शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

सिंधुदुर्ग :देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्प : भूखंडासाठी १५ आॅगस्टपासून उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 15:10 IST

घोणसरी येथील देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन गावठणासाठी लागणाऱ्या जमिनीची मागणी करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविल्याने आपल्या निवासी भूखंडापासून वंचित रहावे लागत असल्याचा आरोप देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

ठळक मुद्देदेवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्प भूखंडासाठी १५ आॅगस्टपासून उपोषणाचा इशाराप्रकल्पग्रस्तांना निवासी भूखंड वाटप नाही

सिंधुदुर्गनगरी : घोणसरी येथील देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन गावठणासाठी लागणाऱ्या जमिनीची मागणी करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविल्याने आपल्या निवासी भूखंडापासून वंचित रहावे लागत असल्याचा आरोप देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. हा भूखंड वाटपाबाबतचा प्रस्ताव जिल्हा पुनर्वसन विभागाकडे धूळखात पडला असून बेघर होऊनही भूखंड मिळत नसल्याने या प्रकल्पग्रस्तांनी १५ आॅगस्टपासून उपोषण करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्याना दिला आहे.घोणसरी देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी घोणसरी व त्या आजूबाजूच्या परिसरातील अनेक ग्रामस्थांची घरे, जमिनी आदी मालमत्ता शासनाने प्रकल्पासाठी संपादित केल्या आहेत. त्यामुळे हे प्रकल्पग्रस्त विस्थापित होऊन बेघर झाले आहेत. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांनी आपल्याला निवासी भूखंड मिळावेत यासाठी जलसंपदा विभाग आणि जिल्हा पुनर्वसन विभाग यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करून लक्ष वेधले होते.१ मे २०१७ आणि २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. याची दखल घेत तत्कालिन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पात्र भूखंड धारकांची यादी निश्चित करून पुनर्वसन गावठणासाठी लागणाऱ्या जमिनीची मागणी करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले होते. त्यानुसार जिल्हा पुनर्वसन विभागाने पुनर्वसन गावठणासाठी जमीन मागणी करण्यासाठी जलसंपदा विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही जलसंपदा विभागाने साधी दखलही घेतली नाही.यावेळी प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष मॅक्सी पिंटो, एकनाथ परब, गणेश परब, विजय रासम, गणेश जाधव, सिताराम परब, दीपक सावंत, साधना साळवी, विलास आयरे आदी प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.बेघर होऊन भूखंड मिळत नसल्याची खंतविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे जमीन वाटपाबाबतचा प्रस्ताव जिल्हा पुनर्वसन विभागाकडे धूळखात पडला आहे. एकप्रकारे या विभागाने जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. जलसंपदा प्रकल्पासाठी जमिनी जाऊन आणि बेघर होऊनही भूखंड मिळत नसल्याने उपोषणाचा इशारा दिला.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग