शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : बांदा-सटमटवाडी परिसरात गव्यांचा उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 18:11 IST

बांदा-सटमटवाडी परिसरात गव्यांनी उच्छाद मांडला असून शेतकऱ्यांच्या शेती बागायतींचे ते अतोनात नुकसान करीत आहेत. या परिसरात तब्बल ३० रानटी गव्यांचा कळप आहे. या गव्यांचा बंदोबस्त वनखात्याने करावा, अन्यथा शेतीच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांच्या बागायतीला कुंपण घालून द्यावे, अशी मागणी बांदा वनपाल एस. एस. शिरगावकर यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देबांदा-सटमटवाडी परिसरात गव्यांचा उच्छादवनखात्याने बंदोबस्त करण्याची मागणी

बांदा : बांदा-सटमटवाडी परिसरात गव्यांनी उच्छाद मांडला असून शेतकऱ्यांच्या शेती बागायतींचे ते अतोनात नुकसान करीत आहेत. या परिसरात तब्बल ३० रानटी गव्यांचा कळप आहे. या गव्यांचा बंदोबस्त वनखात्याने करावा, अन्यथा शेतीच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांच्या बागायतीला कुंपण घालून द्यावे, अशी मागणी बांदा वनपाल एस. एस. शिरगावकर यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे.सटमटवाडी येथे मेहनतीने शेतकऱ्यांनी बागायती फुलविल्या आहेत. याठिकाणी काजू, सुपारी, नारळ बागायती मोठ्या प्रमाणात असून शेतकरी बागायतीमध्ये आंतरपीकदेखील मोठ्या प्रमाणात घेतात. तसेच उन्हाळी भाजीपाला, नाचणी, मिरची लागवड शेतकऱ्यांकडून करण्यात येते.

शेतीबरोबरच काजू, सुपारीची कलमेदेखील गव्यांकडून मोडण्यात येत असल्याने शेतकरी गव्यांच्या त्रासामुळे त्रस्त झाले आहेत. गव्यांच्या कळपाचे दिवसादेखील बागायतीमध्ये दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांना बागायतीमध्ये जाणेही जिकीरीचे ठरत आहे.गव्यांकडून होणाऱ्या नुकसानीबाबत स्थानिक शेतकरी बाबी वसकर आणि सुभाष परब यांनी बांदा वनपाल एस. एस. शिरगावकर यांची भेट घेतली. गेल्या दोन महिन्यांत गव्यांनी शेती बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याचे सांगितले. येथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवर असल्याने आम्हांला नुुकसानभरपाई नको, मात्र शेतकऱ्यांच्या बागायतीला संरक्षक कुंपण करुन द्या अशी मागणी करण्यात आली.

वनपाल शिरगावकर यांनी आपल्या भावना वरिष्ठांना कळवू, गव्यांना बागायतीतून हुसकावून लावण्यासाठी वनखात्यामार्फत प्रयत्न केले जातील. त्यासाठी वनकर्मचारी पाठविण्याचे आश्वासन शिरगावकर यांनी शेतकऱ्यांना दिले.गतवर्षी सटमटवाडी परिसरात माकडतापाची साथ असल्याने शेतकऱ्यांनी शेती बागायतीकडे दुर्लक्ष केले होते. शेतीतून मिळणाºया वर्षभराच्या कमाईवर पाणी सोडल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी शेती बागायतीकडे पूर्ण लक्ष देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यावर्षी गव्यांनी या परिसरात उच्छाद मांडल्याने शेतकरी आर्थिक मेटाकुटीस आले आहेत.

बांदा-सटमटवाडी येथे गव्यांनी काजू कलमांचे मोठे नुकसान केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग