शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सिंधुदुर्ग : लागवडीखालील क्षेत्रात घट होण्याची शक्यता, वन्यप्राण्यांचा उपद्रव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 15:22 IST

भात उत्पादनासह वैरणनिर्मिती व शेतबंधाऱ्यांच्या संरक्षणासाठी वायंगणी शेती उपयुक्त आहे. मात्र वन्य प्राण्यांचा उपद्र्रव व पाणीटंचाईमुळे यंदा वायंगणी पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देलागवडीखालील क्षेत्रात घट होण्याची शक्यतावन्यप्राण्यांचा उपद्रव : पाणीटंचाईची समस्या भेडसावणार

कडावल (ता. कुडाळ) : भात उत्पादनासह वैरणनिर्मिती व शेतबंधाऱ्यांच्या संरक्षणासाठी वायंगणी शेती उपयुक्त आहे. मात्र वन्य प्राण्यांचा उपद्र्रव व पाणीटंचाईमुळे यंदा वायंगणी पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भात कापणीनंतर परिसरात वायंगणी भातपेरणी केली जाते. हे पीक प्रामुख्याने पाणथळ म्हणजे शेळ जमिनीत केली जाते. कुसगाव, गिरगाव, नारूर, हिर्लोक, किनळोस, रांगणातुळसुली, निवजे आदी गावांमध्ये शेळ जमिनीचे प्रमाण अधिक असल्याने या गावात पूर्वीपासून वायंगणी पीक घेतले जाते.वायंगणी शेतीपासून मिळणारे गवत मऊशार व उत्कृष्ट दर्जाचे असते. शिवाय या शेतीपासून काही प्रमाणात भात उत्पादन मिळते. खरीप भात पिकाच्या तुलनेत वायंगणी भात पिकापासून मिळणारे उत्पादन कमी असले तरी, भात व विशेषत: उत्कृष्ट दर्जाच्या वैरणीच्या गवतासाठी प्रामुख्याने वायंगणी शेती केली जाते. शेत लागवडीखाली आल्याने गुरांना चरण्यासाठी मोकाट सोडण्याला अटकाव होऊन त्यांच्यापासून शेतबंधाºयांचे होणारे नुकसान टळते. या कारणासाठीही अनेक शेतकरी वायंगणी शेती करतात.भात उत्पादन, वैरण निर्मितीसह शेतमेरांच्या संरक्षणासाठी वायंगणी शेती उपयुक्त असली, तरी विविध कारणांमुळे ही शेती दिवसेंदिवस अडचणीत येत आहे. विशेषत: गेल्या काही वर्षांपासून या शेतीला पाणी टंचाईची झळ बसत आहे. पूर्वी शेळ जमिनीत शिगम्यापर्यंत पाणीसाठा असायचा.

आता मात्र वायंगणी पीक पोटरू अवस्थेत येण्यापूर्वीच शिवारातील पाणी आटून जमिनीला भेगा पडतात. त्यामुळे वायंगणी शेतीचे नुकसान होत आहे. पाण्याच्या समस्येबरोबरच वन्य प्राण्यांच्या उपद्र्रवामुळेही ही शेती संकटात आली आहे. रानडुुक्कर, गवे व माकडांसारख्या प्राण्यांकडून पिकाचे सतत मोठ्या प्रमाणात नुकसान होते.लागवडीखालील क्षेत्र घटणारयंदा पाऊस भरपूर प्रमाणात पडूनही पुढील पाणी टंचाईची समस्या आतापासूनच दृष्टीपथात येत आहे. वहाळांची साखळी आतापासूनच तुटत आहे. शेळ जमिनीतील वाफे कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे पुढील काळात पाणी टंचाई होणार हे अटळ आहे. तसेच वन्य प्राण्यांच्या उपद्र्रवाचे सावटही कायम असल्याने यंदा वायंगणी भात लागवडी खालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग