शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

सिंधुदुर्ग: बांबू हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पिक : के मंजुलक्ष्मी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 17:25 IST

कमी कालावधीमध्ये चांगले उत्पादन मिळवून देणारे बांबू हे पिक आहे. जिल्ह्यातील वातावरणामध्ये बांबूचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल असा विश्वास जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये आयोजित बांबू लागवड व उत्पादन तंत्रज्ञान कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देबांबू हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पिक : के मंजुलक्ष्मी सिंधुदुर्गनगरीत बांबू लागवड, उत्पादन तंत्रज्ञान कार्यशाळा

सिंधुदुर्गनगरी : कमी कालावधीमध्ये चांगले उत्पादन मिळवून देणारे बांबू हे पिक आहे. जिल्ह्यातील वातावरणामध्ये बांबूचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल असा विश्वास जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये आयोजित बांबू लागवड व उत्पादन तंत्रज्ञान कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष रणजीत देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पराडकर, कमलाकर रणदिवे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, बांबू लागवडीविषयी मार्गदर्शक मिलिंद पाटील आणि कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.२0१८-१९ मध्ये बांबू लागवड अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगून के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या की, या अभियानासाठी ग्राम पातळीवरचे नियोजन महत्वाचे आहे. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी यासाठीचा परिपूर्ण नियोजन अराखडा तयार करावा. बांबूच्या जाती त्यांचे उत्पादन आणि त्यांचा शेतकऱ्यांना मिळणारा लाभ याचे नियोजन तयार करावे. त्यामुळे अभियान यशस्वीरित्या पूर्ण करता येईल.

१0 डिसेंबर पर्यंत तालुका स्तरावर बांबू लागवडी विषयी कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. त्यामाध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवली जाणार आहे. ४ लाख बांबू लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश जगताप यांनी या अभियानाची थोडक्यात महिती दिली. तर मिलिंद पाटील यांनी बांबू लागवडी विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच जिल्ह्यातील बांबूची लागवड, त्याचे अर्थकारण व फायदेही सांगितले.उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी प्रस्तावनेत बांबू लागवड व उत्पादन तंत्रज्ञान कार्यशाळेचा उद्देश व या अभियानाची माहिती दिली.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी शेतकऱ्यांसाठी हे अभियान उपयुक्त ठरणार असून त्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार असल्याचे सांगून या अभियानासाठी शुभच्छा दिल्या. सुरुवातील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. 

टॅग्स :Governmentसरकारcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग