शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्हा 'एआय' प्रणालीत राज्य, देशात रोल मॉडेल ठरेल : पालकमंत्री नितेश राणे

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 2, 2025 14:03 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'एआय प्रणाली'चा शुभारंभ 

सिंधुदुर्ग: "सिंधुदुर्ग जिल्हा हा 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (एआय) युक्त जिल्हा म्हणून आज देशात ओळखला जाणार आहे. देशात हा जिल्हा 'एआय' प्रणालीमध्ये पहिला जिल्हा ठरणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून नागरीकांना कमी कालावधीत दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असून सर्वांच्या साथीने निश्चितच यशस्वी होऊ, असा विश्वास राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. एआय प्रणाली सिंधुदुर्ग जिल्ह्याने आत्मसात केली असून प्रशासनात त्याचा वापर करण्याचा शुभारंभ करण्यात आला. राज्यात आणि देशात एआय प्रणाली वापरणारा सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा ठरला आहे. सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री राणे यांनी एआय युक्त जिल्हा करण्यामागील संकल्पना विषद केली.ते म्हणाले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जिल्ह्याला पर्यटन जिल्हा जाहिर केले. साक्षरतेमध्ये जिल्हा पहिल्या पाच क्रमांकांमध्ये आलेला आहे. उत्पन्नामध्ये पाच क्रमांकांमध्ये आहे. टँकरमुक्त जिल्हा म्हणून महत्त्वाची ओळख आहे. आता पुढची २५ ते ५० वर्षे हा महाराष्ट्रातला नाही, तर देशातला पहिला एआय युक्त जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची ओळख होणार आहे. 

'मार्वल' ही जी संस्था आहे, जेव्हा आम्हाला मंत्री म्हणून आपले मंत्रालय 'एआय'मध्ये आणायचे, अशा सूचना आल्या, माझ्या मत्स्यव्यवसाय विभाग आणि बंदरे विभागामध्ये 'एआय'चा वापर कसा करू शकतो, याबद्दल 'मार्वल' बरोबर माझ्या बैठका सुरू झाल्या. जिल्हा पातळीवर आपल्याला तंत्रज्ञान आणायचे असेल, तर त्याच्यासमोर प्रचंड आव्हाने होती. 'एआय' युक्त म्हणजे जिल्ह्यामध्ये काय बदल घडणार आहे, हे आपल्याला समजले पाहिजे, म्हणूनच थोड्या संवादात्मक पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे असे सांगितले.'एआय'मुळे नोकऱ्या जाणार नाहीत वाढणारआपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे, डॉक्टर कमी आहेत, कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे निर्माण झालेली दरी 'एआय'च्या माध्यमातून भरता येऊ शकते. 'एआय' कोणाच्या नोकऱ्या घेणार नाही, आम्हाला माहिती, डेटा पुरवणार, डेटा सगळ्यांचा एकत्र करणार. सामान्य नागरिकांनी जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालयामध्ये कमी वेळ घालवावा या दृष्टिकोनातून 'एआय'चा वापर होणार आहे. वनखात्याकडे कर्मचारी नाहीत, साधनसामग्री नाही, तरी 'एआय'च्या मदतीने प्राण्यांचा पॅटर्न समजून घेतला जाईल, लोकांना माहिती दिली जाईल. पोलीस खात्यालाही 'एआय'ची मदत होईल, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत होईल. 'एआय'मुळे नोकऱ्या जाणार नाहीत, उलट इंटरनेट आणि सेलफोन आल्यामुळे जशा नोकऱ्या वाढल्या, तशाच 'एआय'मुळेही वाढतील. घाईत वडिलांचे घातले जॅकेटसकाळी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात घाईत जॅकेट घातले, तेव्हा माझ्याच माणसाने सांगितले, साहेब, हे मोठ्या साहेबांचे जॅकेट आहे. त्यामुळे आज योग्य जागी, योग्य दिवशी, योग्य माणसाचे ब्लेझर घालून उभा असल्यामुळे मला विश्वास आहे की हा उपक्रम निश्चितच यशस्वी ठरेल" असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सguardian ministerपालक मंत्रीNitesh Raneनीतेश राणे