शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सिंधुदुर्ग : बांदा-सटमटवाडी परिसरात गव्यांचा उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 18:11 IST

बांदा-सटमटवाडी परिसरात गव्यांनी उच्छाद मांडला असून शेतकऱ्यांच्या शेती बागायतींचे ते अतोनात नुकसान करीत आहेत. या परिसरात तब्बल ३० रानटी गव्यांचा कळप आहे. या गव्यांचा बंदोबस्त वनखात्याने करावा, अन्यथा शेतीच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांच्या बागायतीला कुंपण घालून द्यावे, अशी मागणी बांदा वनपाल एस. एस. शिरगावकर यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देबांदा-सटमटवाडी परिसरात गव्यांचा उच्छादवनखात्याने बंदोबस्त करण्याची मागणी

बांदा : बांदा-सटमटवाडी परिसरात गव्यांनी उच्छाद मांडला असून शेतकऱ्यांच्या शेती बागायतींचे ते अतोनात नुकसान करीत आहेत. या परिसरात तब्बल ३० रानटी गव्यांचा कळप आहे. या गव्यांचा बंदोबस्त वनखात्याने करावा, अन्यथा शेतीच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांच्या बागायतीला कुंपण घालून द्यावे, अशी मागणी बांदा वनपाल एस. एस. शिरगावकर यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे.सटमटवाडी येथे मेहनतीने शेतकऱ्यांनी बागायती फुलविल्या आहेत. याठिकाणी काजू, सुपारी, नारळ बागायती मोठ्या प्रमाणात असून शेतकरी बागायतीमध्ये आंतरपीकदेखील मोठ्या प्रमाणात घेतात. तसेच उन्हाळी भाजीपाला, नाचणी, मिरची लागवड शेतकऱ्यांकडून करण्यात येते.

शेतीबरोबरच काजू, सुपारीची कलमेदेखील गव्यांकडून मोडण्यात येत असल्याने शेतकरी गव्यांच्या त्रासामुळे त्रस्त झाले आहेत. गव्यांच्या कळपाचे दिवसादेखील बागायतीमध्ये दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांना बागायतीमध्ये जाणेही जिकीरीचे ठरत आहे.गव्यांकडून होणाऱ्या नुकसानीबाबत स्थानिक शेतकरी बाबी वसकर आणि सुभाष परब यांनी बांदा वनपाल एस. एस. शिरगावकर यांची भेट घेतली. गेल्या दोन महिन्यांत गव्यांनी शेती बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याचे सांगितले. येथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवर असल्याने आम्हांला नुुकसानभरपाई नको, मात्र शेतकऱ्यांच्या बागायतीला संरक्षक कुंपण करुन द्या अशी मागणी करण्यात आली.

वनपाल शिरगावकर यांनी आपल्या भावना वरिष्ठांना कळवू, गव्यांना बागायतीतून हुसकावून लावण्यासाठी वनखात्यामार्फत प्रयत्न केले जातील. त्यासाठी वनकर्मचारी पाठविण्याचे आश्वासन शिरगावकर यांनी शेतकऱ्यांना दिले.गतवर्षी सटमटवाडी परिसरात माकडतापाची साथ असल्याने शेतकऱ्यांनी शेती बागायतीकडे दुर्लक्ष केले होते. शेतीतून मिळणाºया वर्षभराच्या कमाईवर पाणी सोडल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी शेती बागायतीकडे पूर्ण लक्ष देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यावर्षी गव्यांनी या परिसरात उच्छाद मांडल्याने शेतकरी आर्थिक मेटाकुटीस आले आहेत.

बांदा-सटमटवाडी येथे गव्यांनी काजू कलमांचे मोठे नुकसान केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग