शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

गणेशोत्सवासाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 15:02 IST

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात दाखल होणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज झाला आहे. मुंबई , उपनगर तसेच पुणे व इतर भागातून सिंधुदुर्गात येणाऱ्या जादा ८७ गाड्यांचे तर परतीच्या प्रवासासाठी ५७ गाड्यांचे आता पर्यंत बुकिंग झाले आहे.

ठळक मुद्देप्रकाश रसाळ यांची माहिती येणाऱ्या ८७ तर जाणाऱ्या ५७ जादा गाड्यांचे बुकिंग

कणकवली : गणेशोत्सवासाठीसिंधुदुर्गात दाखल होणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी एसटीचासिंधुदुर्ग विभाग सज्ज झाला आहे. मुंबई , उपनगर तसेच पुणे व इतर भागातून सिंधुदुर्गात येणाऱ्या जादा ८७ गाड्यांचे तर परतीच्या प्रवासासाठी ५७ गाड्यांचे आता पर्यंत बुकिंग झाले आहे.

या व्यतिरिक्त मुंबईतील विविध भागात जाणाऱ्या नियमित ५ गाड्या व हंगामी ९ गाड्यांची सोयही उपलब्ध करण्यात आली आहे. तर येणाऱ्या गाड्यांबरोबरच परतीच्या प्रवासासाठी ऑनलाईन नोंदणीची सोय करण्यात आली आहे. अशी माहिती कणकवली येथील एसटीच्या विभागीय कार्यालयातएसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली. यावेळी अशोक राणे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.यावेळी प्रकाश रसाळ म्हणाले, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील तळेरे लगत साळीस्ते येथे २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत चेकपोस्ट सुरू करण्यात येणार आहे. ते २४ तास सुरू राहणार आहे. त्याठिकाणी वाहतुक नियंत्रक व अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय फिरते दुरुस्तीपथक, मार्ग तपासणीपथक तैनात असणार आहे. गणेशोत्सव कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्या अंतर्गत जादा वाहतुकीबाबतही नियोजन करण्यात आले आहे.३० ऑगस्ट पासून साधारणतः सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ सुरू होणार आहे. यंदा चाकरमान्यांना घेऊन सुमारे ८७ गाड्या जिल्ह्यात दाखल होणार आहेत. यामध्ये मुंबई व उपनगरातून ६६ गाड्या, पुणे तसेच इतर भागातून २१ गाड्यांचा समावेश आहे.

३० ऑगस्ट रोजी ३१ गाड्या, ३१ ऑगस्ट रोजी ५५ गाड्या तर १ सप्टेंबर रोजी १ गाडी सिंधुदुर्गात दाखल होईल. या गाड्यांच्या संख्येत अजूनही वाढ होऊ शकते. याखेरीज जिल्ह्यांतर्गत वाहतुकीतही वाढ होणार असल्याने प्रवाशांची उपलब्धता तसेच भारमान लक्षात घेऊन गणेशोत्सवाच्या कालावधीत गावागावांत जादा बस सोडल्या जाणार आहेत. आतापर्यंत परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्गातून मुंबई तसेच विविध भागात जाण्यासाठी ५७ गाड्यांचे बुकिंग झाले आहे.मुंबईकडे जाणाऱ्या नियमित पाच गाड्या सध्या सुरू आहेत. यात मालवण- मुंबई, कणकवली- बोरिवली, देवगड- बोरिवली, विजयदुर्ग - बोरिवली , विजयदुर्ग - मुंबई या बसफेऱ्यांचा समावेश आहे. त्याशिवाय २८ ऑगस्ट ते १सप्टेंबर या कालावधीत ९ हंगामी गाड्या चाकरमान्यांना घेऊन जिल्ह्यात दाखल होणार आहेत.

७ ते १३ सप्टेंबर याकालावधीत त्या गाड्या परतीचा प्रवास करणार आहेत. त्यामध्ये सावंतवाडी - बोरिवली, मालवण- बोरिवली, कणकवली- बोरिवली, कुडाळ बोरिवली, देवगड- बोरिवली, विजयदुर्ग - बोरिवली , फोंडा- बोरिवली, कणकवली पाचल मार्गे बोरिवली, वेंगुर्ले बोरिवली या गाड्यांचा समावेश आहे.कणकवली आणि सावंतवाडी येथे फिरते दुरुस्तीपथक तैनात असणार आहे. गणेशोत्सवाच्या सात दिवसांच्या कालावधीत अंतर्गत जादा व नियमित गाड्या सोडण्याबाबतचेही नियोजन आहे. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील प्रमुख स्थानकांवरून लिकिंगच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत.

परतीच्या प्रवासासाठीचे बुकिंगही सुरू केले आहे. ग्रुप बुकिंगही सुरू आहे. तर परतीच्या प्रवासासाठीचे मार्ग निश्‍चित करण्यात आले आहेत. आगार व्यवस्थापकांची बैठक घेऊन त्यांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात दाखल होणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मुंबई तसेच इतर ठिकाणी काही गाड्या पाठविल्याने जिल्हांतर्गत सेवेवर काहीसा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी आम्हाला सहकार्य करावे.एसटीच्या आरक्षणाला यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाटे, विजयदुर्ग या भागातील प्रवासी मुंबईवरून रेल्वेने रत्नागिरी पर्यंत येतात. त्यांना त्यांच्या गावी पोहचण्यासाठी रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून गाड्यांची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. असेही रसाळ यांनी यावेळी सांगितले.एसटीच्या सुरक्षित सेवेचा लाभ घ्या !गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी गाड्यांची ग्रुप बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. भाविकांनी एसटीच्या या सुरक्षित सेवेचा लाभ घ्यावा.असे आवाहनही प्रकाश रसाळ यांनी यावेळी केले.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवstate transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग