शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

सिंधुदुर्ग : भाजपावर टिका करणाऱ्या राणेंची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार :प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 15:26 IST

भाजपाच्या तिकिटावर खासदार झालेल्या नारायण राणेंनी सातत्याने केंद्र आणि राज्य शासनाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोंदीवर टिका करण्याचे धोरण अवलंबले आहे. या संदर्भात भाजपाच्या प्रभारी सरोजीनी पांडे यांच्याकडे पक्षात राहून राणे टिका करत असल्याची तक्रार आपण केली आहे. तसेच राणेंना सन्मानाने राजीनामा द्यायला सांगा अन्यथा त्यांना पक्षातून काढून टाका अशी मागणीही भाजप कोकण विभाग आढावा बैठकीत केली असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे दिली.

ठळक मुद्देभाजपावर टिका करणाऱ्या राणेंची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार प्रमोद जठार यांची माहिती

कणकवली : भाजपाच्या तिकिटावर खासदार झालेल्या नारायण राणेंनी सातत्याने केंद्र आणि राज्य शासनाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोंदीवर टिका करण्याचे धोरण अवलंबले आहे. या संदर्भात भाजपाच्या प्रभारी सरोजीनी पांडे यांच्याकडे पक्षात राहून राणे टिका करत असल्याची तक्रार आपण केली आहे. तसेच राणेंना सन्मानाने राजीनामा द्यायला सांगा अन्यथा त्यांना पक्षातून काढून टाका अशी मागणीही भाजप कोकण विभाग आढावा बैठकीत केली असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे दिली.कणकवली येथील भाजपा जिल्हा संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा चिटणीस रविंद्र शेटये उपस्थित होते.यावेळी प्रमोद जठार म्हणाले, नारायण राणे यांनी भाजपाची खासदारकी घेऊन पक्षावर टिका करणे हे नैतिकतेला धरून नाही. आमच्या पक्षाच्या चिन्हावर खासदार होतात आणि आमच्यावरच टिका करतात. हे योग्य नव्हे. खरोखरच त्याना स्वाभिमान असेल तर त्यानी खासदारकीचा सन्मानाने राजीनामा द्यावा . त्यानंतर बेलाशक टिका करावी .नाणार रिफायनरी प्रकल्पाला ज्यांचा आता विरोध आहे . त्यांनीच तेथील जमिनी विकल्याचे आता समोर येत आहे. शिवसेना आणि स्वाभिमानचेच कार्यकर्ते या जमिनी विक्री व्यवहारात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे भविष्यात हे विरोध करणारेच पुन्हा प्रकल्पाच्या बाजूने उभे रहातील अशी स्थिती आहे. नाणार प्रकल्प नको म्हणणारे बेरोजगार तरूणांच्या जिवाशी खेळत आहेत. असा आरोप प्रमोद जठार यांनी यावेळी केला.शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानाने बाजूला करा !छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते. त्यामुळे राजकीय मतभेद न करता सध्या महामार्गाचे काम सुरू असल्याने कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाने सन्मानाने बाजूला करून ताब्यात घेतला पाहिजे. सध्या प्लास्टिकची पिशवी बांधून शिवाजी महाराजांना ठेवण्यात आले आहे.

या पुतळ्याची विटंबणा किंवा ठेकेदारकडून महामार्गाचे काम करत असताना चुकून नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून पुन्हा वादाची ठिणगी पडू शकते. त्यामुळे महसुल प्रशासन, महामार्ग प्राधिकरण, पोलीस विभागाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने हा पुतळा सुस्थितीत काढून ठेवला पाहिजे. जागा निश्चितीनंतर शिवाजी महाराज यांचा पुतळा सन्मानाने पुन्हा उभा करण्यात यावा .असे प्रमोद जठार यांनी यावेळी सांगितले.20 डिसेंबरला जिल्हा महोत्सव !महाराष्ट्रात सीएम चषकाच्या माध्यमातून 50 लाख तरूण तरूणी क्रीडा महोत्सवात सहभागी झाले आहेत. सिंधुदुर्गात विविध 14 प्रकारच्या स्पर्धांमध्ये 82 हजार 238 तरूण-तरूणींनी सहभाग घेतला आहे. तालुकास्तरीय फेरी पुर्ण झाल्यानंतर आता जिल्हास्तरावरील महोत्सवाचे उद्घाटन 20 डिसेंबर रोजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ओरोस येथे होणार आहे. 500 दुचाकींच्या रॅलीने या स्पर्धेचा शुभारंभ होईल. तर समारोप क्रीडा व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत होईल. सीएम चषक स्पर्धेमुळे भाजपा कार्यकर्त्यांमधील मरगळ कमी झाली असून भविष्यात संघटनात्मक बांधणीसाठी त्यामुळे मदत होणार आहे.असे प्रमोद जठार यांनी सांगितले.जिल्हा कार्यकारिणीत ठराव घेऊ !नारायण राणे टिका प्रकरणी राज्य प्रभारी सरोजीनी पांडे यांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्षांशी चर्चा करण्याचे आश्वासन आपल्याला दिले आहे. या पुढील काळात राणेंनी टिका सुरूच ठेवल्यास जिल्हा कार्यकारिणीत त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा ठराव घेऊन राष्ट्रीय अध्यक्षांकडे पाठविणार असल्याचेही प्रमोद जठार यावेळी म्हणाले.

टॅग्स :Pramod Jatharप्रमोद जठारsindhudurgसिंधुदुर्ग