शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

सिंधुदुर्ग : केंद्र ब्रेक वॉटर हार्बर योजना राबविणार : राजन तेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 13:20 IST

कोकणला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्रकिनाऱ्याचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा यासाठी आता केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गमधील तीन समुद्र किनाऱ्यांवर ब्रेक वॉटर हार्बर या प्रकल्पाला तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देकेंद्र ब्रेक वॉटर हार्बर योजना राबविणार : राजन तेलीवेंगुर्ले समुद्रातील गाळ काढणार

सावंतवाडी : कोकणला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्रकिनाऱ्याचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा यासाठी आता केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गमधील तीन समुद्र किनाऱ्यांवर ब्रेक वॉटर हार्बर या प्रकल्पाला तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे.

वेंगुर्ले, निवती व वेळागर या तीन समुद्र किनाऱ्यांवरचा गाळ काढण्यात येणार असून याचा मोठा फायदा मच्छिमारांना होणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार राजन तेली यांनी सावंतवाडीत  दिली.राजन तेली यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन प्रस्ताव दिला होता. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजन म्हापसेकर उपस्थित होते. तेली म्हणाले, सिंधुदुर्गचे समुद्रकिनारे हे स्वच्छ आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक सिंधुदुर्गमध्ये येत असतात. त्यातून या समुद्र किनाऱ्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री प्रभू यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी या किनाऱ्यांवर ब्रेक वॉटर हार्बर ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यात पहिल्या टप्प्यात वेंगुर्ले, निवती व वेळागर या तीन समुद्र किनाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यात या समुद्र किनाऱ्यांवरील गाळ काढण्यात येणार आहे. याचा सर्वाधिक फायदा मच्छिमारांना होणार आहे.समुद्रातील गाळ काढल्याने देवगड समुद्रात सुरक्षिततेच्या दृष्टीने ज्या बोटी ठेवल्या जातात, त्या या समुद्रातही ठेवण्यात येऊ शकतात. अनेक बोटींना थांबा मिळू शकतो. मच्छिमारांच्या बोटीही आतमध्ये जाऊ शकतात. तसेच गाळ काढल्यानंतर लाटा थांबविण्यातही यश येऊ शकते. यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असून, केंद्र सरकार या माध्यमातून देशात पाच हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.७२० किलोमीटरचा समुद्र लाभल्याने याचा मोठा फायदा कोकणला होणार आहे आणि येथील पर्यटन वाढण्यासही मदत होणार आहे. केंद्रीय मंत्री प्रभू यांनी पहिल्या टप्प्यात या प्रकल्पाची घोषणा केली असली तरी, याबाबतची बैठक महाराष्ट्राचे अधिवेशन संपल्यानंतर होणार आहे. त्यानंतर त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल, अशी माहितीही तेली यांनी दिली आहे. 

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभूsindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली