावे गुन्ह्यातून वगळली जातील, अशी ग्वाही दिली.यावेळी महाराष्ट्र स्वाभिमानचे माजी तालुकाध्यक्ष रमेश दळवी, कसई-दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, राजू निंबाळकर, विठोबा पालयेकर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग