शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

सिंधुदुर्ग : सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयामध्ये डॉक्टरांची संख्या वाढवून देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 13:26 IST

सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कामाचा ताण व सरासरी रुग्ण तपासणी संख्या लक्षात घेता तीनच डॉक्टर कार्यरत असून, तज्ज्ञ डॉक्टरांची व एमबीबीएस डॉक्टरांची संख्या वाढवून देण्याची मागणी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देसावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयामध्ये डॉक्टरांची संख्या वाढवून देण्याची मागणीन्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा मसुरकर यांचा इशारा

सावंतवाडी : येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कामाचा ताण व सरासरी रुग्ण तपासणी संख्या लक्षात घेता तीनच डॉक्टर कार्यरत असून, तज्ज्ञ डॉक्टरांची व एमबीबीएस डॉक्टरांची संख्या वाढवून देण्याची मागणी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.येथील उपजिल्हा रुग्णालयात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित चितारी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप सावंत हे तीन डॉक्टर कार्यरत आहेत. मात्र डी.एम.ओ.यू.टी. करण्याकरिता सावंतवाडी रुग्णालयात एम.बी.बी.एस. डॉक्टर नाहीत. परिणामी रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहेत व या कामाचा ताण तज्ज्ञ डॉक्टरांवर पडत असल्याचे राजू मसुरकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.उपजिल्हा रुग्णालयात गेली अनेक वर्षे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमअंतर्गत डी.एम.ओ.यू.टी. करण्यासाठी नेमणूक केलेल्या पाच डॉक्टरांनी अचानकपणे गेला महिनाभर ड्युटी करण्यास नाकारले आहे. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांवर या कामाचा ताण वाढलेला आहे. रात्रपाळीसाठी एम.बी.बी.एस. डॉक्टरांची नितांत गरज आहे, असे मसूरकर यांनी म्हटले आहे.डॉ. दुर्भाटकर हे दरमहा अडीचशे ते तीनशे प्रसुती रुग्णालयामध्ये करत असून, सरासरी दीडशे रुग्ण हृदयरोगतज्ज्ञ अभिजीत चितारी व बालरोगतज्ज्ञ डॉ. सावंत हे सरासरी ५० रुग्णांची तपासणी दिवसासाठी करत आहेत.

गेली दहा वर्षे सावंतवाडीमध्ये जनरल सर्जन अस्थिरोगतज्ज्ञ नसल्याने छोट्यामोठ्या अपघातातील रुग्णांनाही बांबोळी-गोवा येथे जावे लागते. जिल्ह्यात दोन उपजिल्हा रुग्णालये असूनही व्हेंटिलेटर, स्कॅनिंग यंत्र नसल्याने गोवा, मुंबईचा आधार घ्यावा लागतो, हे फार दुदैर्वी आहे. याकडे वेळीच लक्ष घालण्याची मागणी मसुरकर यांनी केली आहे.गेले दोन महिन्यांहून अधिक काळ निविदा नसल्याने जिल्ह्यातील कंत्राटी सफाई कामगारांनी काम करणे सोडून दिले आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसे न झाल्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने जनआंदोलन करून वेळप्रसंगी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही मसुरकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरsindhudurgसिंधुदुर्ग