शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
3
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
4
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
5
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
6
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
7
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
8
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
9
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
10
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
11
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
12
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
13
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
16
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
17
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
18
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
19
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
20
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी

सिंधुदुर्ग :देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्प : भूखंडासाठी १५ आॅगस्टपासून उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 15:10 IST

घोणसरी येथील देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन गावठणासाठी लागणाऱ्या जमिनीची मागणी करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविल्याने आपल्या निवासी भूखंडापासून वंचित रहावे लागत असल्याचा आरोप देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

ठळक मुद्देदेवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्प भूखंडासाठी १५ आॅगस्टपासून उपोषणाचा इशाराप्रकल्पग्रस्तांना निवासी भूखंड वाटप नाही

सिंधुदुर्गनगरी : घोणसरी येथील देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन गावठणासाठी लागणाऱ्या जमिनीची मागणी करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविल्याने आपल्या निवासी भूखंडापासून वंचित रहावे लागत असल्याचा आरोप देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. हा भूखंड वाटपाबाबतचा प्रस्ताव जिल्हा पुनर्वसन विभागाकडे धूळखात पडला असून बेघर होऊनही भूखंड मिळत नसल्याने या प्रकल्पग्रस्तांनी १५ आॅगस्टपासून उपोषण करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्याना दिला आहे.घोणसरी देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी घोणसरी व त्या आजूबाजूच्या परिसरातील अनेक ग्रामस्थांची घरे, जमिनी आदी मालमत्ता शासनाने प्रकल्पासाठी संपादित केल्या आहेत. त्यामुळे हे प्रकल्पग्रस्त विस्थापित होऊन बेघर झाले आहेत. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांनी आपल्याला निवासी भूखंड मिळावेत यासाठी जलसंपदा विभाग आणि जिल्हा पुनर्वसन विभाग यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करून लक्ष वेधले होते.१ मे २०१७ आणि २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. याची दखल घेत तत्कालिन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पात्र भूखंड धारकांची यादी निश्चित करून पुनर्वसन गावठणासाठी लागणाऱ्या जमिनीची मागणी करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले होते. त्यानुसार जिल्हा पुनर्वसन विभागाने पुनर्वसन गावठणासाठी जमीन मागणी करण्यासाठी जलसंपदा विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही जलसंपदा विभागाने साधी दखलही घेतली नाही.यावेळी प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष मॅक्सी पिंटो, एकनाथ परब, गणेश परब, विजय रासम, गणेश जाधव, सिताराम परब, दीपक सावंत, साधना साळवी, विलास आयरे आदी प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.बेघर होऊन भूखंड मिळत नसल्याची खंतविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे जमीन वाटपाबाबतचा प्रस्ताव जिल्हा पुनर्वसन विभागाकडे धूळखात पडला आहे. एकप्रकारे या विभागाने जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. जलसंपदा प्रकल्पासाठी जमिनी जाऊन आणि बेघर होऊनही भूखंड मिळत नसल्याने उपोषणाचा इशारा दिला.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग