शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

सिंधुदुर्ग : मांगेली पर्यटनस्थळ विकसित करणार : दिलीप पांढरपट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 16:07 IST

दोडामार्गचे वैभव असेच कायम टिकविण्यासाठी तसेच मांगेली पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देणार आहे, त्यासाठी या भागातील लोकप्रतिनिधींनी पुढे आले पाहिजे, असे मत जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी साटेली-भेडशी येथे वन विभागाच्या विश्रामगृह नूतनीकरण प्रसंगी केले. ​​​​​​​

ठळक मुद्देमांगेली पर्यटनस्थळ विकसित करणार : दिलीप पांढरपट्टे वनविभाग विश्रामगृह कार्यालय नूतनीकरण

दोडामार्ग : दोडामार्गचे वैभव असेच कायम टिकविण्यासाठी तसेच मांगेली पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देणार आहे, त्यासाठी या भागातील लोकप्रतिनिधींनी पुढे आले पाहिजे, असे मत जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी साटेली-भेडशी येथे वन विभागाच्या विश्रामगृह नूतनीकरण प्रसंगी केले.दीडशे वर्षांपूर्वी ज्यावेळी रत्नागिरी हा जिल्हा होता, त्या अगोदरपासून साटेली-भेडशी येथे वन विभागाचे विश्रामगृह कार्यरत होते. मात्र, गेली अनेक वर्षे याकडे दुर्लक्ष होते. या वन विभागाच्या विश्रामगृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. याचा शुभारंभ जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांच्या हस्ते झाले.

यावेळी उपजिल्हाधिकारी मनोज जोशी, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र्र म्हापसेकर, साटेली-भेडशी सरपंच नामदेव धरणे, उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणिक, दोडामार्ग वनक्षेत्रपाल अर्जुन गमरे, बुधाजी मोरगावकर, संदीप धरणे, प्रवीण गवस आदी उपस्थित होते.यावेळी पांढरपट्टे म्हणाले, आपणाला दोडामार्गमधील प्रत्येक गावाची माहिती आहे. येथील प्रत्येक जण आज गोवा राज्यावर अवलंबून आहे. एका बाजूला गोवा राज्य व एका बाजूला कोल्हापूर जिल्हा हे या दोडामार्गचे वैभव आहेत. दोडामार्गमधील मांगेली धबधबा हा आंबोलीप्रमाणे दोडामार्गचे भूषण आहे. येथील पर्यटन स्थळे विकसित झाली पाहिजे ही मागणी योग्य आहे. मांगेली धबधबा विकसित करण्यासाठी जिल्हा नियोजनमधून आपण नक्की निधी देऊ, असे पांढरपट्टे यांनी सांगितले.यावेळी दोडामार्ग वन विभागाच्या मान्यवर मंडळींचे स्वागत करण्यात आले. श्रीकांत केसरकर, राजाराम टोपले, भाऊ टोपले, बंटी टोपले, गजानन देऊलकर, ग्रामस्थ, वन कर्मचारी, वनपाल उपस्थित होते. सूत्रसंचालन सुहास देसाई यांनी केले.७५ टक्के जनता गोव्यावर अवलंबूनराजेंद्र्र म्हापसेकर यांनी सांगितले की, दोडामार्ग तालुका निर्माण होऊन देखील येथील ७५ टक्के जनता गोव्यावर अवलंबून आहे.रोजगार गोव्यात, खरेदी-विक्री गोव्यात, पेट्रोल-डिझेल, आरोग्य सेवा या सर्व महत्त्वाच्या गरजांसाठी गोवा येथेच धाव घ्यावी लागते. त्यामुळे येथील पर्यटन स्थळे विकसित होणे आवश्यक आहे. 

टॅग्स :Governmentसरकारsindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग