शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

सिंधुदुर्ग : सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयामध्ये डॉक्टरांची संख्या वाढवून देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 13:26 IST

सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कामाचा ताण व सरासरी रुग्ण तपासणी संख्या लक्षात घेता तीनच डॉक्टर कार्यरत असून, तज्ज्ञ डॉक्टरांची व एमबीबीएस डॉक्टरांची संख्या वाढवून देण्याची मागणी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देसावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयामध्ये डॉक्टरांची संख्या वाढवून देण्याची मागणीन्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा मसुरकर यांचा इशारा

सावंतवाडी : येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कामाचा ताण व सरासरी रुग्ण तपासणी संख्या लक्षात घेता तीनच डॉक्टर कार्यरत असून, तज्ज्ञ डॉक्टरांची व एमबीबीएस डॉक्टरांची संख्या वाढवून देण्याची मागणी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.येथील उपजिल्हा रुग्णालयात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित चितारी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप सावंत हे तीन डॉक्टर कार्यरत आहेत. मात्र डी.एम.ओ.यू.टी. करण्याकरिता सावंतवाडी रुग्णालयात एम.बी.बी.एस. डॉक्टर नाहीत. परिणामी रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहेत व या कामाचा ताण तज्ज्ञ डॉक्टरांवर पडत असल्याचे राजू मसुरकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.उपजिल्हा रुग्णालयात गेली अनेक वर्षे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमअंतर्गत डी.एम.ओ.यू.टी. करण्यासाठी नेमणूक केलेल्या पाच डॉक्टरांनी अचानकपणे गेला महिनाभर ड्युटी करण्यास नाकारले आहे. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांवर या कामाचा ताण वाढलेला आहे. रात्रपाळीसाठी एम.बी.बी.एस. डॉक्टरांची नितांत गरज आहे, असे मसूरकर यांनी म्हटले आहे.डॉ. दुर्भाटकर हे दरमहा अडीचशे ते तीनशे प्रसुती रुग्णालयामध्ये करत असून, सरासरी दीडशे रुग्ण हृदयरोगतज्ज्ञ अभिजीत चितारी व बालरोगतज्ज्ञ डॉ. सावंत हे सरासरी ५० रुग्णांची तपासणी दिवसासाठी करत आहेत.

गेली दहा वर्षे सावंतवाडीमध्ये जनरल सर्जन अस्थिरोगतज्ज्ञ नसल्याने छोट्यामोठ्या अपघातातील रुग्णांनाही बांबोळी-गोवा येथे जावे लागते. जिल्ह्यात दोन उपजिल्हा रुग्णालये असूनही व्हेंटिलेटर, स्कॅनिंग यंत्र नसल्याने गोवा, मुंबईचा आधार घ्यावा लागतो, हे फार दुदैर्वी आहे. याकडे वेळीच लक्ष घालण्याची मागणी मसुरकर यांनी केली आहे.गेले दोन महिन्यांहून अधिक काळ निविदा नसल्याने जिल्ह्यातील कंत्राटी सफाई कामगारांनी काम करणे सोडून दिले आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसे न झाल्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने जनआंदोलन करून वेळप्रसंगी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही मसुरकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरsindhudurgसिंधुदुर्ग