शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

सिंधुदुर्ग : लागवडीखालील क्षेत्रात घट होण्याची शक्यता, वन्यप्राण्यांचा उपद्रव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 15:22 IST

भात उत्पादनासह वैरणनिर्मिती व शेतबंधाऱ्यांच्या संरक्षणासाठी वायंगणी शेती उपयुक्त आहे. मात्र वन्य प्राण्यांचा उपद्र्रव व पाणीटंचाईमुळे यंदा वायंगणी पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देलागवडीखालील क्षेत्रात घट होण्याची शक्यतावन्यप्राण्यांचा उपद्रव : पाणीटंचाईची समस्या भेडसावणार

कडावल (ता. कुडाळ) : भात उत्पादनासह वैरणनिर्मिती व शेतबंधाऱ्यांच्या संरक्षणासाठी वायंगणी शेती उपयुक्त आहे. मात्र वन्य प्राण्यांचा उपद्र्रव व पाणीटंचाईमुळे यंदा वायंगणी पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भात कापणीनंतर परिसरात वायंगणी भातपेरणी केली जाते. हे पीक प्रामुख्याने पाणथळ म्हणजे शेळ जमिनीत केली जाते. कुसगाव, गिरगाव, नारूर, हिर्लोक, किनळोस, रांगणातुळसुली, निवजे आदी गावांमध्ये शेळ जमिनीचे प्रमाण अधिक असल्याने या गावात पूर्वीपासून वायंगणी पीक घेतले जाते.वायंगणी शेतीपासून मिळणारे गवत मऊशार व उत्कृष्ट दर्जाचे असते. शिवाय या शेतीपासून काही प्रमाणात भात उत्पादन मिळते. खरीप भात पिकाच्या तुलनेत वायंगणी भात पिकापासून मिळणारे उत्पादन कमी असले तरी, भात व विशेषत: उत्कृष्ट दर्जाच्या वैरणीच्या गवतासाठी प्रामुख्याने वायंगणी शेती केली जाते. शेत लागवडीखाली आल्याने गुरांना चरण्यासाठी मोकाट सोडण्याला अटकाव होऊन त्यांच्यापासून शेतबंधाºयांचे होणारे नुकसान टळते. या कारणासाठीही अनेक शेतकरी वायंगणी शेती करतात.भात उत्पादन, वैरण निर्मितीसह शेतमेरांच्या संरक्षणासाठी वायंगणी शेती उपयुक्त असली, तरी विविध कारणांमुळे ही शेती दिवसेंदिवस अडचणीत येत आहे. विशेषत: गेल्या काही वर्षांपासून या शेतीला पाणी टंचाईची झळ बसत आहे. पूर्वी शेळ जमिनीत शिगम्यापर्यंत पाणीसाठा असायचा.

आता मात्र वायंगणी पीक पोटरू अवस्थेत येण्यापूर्वीच शिवारातील पाणी आटून जमिनीला भेगा पडतात. त्यामुळे वायंगणी शेतीचे नुकसान होत आहे. पाण्याच्या समस्येबरोबरच वन्य प्राण्यांच्या उपद्र्रवामुळेही ही शेती संकटात आली आहे. रानडुुक्कर, गवे व माकडांसारख्या प्राण्यांकडून पिकाचे सतत मोठ्या प्रमाणात नुकसान होते.लागवडीखालील क्षेत्र घटणारयंदा पाऊस भरपूर प्रमाणात पडूनही पुढील पाणी टंचाईची समस्या आतापासूनच दृष्टीपथात येत आहे. वहाळांची साखळी आतापासूनच तुटत आहे. शेळ जमिनीतील वाफे कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे पुढील काळात पाणी टंचाई होणार हे अटळ आहे. तसेच वन्य प्राण्यांच्या उपद्र्रवाचे सावटही कायम असल्याने यंदा वायंगणी भात लागवडी खालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग