शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहे, श्रीकृष्णाची गवळदेवांच्या स्नेहभोजनाची पारंपरिक प्रथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 15:31 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात कापणीची लगबग संपली आहे. आता वेध लागले आहेत ते सार्वजनिक माळरानावरील गवळदेवांच्या स्नेहभोजनाचे. जिल्ह्यात ही प्रथा अजूनही खेडोपोडी, गावोगावी सुरू आहे. ग्रामस्थांच्या मदतीने गुराखी आपली गाई, वासरे माळरानावर घेऊन जातात. श्रीकृष्णाने गुराख्यांना एकत्र करून रानातल्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुरू केला, तो म्हणजे गवळदेव होय.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामीण भागात सुरू आहेत स्नेहभोजनाचा कार्यक्रम ‘गवळदेव’ जिल्ह्यातील पारंपरिक प्रथा खेडोपाडी माळरानावर धार्मिक कार्यक्रमासह पूजा

विनोद परब

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात कापणीची लगबग संपली आहे. आता वेध लागले आहेत ते सार्वजनिक माळरानावरील गवळदेवांच्या स्नेहभोजनाचे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही प्रथा अजूनही खेडोपोडी, गावोगावी सुरू आहे. ग्रामस्थांच्या मदतीने गुराखी आपली गाई, वासरे माळरानावर घेऊन जातात. श्रीकृष्णाने गुराख्यांना एकत्र करून रानातल्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुरू केला, तो म्हणजे गवळदेव होय.

दरम्यान, कोकणातील भातकापणीची कामे संपली की, या गवळदेवाच्या कार्यक्रमांना सुरुवात होते. तुळशी विवाह समारंभ पार पडला की, शनिवार किंवा रविवार असा एक दिवस ठरविला जातो व वाडीतल्या बाळगोपाळांना एकत्र जमवून रानातील गवळदेवाची पूजा-अर्चा केली जाते. हाच गवळदेव कार्यक्रम होय.

पूर्वी जंगलात वाघांचा तसेच अन्य रानटी प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असायचा. यावेळी गाई व वासरे वाघांच्या डरकाळीला घाबरून जायची. अशावेळी जंगलात वावरताना गुराख्यांना दक्ष रहावे लागत असे. एकेकट्या गुराख्याला या रानटी प्राण्यांपासून आपल्या गाई-वासरांची सुटका करता येत नसे.

त्यामुळे त्यांच्यापासून अभय मिळावा म्हणून गुराखी एका ठिकाणी माळरानावर जमायचे व एकत्र वावरायचे. त्यावेळी गाई-वासरेही एकत्र असायची. एका मोठ्या झाडाच्या सावलीत ही गाई-वासरे व गुराखी थांबायचे. तेथेच सर्व गुराखी एकत्र जमून आपण आणलेली भाजी-भाकरी खायचे.

हीच प्रथा पुढे हळूहळू चालू राहिली. त्यानंतर शेतकरी आपल्या गुरांसोबत जमून रानात जेवण बनवायला शिकले. तेथेच चुलीवर जेवण करायचे व गाई-वासरांसोबत दिवस घालवायचे व रानटी प्राण्यांपासून त्यांचे संरक्षण करायचे.

माळरानावरील एका ठिकाणी जमून गुराखी झाडाखालील दगडांची साफसफाई करीत. त्यानंतर तुळशी वृंदावने उभारून या गवळदेवाची पूजा केली जायची. गुराखी गवळदेवाकडे साकडे घालायचे. प्रत्येक देवाला नैवेद्य दाखवायचे व केळीच्या पानावर वाढलेल्या जेवणासाठी सर्वांना आमंत्रण करायचे. त्यावेळी गुराखी आपल्याकडे असणारे गाईचे दूध, दही आदी पदार्थ नैवेद्य म्हणून आणायचे.

हीच प्रथा पुढे चालू राहिली. आता माळरानावरील गवळदेवाच्या ठिकाणी सर्वजण जमून चुलीवर भात, भोपळ््याची भाजी, डाळ, वडे आदी पदार्थ शिजविले जातात. गवळदेवाची पूजाअर्चा करून, नैवेद्य दाखवून एकत्र बसून भोजन केले जाते.

वाघोबाची शांतीया जेवणाच्या कार्यक्रमानंतर रात्री भजन, कीर्तन कार्यक्रम व दुसऱ्या दिवशी शिळा गवळदेव व वाघोबाची वाडी असे कार्यक्रम होतात. यात जंगलातील वाघाला शांत करण्यासाठी त्याच्या नावाने एक वाडी (नैवेद्य) काढून ठेवण्याची प्रथा आहे.

मात्र, सध्याच्या परिस्थितीत एखाद्या गुराख्याला वाघ बनवून त्याच्या तोंडात वडे ठेवले जातात व गवळदेवाच्या पाराला प्रदक्षिणा मारून त्याने पाण्यात उडी मारायची अशी पद्धत आहे. ही पद्धत अशीच पुढे चालू ठेवली असल्यामुळे येणाऱ्या पुढील काही वर्षांत अशीच गवळदेवाची परंपरा सुरू राहणार आहे. श्रीकृष्णाने सुरू केलेली ही पारंपरिक पद्धत अजूनही सुरू असून यापुढेही अशीच चालू राहणार आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग