शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहे, श्रीकृष्णाची गवळदेवांच्या स्नेहभोजनाची पारंपरिक प्रथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 15:31 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात कापणीची लगबग संपली आहे. आता वेध लागले आहेत ते सार्वजनिक माळरानावरील गवळदेवांच्या स्नेहभोजनाचे. जिल्ह्यात ही प्रथा अजूनही खेडोपोडी, गावोगावी सुरू आहे. ग्रामस्थांच्या मदतीने गुराखी आपली गाई, वासरे माळरानावर घेऊन जातात. श्रीकृष्णाने गुराख्यांना एकत्र करून रानातल्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुरू केला, तो म्हणजे गवळदेव होय.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामीण भागात सुरू आहेत स्नेहभोजनाचा कार्यक्रम ‘गवळदेव’ जिल्ह्यातील पारंपरिक प्रथा खेडोपाडी माळरानावर धार्मिक कार्यक्रमासह पूजा

विनोद परब

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात कापणीची लगबग संपली आहे. आता वेध लागले आहेत ते सार्वजनिक माळरानावरील गवळदेवांच्या स्नेहभोजनाचे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही प्रथा अजूनही खेडोपोडी, गावोगावी सुरू आहे. ग्रामस्थांच्या मदतीने गुराखी आपली गाई, वासरे माळरानावर घेऊन जातात. श्रीकृष्णाने गुराख्यांना एकत्र करून रानातल्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुरू केला, तो म्हणजे गवळदेव होय.

दरम्यान, कोकणातील भातकापणीची कामे संपली की, या गवळदेवाच्या कार्यक्रमांना सुरुवात होते. तुळशी विवाह समारंभ पार पडला की, शनिवार किंवा रविवार असा एक दिवस ठरविला जातो व वाडीतल्या बाळगोपाळांना एकत्र जमवून रानातील गवळदेवाची पूजा-अर्चा केली जाते. हाच गवळदेव कार्यक्रम होय.

पूर्वी जंगलात वाघांचा तसेच अन्य रानटी प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असायचा. यावेळी गाई व वासरे वाघांच्या डरकाळीला घाबरून जायची. अशावेळी जंगलात वावरताना गुराख्यांना दक्ष रहावे लागत असे. एकेकट्या गुराख्याला या रानटी प्राण्यांपासून आपल्या गाई-वासरांची सुटका करता येत नसे.

त्यामुळे त्यांच्यापासून अभय मिळावा म्हणून गुराखी एका ठिकाणी माळरानावर जमायचे व एकत्र वावरायचे. त्यावेळी गाई-वासरेही एकत्र असायची. एका मोठ्या झाडाच्या सावलीत ही गाई-वासरे व गुराखी थांबायचे. तेथेच सर्व गुराखी एकत्र जमून आपण आणलेली भाजी-भाकरी खायचे.

हीच प्रथा पुढे हळूहळू चालू राहिली. त्यानंतर शेतकरी आपल्या गुरांसोबत जमून रानात जेवण बनवायला शिकले. तेथेच चुलीवर जेवण करायचे व गाई-वासरांसोबत दिवस घालवायचे व रानटी प्राण्यांपासून त्यांचे संरक्षण करायचे.

माळरानावरील एका ठिकाणी जमून गुराखी झाडाखालील दगडांची साफसफाई करीत. त्यानंतर तुळशी वृंदावने उभारून या गवळदेवाची पूजा केली जायची. गुराखी गवळदेवाकडे साकडे घालायचे. प्रत्येक देवाला नैवेद्य दाखवायचे व केळीच्या पानावर वाढलेल्या जेवणासाठी सर्वांना आमंत्रण करायचे. त्यावेळी गुराखी आपल्याकडे असणारे गाईचे दूध, दही आदी पदार्थ नैवेद्य म्हणून आणायचे.

हीच प्रथा पुढे चालू राहिली. आता माळरानावरील गवळदेवाच्या ठिकाणी सर्वजण जमून चुलीवर भात, भोपळ््याची भाजी, डाळ, वडे आदी पदार्थ शिजविले जातात. गवळदेवाची पूजाअर्चा करून, नैवेद्य दाखवून एकत्र बसून भोजन केले जाते.

वाघोबाची शांतीया जेवणाच्या कार्यक्रमानंतर रात्री भजन, कीर्तन कार्यक्रम व दुसऱ्या दिवशी शिळा गवळदेव व वाघोबाची वाडी असे कार्यक्रम होतात. यात जंगलातील वाघाला शांत करण्यासाठी त्याच्या नावाने एक वाडी (नैवेद्य) काढून ठेवण्याची प्रथा आहे.

मात्र, सध्याच्या परिस्थितीत एखाद्या गुराख्याला वाघ बनवून त्याच्या तोंडात वडे ठेवले जातात व गवळदेवाच्या पाराला प्रदक्षिणा मारून त्याने पाण्यात उडी मारायची अशी पद्धत आहे. ही पद्धत अशीच पुढे चालू ठेवली असल्यामुळे येणाऱ्या पुढील काही वर्षांत अशीच गवळदेवाची परंपरा सुरू राहणार आहे. श्रीकृष्णाने सुरू केलेली ही पारंपरिक पद्धत अजूनही सुरू असून यापुढेही अशीच चालू राहणार आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग