शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

सिंधुदुर्ग : मच्छिमारांच्या फसलेल्या नौकाही बाहेर काढणार, ओखी वादळाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 18:22 IST

ओखी वादळामुळे मांडवी खाडीच्या मुखाशी साचलेला गाळ काढण्याचे काम वेंगुर्ले मेरीटाईम बोर्डाने सुरु केले आहे. त्यामुळे खाडीतील गाळात फसलेल्या नौका बाहेर काढण्याच्या कामाला वेग आला असून खाडीचे मुख खुले होत असल्याने मच्छिमारांच्या नौकाही आता पूर्ववत खाडीत स्थिरावणार आहेत.

ठळक मुद्दे मांडवीच्या मुखाशी साचलेला गाळ काढणे सुरूसंरक्षक भाग खचला

वेंगुर्ले : ओखी वादळामुळे मांडवी खाडीच्या मुखाशी साचलेला गाळ काढण्याचे काम वेंगुर्ले मेरीटाईम बोर्डाने सुरु केले आहे. त्यामुळे खाडीतील गाळात फसलेल्या नौका बाहेर काढण्याच्या कामाला वेग आला असून खाडीचे मुख खुले होत असल्याने मच्छिमारांच्या नौकाही आता पूर्ववत खाडीत स्थिरावणार आहेत.वेंगुर्ले किनारपट्टीला ओखी वादळाचा तडाखा बसल्याने मांडवी खाडीत गाळ साचून चाळीस बोटी त्यात फसल्या होत्या. खाडीचे मुख गाळाने पूर्णपणे भरल्याने येथील मच्छिमारांच्या छोट्यामोठ्या नौका समुद्र्रात असुरक्षित ठेवाव्या लागत होत्या.

यावर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मुंबई येथील मेरीटाईम बोर्डाच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेने मांडवी खाडीतील गाळ काढण्याचे काम वेंगुर्ले मेरीटाइम बोर्डामार्फत सुरु केले आहे. त्यामुळे गाळात फसलेल्या नौका बाहेर काढण्याच्या कामाला वेग आला आहे.वेंगुर्लेतील किनारपट्टीवर ओखी वादळाने उद्भवलेल्या गंभीर घटनेनंतर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या मतदार संघाचे आमदार असूनही रात्रीच्या वेळी धावती भेट देऊन पाहणी केली होती. तर नवाबाग येथे त्यांनी भेट दिली नसल्याने तेथील मच्छिमारांनी नाराजी व्यक्त केली होती.

भाजपा प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार राजन तेली यांनी ५ डिसेंबर रोजी नुकसानग्रस्त नवाबाग मच्छिमार वस्ती व मांडवी किनारपट्टीला भेट देऊन पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली होती. ६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे माजी आमदार राजन तेली यांच्यासमवेत वेंगुर्ले मच्छिमार सहकारी सोसायटीने मांडवी खाडीतील गाळ तातडीने काढण्याची निवेदनाद्वारे मागणी केली होती.त्यानुसार मेरीटाइम बोर्ड मुंबईच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने आदेश दिले होते. बोर्डाचे सर्व्हेयर प्रकाश चव्हाण यांनी खाडीची पाहणी करुन अहवाल सादर केला. त्यानुसार तीन लाख रूपये खर्च करुन येथील गाळ काढून खाडीचे मुख खुले करण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच गाळात फसलेल्या नौका काढल्याचे कामही सुरू केले आहे.मच्छिमारांना बारा तास समद्र्रात प्रतीक्षा करावी लागत होती. हा प्रश्न गाळ काढल्याने तात्पुरता सुटला तरी कायमस्वरूपी पाणी प्रवाहित ठेवण्याबाबत उपाययोजना केल्यास खाडी सुरक्षित होऊन मच्छिमारांना नौका सुरक्षित ठेवण्याबरोबर नौकाविहाराने रोजगारही मिळेल, असे मत आधुनिक रापण संघ अध्यक्ष दादा केळुसकर यांनी व्यक्त केले.

सुमारे ३०० मीटर खाडीतील गाळ तीन फूट खोल व १० मीटर लांबीचा काढला जाणार आहे. हे काम ओखी वादळ आपत्कालीनमधील असल्याचे वेंगुर्ले मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन अजित टोपनर यांनी सांगितले.संरक्षक भाग खचलावेंगुर्ले बंदराला ओखी वादळामुळे बंदराकडील संरक्षक भाग अजस्त्र लाटाने खचला, तर मच्छिमार सुरक्षितपणे ज्या मांडवी खाडीत नौका ठेवतात, ते मुख गाळाने भरले. परिणामी खाडीतील सुमारे चाळीस नौका गाळात फसल्या होत्या. याबाबत वेंगुर्ले तहसीलदार, वेंगुर्ले मत्सविभाग, मेरीटाइम बोर्ड यांनी पंचनामा करून तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVengurle Police Stationवेंगुर्ले पोलिस स्टेशन