शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

सिंधुदुर्ग : आरोग्य यंत्रणेचा बोजवारा; तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी : परशुराम उपरकर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 15:05 IST

कणकवली उपजिल्हा रुग्णालय हे प्रथमोपचार केंद्र झाले आहे. गेल्या सहा वर्षात एकही नवीन डॉक्टर या रुग्णालयाला देण्यात आलेला नाही. दुसरीकडे चांगली सेवा देणाऱ्या डॉक्टरांनाही मुदतवाढ दिली जात नाही. यामुळे आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. याकडे आमदार, खासदार आणि पालकमंत्री यांचेही साफ दुर्लक्ष झाल्याचा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणेचा बोजवारा; तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी उपजिल्हा रुग्णालयाकडे पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष : परशुराम उपरकर यांची टीका

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालय हे प्रथमोपचार केंद्र झाले आहे. गेल्या सहा वर्षात एकही नवीन डॉक्टर या रुग्णालयाला देण्यात आलेला नाही. दुसरीकडे चांगली सेवा देणाऱ्या डॉक्टरांनाही मुदतवाढ दिली जात नाही. यामुळे आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. याकडे आमदार, खासदार आणि पालकमंत्री यांचेही साफ दुर्लक्ष झाल्याचा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे.मनसे कार्यकर्त्यांसह उपरकर यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तसेच प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. सि. एम. शिकलगार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत पत्रकारांना माहिती दिली. यावेळी ते बोलत होते.

उपरकर म्हणाले, रुग्णालयातील डॉ. ज्ञानेश्वर सोडल यांची सेवा सन २०१२ मध्ये बंद झाली. त्यानंतर या रुग्णालयाला उतरती कळा लागली आहे. गेल्या सहा वर्षात येथे एकही तज्ज्ञ डॉक्टर देण्यात आलेला नाही. गेले तीन वर्षे डॉ. महेंद्र्र आचरेकर यांनी एक हाती उपजिल्हा रुग्णालय सांभाळले होते. पण त्यांची इच्छा असतानाही त्यांना सेवेची मुदत वाढवून देण्यात आलेली नाही.कणकवली उपजिल्हा रुग्णालयात फक्त ४ डॉक्टर्स आहेत. त्यामुळे सध्या तापसरीसह अपघात व इतर आजारांचे रुग्ण थेट जिल्हा रुग्णालयात पाठविले जातात. तालुक्यातील रुग्णांची आबाळ होऊ नये यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत बालरोगतज्ज्ञ, सर्जन आदी डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. पण हे डॉक्टर देखील रुग्णालयात फिरकत नाहीत. त्यामुळे येथे कोणी वालीच राहिलेले नाही.

राज्य शासनाने आणि आमदार , खासदार आणि पालकमंत्र्यानीही कणकवली उपजिल्हा रुग्णालय वाऱ्यावर सोडले आहे. तिन वर्षापूर्वी उपजिल्हा रुग्णालयात खासदार विनायक राऊत यांनी अपंगाचा मेळावा घेतला. यातील पात्र रुग्णांसाठी ४० व्हीलचेअर आणि काठया असे साहित्य आले. मात्र हे साहित्य गेली तीन वर्षे रुग्णालयात धूळ खात आहे. त्यांचे वाटप करण्यास उपजिल्हा रुग्णालय प्रशासन आणि खासदारानाही वेळ नाही.

या रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे. गेल्या दोन वर्षात हाफकिन संस्थेकडून औषधांची खरेदी झालेली नाही. याबाबत आरोग्य संचालक आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क साधला असता या दोघांनीहि आज आमच्या सेवेचा शेवटचा दिवस आहे असे सांगून वेळ मारून नेली.उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती आणि फ्रॅक्चरसाठी आलेले रुग्ण परस्पर खासगी रुग्णालयात पाठविले जातात. वस्तुत: उपजिल्हा रुग्णालयात उपचार होत नसतील तर त्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठविणे आवश्यक असते. परंतु, साटेलोटे प्रकार असल्याने हे रुग्ण ठराविक खासगी रुग्णालयात पाठविले जातात. असा आरोप देखील उपरकर यांनी यावेळी केला. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर