शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

सिंधुदुर्ग : भाजपावर टिका करणाऱ्या राणेंची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार :प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 15:26 IST

भाजपाच्या तिकिटावर खासदार झालेल्या नारायण राणेंनी सातत्याने केंद्र आणि राज्य शासनाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोंदीवर टिका करण्याचे धोरण अवलंबले आहे. या संदर्भात भाजपाच्या प्रभारी सरोजीनी पांडे यांच्याकडे पक्षात राहून राणे टिका करत असल्याची तक्रार आपण केली आहे. तसेच राणेंना सन्मानाने राजीनामा द्यायला सांगा अन्यथा त्यांना पक्षातून काढून टाका अशी मागणीही भाजप कोकण विभाग आढावा बैठकीत केली असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे दिली.

ठळक मुद्देभाजपावर टिका करणाऱ्या राणेंची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार प्रमोद जठार यांची माहिती

कणकवली : भाजपाच्या तिकिटावर खासदार झालेल्या नारायण राणेंनी सातत्याने केंद्र आणि राज्य शासनाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोंदीवर टिका करण्याचे धोरण अवलंबले आहे. या संदर्भात भाजपाच्या प्रभारी सरोजीनी पांडे यांच्याकडे पक्षात राहून राणे टिका करत असल्याची तक्रार आपण केली आहे. तसेच राणेंना सन्मानाने राजीनामा द्यायला सांगा अन्यथा त्यांना पक्षातून काढून टाका अशी मागणीही भाजप कोकण विभाग आढावा बैठकीत केली असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे दिली.कणकवली येथील भाजपा जिल्हा संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा चिटणीस रविंद्र शेटये उपस्थित होते.यावेळी प्रमोद जठार म्हणाले, नारायण राणे यांनी भाजपाची खासदारकी घेऊन पक्षावर टिका करणे हे नैतिकतेला धरून नाही. आमच्या पक्षाच्या चिन्हावर खासदार होतात आणि आमच्यावरच टिका करतात. हे योग्य नव्हे. खरोखरच त्याना स्वाभिमान असेल तर त्यानी खासदारकीचा सन्मानाने राजीनामा द्यावा . त्यानंतर बेलाशक टिका करावी .नाणार रिफायनरी प्रकल्पाला ज्यांचा आता विरोध आहे . त्यांनीच तेथील जमिनी विकल्याचे आता समोर येत आहे. शिवसेना आणि स्वाभिमानचेच कार्यकर्ते या जमिनी विक्री व्यवहारात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे भविष्यात हे विरोध करणारेच पुन्हा प्रकल्पाच्या बाजूने उभे रहातील अशी स्थिती आहे. नाणार प्रकल्प नको म्हणणारे बेरोजगार तरूणांच्या जिवाशी खेळत आहेत. असा आरोप प्रमोद जठार यांनी यावेळी केला.शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानाने बाजूला करा !छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते. त्यामुळे राजकीय मतभेद न करता सध्या महामार्गाचे काम सुरू असल्याने कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाने सन्मानाने बाजूला करून ताब्यात घेतला पाहिजे. सध्या प्लास्टिकची पिशवी बांधून शिवाजी महाराजांना ठेवण्यात आले आहे.

या पुतळ्याची विटंबणा किंवा ठेकेदारकडून महामार्गाचे काम करत असताना चुकून नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून पुन्हा वादाची ठिणगी पडू शकते. त्यामुळे महसुल प्रशासन, महामार्ग प्राधिकरण, पोलीस विभागाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने हा पुतळा सुस्थितीत काढून ठेवला पाहिजे. जागा निश्चितीनंतर शिवाजी महाराज यांचा पुतळा सन्मानाने पुन्हा उभा करण्यात यावा .असे प्रमोद जठार यांनी यावेळी सांगितले.20 डिसेंबरला जिल्हा महोत्सव !महाराष्ट्रात सीएम चषकाच्या माध्यमातून 50 लाख तरूण तरूणी क्रीडा महोत्सवात सहभागी झाले आहेत. सिंधुदुर्गात विविध 14 प्रकारच्या स्पर्धांमध्ये 82 हजार 238 तरूण-तरूणींनी सहभाग घेतला आहे. तालुकास्तरीय फेरी पुर्ण झाल्यानंतर आता जिल्हास्तरावरील महोत्सवाचे उद्घाटन 20 डिसेंबर रोजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ओरोस येथे होणार आहे. 500 दुचाकींच्या रॅलीने या स्पर्धेचा शुभारंभ होईल. तर समारोप क्रीडा व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत होईल. सीएम चषक स्पर्धेमुळे भाजपा कार्यकर्त्यांमधील मरगळ कमी झाली असून भविष्यात संघटनात्मक बांधणीसाठी त्यामुळे मदत होणार आहे.असे प्रमोद जठार यांनी सांगितले.जिल्हा कार्यकारिणीत ठराव घेऊ !नारायण राणे टिका प्रकरणी राज्य प्रभारी सरोजीनी पांडे यांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्षांशी चर्चा करण्याचे आश्वासन आपल्याला दिले आहे. या पुढील काळात राणेंनी टिका सुरूच ठेवल्यास जिल्हा कार्यकारिणीत त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा ठराव घेऊन राष्ट्रीय अध्यक्षांकडे पाठविणार असल्याचेही प्रमोद जठार यावेळी म्हणाले.

टॅग्स :Pramod Jatharप्रमोद जठारsindhudurgसिंधुदुर्ग