शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

गणेशोत्सवासाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 15:02 IST

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात दाखल होणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज झाला आहे. मुंबई , उपनगर तसेच पुणे व इतर भागातून सिंधुदुर्गात येणाऱ्या जादा ८७ गाड्यांचे तर परतीच्या प्रवासासाठी ५७ गाड्यांचे आता पर्यंत बुकिंग झाले आहे.

ठळक मुद्देप्रकाश रसाळ यांची माहिती येणाऱ्या ८७ तर जाणाऱ्या ५७ जादा गाड्यांचे बुकिंग

कणकवली : गणेशोत्सवासाठीसिंधुदुर्गात दाखल होणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी एसटीचासिंधुदुर्ग विभाग सज्ज झाला आहे. मुंबई , उपनगर तसेच पुणे व इतर भागातून सिंधुदुर्गात येणाऱ्या जादा ८७ गाड्यांचे तर परतीच्या प्रवासासाठी ५७ गाड्यांचे आता पर्यंत बुकिंग झाले आहे.

या व्यतिरिक्त मुंबईतील विविध भागात जाणाऱ्या नियमित ५ गाड्या व हंगामी ९ गाड्यांची सोयही उपलब्ध करण्यात आली आहे. तर येणाऱ्या गाड्यांबरोबरच परतीच्या प्रवासासाठी ऑनलाईन नोंदणीची सोय करण्यात आली आहे. अशी माहिती कणकवली येथील एसटीच्या विभागीय कार्यालयातएसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली. यावेळी अशोक राणे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.यावेळी प्रकाश रसाळ म्हणाले, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील तळेरे लगत साळीस्ते येथे २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत चेकपोस्ट सुरू करण्यात येणार आहे. ते २४ तास सुरू राहणार आहे. त्याठिकाणी वाहतुक नियंत्रक व अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय फिरते दुरुस्तीपथक, मार्ग तपासणीपथक तैनात असणार आहे. गणेशोत्सव कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्या अंतर्गत जादा वाहतुकीबाबतही नियोजन करण्यात आले आहे.३० ऑगस्ट पासून साधारणतः सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ सुरू होणार आहे. यंदा चाकरमान्यांना घेऊन सुमारे ८७ गाड्या जिल्ह्यात दाखल होणार आहेत. यामध्ये मुंबई व उपनगरातून ६६ गाड्या, पुणे तसेच इतर भागातून २१ गाड्यांचा समावेश आहे.

३० ऑगस्ट रोजी ३१ गाड्या, ३१ ऑगस्ट रोजी ५५ गाड्या तर १ सप्टेंबर रोजी १ गाडी सिंधुदुर्गात दाखल होईल. या गाड्यांच्या संख्येत अजूनही वाढ होऊ शकते. याखेरीज जिल्ह्यांतर्गत वाहतुकीतही वाढ होणार असल्याने प्रवाशांची उपलब्धता तसेच भारमान लक्षात घेऊन गणेशोत्सवाच्या कालावधीत गावागावांत जादा बस सोडल्या जाणार आहेत. आतापर्यंत परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्गातून मुंबई तसेच विविध भागात जाण्यासाठी ५७ गाड्यांचे बुकिंग झाले आहे.मुंबईकडे जाणाऱ्या नियमित पाच गाड्या सध्या सुरू आहेत. यात मालवण- मुंबई, कणकवली- बोरिवली, देवगड- बोरिवली, विजयदुर्ग - बोरिवली , विजयदुर्ग - मुंबई या बसफेऱ्यांचा समावेश आहे. त्याशिवाय २८ ऑगस्ट ते १सप्टेंबर या कालावधीत ९ हंगामी गाड्या चाकरमान्यांना घेऊन जिल्ह्यात दाखल होणार आहेत.

७ ते १३ सप्टेंबर याकालावधीत त्या गाड्या परतीचा प्रवास करणार आहेत. त्यामध्ये सावंतवाडी - बोरिवली, मालवण- बोरिवली, कणकवली- बोरिवली, कुडाळ बोरिवली, देवगड- बोरिवली, विजयदुर्ग - बोरिवली , फोंडा- बोरिवली, कणकवली पाचल मार्गे बोरिवली, वेंगुर्ले बोरिवली या गाड्यांचा समावेश आहे.कणकवली आणि सावंतवाडी येथे फिरते दुरुस्तीपथक तैनात असणार आहे. गणेशोत्सवाच्या सात दिवसांच्या कालावधीत अंतर्गत जादा व नियमित गाड्या सोडण्याबाबतचेही नियोजन आहे. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील प्रमुख स्थानकांवरून लिकिंगच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत.

परतीच्या प्रवासासाठीचे बुकिंगही सुरू केले आहे. ग्रुप बुकिंगही सुरू आहे. तर परतीच्या प्रवासासाठीचे मार्ग निश्‍चित करण्यात आले आहेत. आगार व्यवस्थापकांची बैठक घेऊन त्यांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात दाखल होणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मुंबई तसेच इतर ठिकाणी काही गाड्या पाठविल्याने जिल्हांतर्गत सेवेवर काहीसा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी आम्हाला सहकार्य करावे.एसटीच्या आरक्षणाला यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाटे, विजयदुर्ग या भागातील प्रवासी मुंबईवरून रेल्वेने रत्नागिरी पर्यंत येतात. त्यांना त्यांच्या गावी पोहचण्यासाठी रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून गाड्यांची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. असेही रसाळ यांनी यावेळी सांगितले.एसटीच्या सुरक्षित सेवेचा लाभ घ्या !गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी गाड्यांची ग्रुप बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. भाविकांनी एसटीच्या या सुरक्षित सेवेचा लाभ घ्यावा.असे आवाहनही प्रकाश रसाळ यांनी यावेळी केले.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवstate transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग