शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

सिंधुदुर्ग : शहीद जवानाची अमर कहाणी, चौकुळमधील सैनिकाचा तीस वर्षांनंतर उलगडला इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 11:57 IST

आंबोलीपासून १० किलोमीटर अंतरावरील सुंदर, निसर्गसंपन्न अशा चौकुळ गावाची ओळख सैनिकांचे गाव म्हणूनही आहे. देशसेवा बजावताना काही सैनिकांना गंभीर दुखापती झाल्या, तर काही शहीदही झाले. अशाच एका वीर सैनिकाला शहीद होऊन ४ मार्चला तीस वर्षे पूर्ण होत आहेत. रामचंद्र सोमा गावडे (चौकुळ-केगदवाडी) असे या शहीद सैनिकाचे नाव असून, त्यांची ही अमर कहाणी.

ठळक मुद्देशहीद जवानाची अमर कहाणीचौकुळमधील सैनिकाचा तीस वर्षांनंतर उलगडला इतिहास

महादेव भिसे 

आंबोली : आंबोलीपासून १० किलोमीटर अंतरावरील सुंदर, निसर्गसंपन्न अशा चौकुळ गावाची ओळख सैनिकांचे गाव म्हणूनही आहे. गावातील पन्नास टक्के लोक आज सैन्यामध्ये आहेत. गेली ९० वर्षे येथील लोक भारतीय सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करीत आहेत. देशसेवा बजावताना काही सैनिकांना गंभीर दुखापती झाल्या, तर काही शहीदही झाले. अशाच एका वीर सैनिकाला शहीद होऊन ४ मार्चला तीस वर्षे पूर्ण होत आहेत. रामचंद्र सोमा गावडे (चौकुळ-केगदवाडी) असे या शहीद सैनिकाचे नाव असून, त्यांची ही अमर कहाणी.चौकुळ-केगदवाडी म्हणजे अतिशय दुर्गम भाग. ज्या भागात त्याकाळी वाहन सोडाच, चालत जाणेसुद्धा कठीण होते. चौकुळ ते केगदवाडी हे अंतर जवळपास पाच किलोमीटरचे आहे. या दरम्यान आपल्याला यायचे-जायचे असल्यास त्या काळी पायीच जावे लागत असे. घनदाट जंगलातून येत-जात असताना अस्वल, वाघ, बिबट्या यांसारख्या श्वापदांची भीती होती. त्यावरही मात करीत त्या काळी, म्हणजे सन १९५५-५६ च्या दरम्यान रामचंद्र गावडे यांनी तिसरीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर मोलमजुरी, शेती यावर आपली उपजीविका चालविली.

शहीद जवान रामचंद्र गावडेच्या पत्नी सीता गावडेरामचंद्र गावडे यांची घरची परिस्थिती बेताची होती. मिरची-भाकरी किंवा काळे मीठ आणि भाकरी खाऊन त्यांचे कुटुंब राहत होते. एक भाऊ आणि सहा बहिणी असा त्यांचा भला मोठा परिवार होता. त्या सगळ्यांची उपजीविका चालविण्याची मुख्य जबाबदारी रामचंद्र यांच्यावरच होती. याशिवाय पत्नी आणि तीन मुले. पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा गावडे यांचा परिवार. त्यांच्या पत्नी सीता गावडे यांनी या दुर्गम भागात अतिशय हालअपेष्टा सोसून आपल्या तीन मुलांचे पालनपोषणही व्यवस्थित केले.१९८८ साली श्रीलंका येथे शांती सेनेसोबत कर्तव्य बजावत असताना एका स्फोटामध्ये ते शहीद झाले. हा स्फोट इतका भयंकर होता की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव सुद्धा भारतात आणता आले नाही किंवा त्यांच्या कुटुंबालाही त्यांचे अंत्यदर्शन घेता आले नाही.ही बातमी त्यांच्या कुटुंबाला कळताच सीता गावडे यांच्यावर आभाळच कोसळले. सुनील, शिल्पा व लहानगी शितल या दोन ते आठ वर्षे वयोगटातील लहान मुलांचे काय होणार, या चिंतेने त्या स्तब्ध झाल्या. मात्र या कठीण परिस्थितीवरही त्यांनी हिमतीने मात केली. तिन्ही मुलांना चांगले शिक्षण देत स्वत:च्या पायावर उभे केले आणि वीर सैनिकाची पत्नीही वीर असते याची प्रचितीच जणू जगाला दिली.

४ मार्च रोजी रामचंद्र गावडे या वीर शहीद जवानाच्या बलिदानाला तीस वर्षे पूर्ण होत आहेत. चौकुळ गावाला रामचंद्र्र गावडे आणि त्यांच्यासारख्या अनेक शहीद जवानांनी पवित्र केले आहे. त्यांचे हे बलिदान हा समाज अखंड लक्षात ठेवेल. वीर शहीद जवान रामचंद्र्र गावडे यांना मानाचा मुजरा!१९७४ साली सैन्यात भरतीत्याकाळी चौकुळ गावातील बहुतांश लोक बेळगाव येथे कामाला जात असत. वयाच्या अठराव्या वर्षी रामचंद्र गावडे हेही बेळगाव येथे कामानिमित्त (हॉटेलमध्ये) गेले. त्याकाळी सैन्यात भरती होण्यासाठी शिक्षणाची कोणतीही अट नसल्याने आपले नशीब आजमावण्यासाठी त्यांनीही सैनिक भरती प्रक्रियेत सहभाग घेतला आणि लगेच सैन्यात भरतीही झाले. १९७४ साली ते सैन्यात भरती झाले. त्यानंतर १९७९ मध्ये त्यांचा विवाह सीता गावडे यांच्याशी झाला.सीता गावडे यांनी परिवार सांभाळलारामचंद्र गावडे यांची घरची परिस्थिती बेताची होती. त्यांचा भला मोठा परिवार होता. त्यांच्या पत्नी सीता गावडे यांनी या दुर्गम भागात अतिशय हालअपेष्टा सोसून आपल्या तीन मुलांचे पालनपोषणही व्यवस्थित केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग