शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : वनप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी, सोनुर्लीसह चार गावे दहशतीखाली, बिबट्यांमुळे शेती करणे बनले धोक्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 16:25 IST

सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली, न्हावेली, शेर्ले गावात गवे, बिबटे यांसारख्या वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातल्याने हंगामी शेती करणे धोक्याचे बनले आहे. वनखात्याने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, असे आवाहन सोनुर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत गावकर यांनी केले आहे.

ठळक मुद्देवनप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सोनुर्लीसह चार गावे दहशतीखालीबिबट्यांमुळे शेती करणे बनले धोक्याचेवनविभागाची उदासिनता

रामचंद्र कुडाळकर तळवडे : सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली, न्हावेली, शेर्ले गावात गवे, बिबटे यांसारख्या वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातल्याने हंगामी शेती करणे धोक्याचे बनले आहे. वनखात्याने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, असे आवाहन सोनुर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत गावकर यांनी केले आहे.सध्या जंगलभागाची तोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने गवे, बिबटे यांसारखे वन्य प्राणी लोकवस्तीपर्यंत येऊ लागले आहेत. या गवे, हत्ती यांसारख्या प्राण्यांकडून हंगामी भातशेतीची मोठ्या प्रमाणात नासधूस केली जात आहे.

गेल्या एक-दोन वर्षांत बिबट्यासारखे हिंस्र प्राणीही लोकवस्तीत घुसू लागल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कुत्रे, वासरे, बैल आदी पाळीव प्राण्यांचा बिबट्यांच्या हल्ल्यात बळी जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतीबरोबरच आता पाळीव जनावरांच्या सुरक्षेचे आव्हानही शेतकºयांसमोर उभे राहिले आहे.

गवे, माकडे आदी प्राण्यांकडून भाजीपाला, केळी बागायती, भातशेतीचे नुकसान केले जाते. वनखात्याचे अधिकारी नुकसानीची पाहणी करतात. मात्र, नुकसानीच्या तुलनेत मिळणारी भरपाई फारच अल्प असल्याने हंगामी शेती बंद करण्याच्या मन:स्थितीत शेतकरीवर्ग दिसत आहे. सोनुर्ली, मळगाव, शेर्ले, नेमळे आदी भागातील काही शेतकऱ्यांनी तर हंगामी शेती करणे बंद केले आहे.गव्यांचा वावर जंगलभागानजीकच्या परिसरात दिवसाढवळ्याही असल्याने दुपारी, सायंकाळच्यावेळी शेतीकडे फिरणे धोकादायक झाले आहे. त्यामुळे शेती करून उपयोग काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असून हंगामी शेती बंद करणे हा एकमेव पर्याय शेतकऱ्यांसमोर उरला आहे.वनविभागाची उदासिनतावन्य प्राण्यांकडून होणारे नुकसान टाळण्यासाठी अशा प्राण्यांचा बंदोबस्त करण्याबाबत वनविभागाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र, अद्याप कुठलीही ठोस उपाययोजना वन खात्याकडून राबविल्याचे दिसून येत नाही. वनविभागाकडून मिळणारी नुकसान भरपाईही तुटपुंजी असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग