शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

सिंधुदुर्ग : लागवडीखालील क्षेत्रात घट होण्याची शक्यता, वन्यप्राण्यांचा उपद्रव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 15:22 IST

भात उत्पादनासह वैरणनिर्मिती व शेतबंधाऱ्यांच्या संरक्षणासाठी वायंगणी शेती उपयुक्त आहे. मात्र वन्य प्राण्यांचा उपद्र्रव व पाणीटंचाईमुळे यंदा वायंगणी पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देलागवडीखालील क्षेत्रात घट होण्याची शक्यतावन्यप्राण्यांचा उपद्रव : पाणीटंचाईची समस्या भेडसावणार

कडावल (ता. कुडाळ) : भात उत्पादनासह वैरणनिर्मिती व शेतबंधाऱ्यांच्या संरक्षणासाठी वायंगणी शेती उपयुक्त आहे. मात्र वन्य प्राण्यांचा उपद्र्रव व पाणीटंचाईमुळे यंदा वायंगणी पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भात कापणीनंतर परिसरात वायंगणी भातपेरणी केली जाते. हे पीक प्रामुख्याने पाणथळ म्हणजे शेळ जमिनीत केली जाते. कुसगाव, गिरगाव, नारूर, हिर्लोक, किनळोस, रांगणातुळसुली, निवजे आदी गावांमध्ये शेळ जमिनीचे प्रमाण अधिक असल्याने या गावात पूर्वीपासून वायंगणी पीक घेतले जाते.वायंगणी शेतीपासून मिळणारे गवत मऊशार व उत्कृष्ट दर्जाचे असते. शिवाय या शेतीपासून काही प्रमाणात भात उत्पादन मिळते. खरीप भात पिकाच्या तुलनेत वायंगणी भात पिकापासून मिळणारे उत्पादन कमी असले तरी, भात व विशेषत: उत्कृष्ट दर्जाच्या वैरणीच्या गवतासाठी प्रामुख्याने वायंगणी शेती केली जाते. शेत लागवडीखाली आल्याने गुरांना चरण्यासाठी मोकाट सोडण्याला अटकाव होऊन त्यांच्यापासून शेतबंधाºयांचे होणारे नुकसान टळते. या कारणासाठीही अनेक शेतकरी वायंगणी शेती करतात.भात उत्पादन, वैरण निर्मितीसह शेतमेरांच्या संरक्षणासाठी वायंगणी शेती उपयुक्त असली, तरी विविध कारणांमुळे ही शेती दिवसेंदिवस अडचणीत येत आहे. विशेषत: गेल्या काही वर्षांपासून या शेतीला पाणी टंचाईची झळ बसत आहे. पूर्वी शेळ जमिनीत शिगम्यापर्यंत पाणीसाठा असायचा.

आता मात्र वायंगणी पीक पोटरू अवस्थेत येण्यापूर्वीच शिवारातील पाणी आटून जमिनीला भेगा पडतात. त्यामुळे वायंगणी शेतीचे नुकसान होत आहे. पाण्याच्या समस्येबरोबरच वन्य प्राण्यांच्या उपद्र्रवामुळेही ही शेती संकटात आली आहे. रानडुुक्कर, गवे व माकडांसारख्या प्राण्यांकडून पिकाचे सतत मोठ्या प्रमाणात नुकसान होते.लागवडीखालील क्षेत्र घटणारयंदा पाऊस भरपूर प्रमाणात पडूनही पुढील पाणी टंचाईची समस्या आतापासूनच दृष्टीपथात येत आहे. वहाळांची साखळी आतापासूनच तुटत आहे. शेळ जमिनीतील वाफे कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे पुढील काळात पाणी टंचाई होणार हे अटळ आहे. तसेच वन्य प्राण्यांच्या उपद्र्रवाचे सावटही कायम असल्याने यंदा वायंगणी भात लागवडी खालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग