शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

सिंधुदुर्ग : आरोग्य यंत्रणेचा बोजवारा; तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी : परशुराम उपरकर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 15:05 IST

कणकवली उपजिल्हा रुग्णालय हे प्रथमोपचार केंद्र झाले आहे. गेल्या सहा वर्षात एकही नवीन डॉक्टर या रुग्णालयाला देण्यात आलेला नाही. दुसरीकडे चांगली सेवा देणाऱ्या डॉक्टरांनाही मुदतवाढ दिली जात नाही. यामुळे आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. याकडे आमदार, खासदार आणि पालकमंत्री यांचेही साफ दुर्लक्ष झाल्याचा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणेचा बोजवारा; तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी उपजिल्हा रुग्णालयाकडे पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष : परशुराम उपरकर यांची टीका

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालय हे प्रथमोपचार केंद्र झाले आहे. गेल्या सहा वर्षात एकही नवीन डॉक्टर या रुग्णालयाला देण्यात आलेला नाही. दुसरीकडे चांगली सेवा देणाऱ्या डॉक्टरांनाही मुदतवाढ दिली जात नाही. यामुळे आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. याकडे आमदार, खासदार आणि पालकमंत्री यांचेही साफ दुर्लक्ष झाल्याचा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे.मनसे कार्यकर्त्यांसह उपरकर यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तसेच प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. सि. एम. शिकलगार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत पत्रकारांना माहिती दिली. यावेळी ते बोलत होते.

उपरकर म्हणाले, रुग्णालयातील डॉ. ज्ञानेश्वर सोडल यांची सेवा सन २०१२ मध्ये बंद झाली. त्यानंतर या रुग्णालयाला उतरती कळा लागली आहे. गेल्या सहा वर्षात येथे एकही तज्ज्ञ डॉक्टर देण्यात आलेला नाही. गेले तीन वर्षे डॉ. महेंद्र्र आचरेकर यांनी एक हाती उपजिल्हा रुग्णालय सांभाळले होते. पण त्यांची इच्छा असतानाही त्यांना सेवेची मुदत वाढवून देण्यात आलेली नाही.कणकवली उपजिल्हा रुग्णालयात फक्त ४ डॉक्टर्स आहेत. त्यामुळे सध्या तापसरीसह अपघात व इतर आजारांचे रुग्ण थेट जिल्हा रुग्णालयात पाठविले जातात. तालुक्यातील रुग्णांची आबाळ होऊ नये यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत बालरोगतज्ज्ञ, सर्जन आदी डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. पण हे डॉक्टर देखील रुग्णालयात फिरकत नाहीत. त्यामुळे येथे कोणी वालीच राहिलेले नाही.

राज्य शासनाने आणि आमदार , खासदार आणि पालकमंत्र्यानीही कणकवली उपजिल्हा रुग्णालय वाऱ्यावर सोडले आहे. तिन वर्षापूर्वी उपजिल्हा रुग्णालयात खासदार विनायक राऊत यांनी अपंगाचा मेळावा घेतला. यातील पात्र रुग्णांसाठी ४० व्हीलचेअर आणि काठया असे साहित्य आले. मात्र हे साहित्य गेली तीन वर्षे रुग्णालयात धूळ खात आहे. त्यांचे वाटप करण्यास उपजिल्हा रुग्णालय प्रशासन आणि खासदारानाही वेळ नाही.

या रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे. गेल्या दोन वर्षात हाफकिन संस्थेकडून औषधांची खरेदी झालेली नाही. याबाबत आरोग्य संचालक आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क साधला असता या दोघांनीहि आज आमच्या सेवेचा शेवटचा दिवस आहे असे सांगून वेळ मारून नेली.उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती आणि फ्रॅक्चरसाठी आलेले रुग्ण परस्पर खासगी रुग्णालयात पाठविले जातात. वस्तुत: उपजिल्हा रुग्णालयात उपचार होत नसतील तर त्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठविणे आवश्यक असते. परंतु, साटेलोटे प्रकार असल्याने हे रुग्ण ठराविक खासगी रुग्णालयात पाठविले जातात. असा आरोप देखील उपरकर यांनी यावेळी केला. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर