शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

सिंधुदुर्ग :शासकीय योजना राबविण्याचा फक्त 'फ़ार्स' करु नका,  पंचायत समिती सदस्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 16:21 IST

शासकीय योजना राबवित असल्याचा फक्त ' फ़ार्स ' उभा करु नका. प्रत्यक्ष काम करा. अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही.असा इशारा कणकवली पंचायत समिती सदस्यानी गुरुवारी झालेल्या मासिक सभेत कृषी अधिकाऱ्यांना दिला.

ठळक मुद्देकणकवली पंचायत समिती सभा : अन्यथा गप्प बसणार नसल्याचा इशारा निकषात फक्त 39 शाळाच बसत असल्याचे निदर्शनास निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पूरविणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा!

कणकवली : शासकीय योजना राबवित असल्याचा फक्त ' फ़ार्स ' उभा करु नका. प्रत्यक्ष काम करा. अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही.असा इशारा पंचायत समिती सदस्यानी गुरुवारी झालेल्या मासिक सभेत कृषी अधिकाऱ्यांना दिला.कणकवली पंचायत समितीची मासिक सभा प.पू.भालचंद्र महाराज सभागृहात सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती दिलीप तळेकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले उपस्थित होते.या सभेत प्रामुख्याने कृषी विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा मुद्दा चर्चेत आला. पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे यांनी कृषी विभागामार्फत तालुक्यात घेण्यात आलेल्या औषध फवारणी विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीच्या मेळाव्याचा प्रश्न उपस्थित केला होता. लोरे येथे झालेल्या मेळाव्यात 17 जण उपस्थित होते. त्यातील कितीजण शेतकरी होते? असा सवाल त्यानी कृषी अधिकारी पाचपुते यांना विचारला.

औषध फवारणीबाबत मार्गदर्शनासाठी कृषि विभागाकडून शेतकऱ्यांसाठी तालुक्यात मेळाव्याचे आयोजन केले गेले होते. मात्र, त्याची माहितीच शेतकऱ्यांपर्यत पोहचत नसेल तर असे मेळावे घेण्याचा उद्देश सफल कसा होणार ? असा प्रश्न उपस्थित करतानाच फक्त शासकीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी असे मेळावे घेतल्याचे कागदोपत्री दाखवू नका.

या मेळाव्याबाबत त्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना माहिती का देण्यात आली नाही ? असेही त्यानी विचारले.इतर सदस्यानीही या मुद्यावरून कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 'आत्मा' समिती सदस्यानाही काही मेळाव्याबाबत माहिती दिली जात नाही .असे का? असा प्रश्न उपस्थित करतानाच यापुढे पुन्हा असे घडल्यास आम्ही गप्प बसणार नाही. आमच्यासाठी जनतेचे हित महत्वाचे आहे. त्यांच्यापर्यन्त परिपूर्ण माहिती पोहचली पाहिजे. याची दक्षता घ्या असे अधिकाऱ्यांना सुनावले.सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांनी पंचायत समिती सदस्य ,सरपंच तसेच गावातील इतर लोकप्रतिनिधीना विश्वासात घेवून योजना राबवा असे यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.दहा पेक्षा कमी पटसंख्या व दोन शाळांमधील अंतर अशा निकषाच्या आधारे कणकवली तालुक्यातील 43 शाळा बंद करण्याबाबतची सुचना उपसंचालकांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावरुन प्राप्त झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांनी दिली. तसेच या सुचनेनंतर आपल्या विभागाने संबधित शाळांची पहाणी केल्यानंतर संबधित निकषात फक्त 39 शाळाच बसत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

बेर्ले- शेर्पे शाळा , लोरे बांबरवाडी शाळा , नांदगाव वाघाचीवाडी शाळा तसेच फोंडा ब्रह्मनगरी शाळा या उर्वरित चार शाळांपैकी दोन शाळांतील पटसंख्या आता वाढली आहे. यामध्ये नांदगाव वाघाचीवाडी शाळा तसेच फोंडा ब्रह्मनगरी शाळा यांचा समावेश आहे. याची माहिती वरिष्ठ स्तरावर कळविण्यात आल्याचे किंजवडेकर यांनी यावेळी सांगितले.पशुसंवर्धन विभागाला दिलेल्या कामकाजाच्या उद्दीष्टापैकी लसिकरणाचे उद्दिष्ट दहा टक्केच पूर्ण झाले आहे. लस उपलब्ध नसल्याने जनावरांचे लसिकरण होऊ शकले नसल्याची माहिती डॉ . विठ्ठल गाड यांनी दिली. तर फक्त शेतकऱ्यांचा दूरध्वनी आल्यावरच लसिकरण करायला जावू नका.

जनावरे एखाद्या साथीने दगावली तर त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न सदस्यानी यावेळी उपस्थित केला. तसेच लसिकरण व इतर कामकाजाचा परिपूर्ण आढावा पुढील सभेत द्या अशी मागणीहि यावेळी करण्यात आली.लघुपाटबंधारे विभागाकडून यापुढे अंगणवाडीचे काम पूर्ण नसेल तर संबधित मक्तेदाराचे देयक अदा करण्यात येवू नये. काम अपूर्ण असताना देखील झालेल्या कामाचे देयक मक्तेदाराला दिल्याने निविदेत नमूद सर्व कामे पूर्ण होत नाहीत. त्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागतो.तसेच निधिहि शिल्लक रहातो . असा मुद्दा मनोज रावराणे यांनी उपस्थित केला असता यापुढे याबाबत काळजी घेण्यात येईल असे उपअभियंता महाजन यांनी सांगितले.आरोग्य विभागातील कर्मचारी काम करीत नसतील तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करा अशी मागणी सदस्यानी सभेत केली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांनी ,अशी कारवाई केल्यास तुमच्यासारखे लोकप्रतिनिधिच कर्मचाऱ्यांची रदबदली करण्यासाठी आपल्याकडे येत असल्याचे सांगितले.तसेच त्यामुळे कामकाज करताना अडचण येत असल्याचेही ते म्हणाले.फोंडाघाट पोलिस पाटील पद तत्काळ भरण्यात यावे अशी मागणी सुजाता हळदिवे यांनी केली. एमआरजीएस अंतर्गत शेतपाटांचे काम करण्यात यावे अशी मागणी मनोज रावराणे यानी केली. तर याबाबत वरिष्ठस्तरावरून मार्गदर्शन मागविले असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले. गणेश तांबे तसेच इतर सदस्यानीही विविध मुद्दे यावेळी उपस्थित केले.निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पूरविणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा!तालुक्यात निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरविल्याची घटना उघड झाली आहे. मुलांच्या जिवनाशी निगडीत हा विषय असून त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन संबधित ठेकेदारावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी सदस्यानी या सभेत केली. सभापती साटम यांनीही या मागणीला दुजोरा दिला. त्यानंतर याबाबत आपण जिल्हा परिषदेच्या उप मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांशी सभा संपल्यानंतर लगेचच बोलतो असे गटविकास अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गpanchayat samitiपंचायत समिती