शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

रोजगारातही सिंधुदुर्ग धरतो गोव्याची कास, अनेक प्रकल्प बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 18:15 IST

sindhudurg News- सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यांमध्ये रोजगार निर्मितीसाठी प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात युवकांना रोजगाराची प्रतीक्षा असल्याचे दिसून येत आहे. अनेक प्रकल्प रखडल्याने युवकवर्ग नाराज आहे. त्यामुळे आरोग्याप्रमाणे रोजगारातही सिंधुदुर्गला गोव्याची कास धरावी लागत आहे.

ठळक मुद्देरोजगारातही सिंधुदुर्ग धरतो गोव्याची कास, अनेक प्रकल्प बंद संपादित केलेल्या जमिनी पडून; आरोग्याबाबतही तीच स्थिती

अनंत जाधवसावंतवाडी : सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यांमध्ये रोजगार निर्मितीसाठी प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात युवकांना रोजगाराची प्रतीक्षा असल्याचे दिसून येत आहे. अनेक प्रकल्प रखडल्याने युवकवर्ग नाराज आहे. त्यामुळे आरोग्याप्रमाणे रोजगारातही सिंधुदुर्गला गोव्याची कास धरावी लागत आहे.दोडामार्ग तालुक्यात आडाळी एमआयडीसी, सावंतवाडी तालुक्यात उत्तम स्टील अँड पॉवर प्रकल्प, आरोंदा किरणपाणी पोर्ट, वाफोली चष्मा प्रकल्प आणि अन्य प्रकल्प, सावंतवाडी रेल्वे टर्मिनस, वेंगुर्ला तालुक्यातील रेडी पोर्ट, टाटा मेटॅलिक प्रकल्प बहुचर्चित राहिले. बेकारांना नोकऱ्या देणार असे स्वप्न रंगविले. पण प्रत्यक्षात स्वप्नभंग झाला.

उत्तम स्टील अँड पॉवर प्रकल्पासाठी सुमारे दोन हजार एकर जमीन सातार्डा, सातोसे, मडुरा येथे संपादित केली आहे. तसेच टाटा मेटॅलिक प्रकल्प रेडी येथे सुरू होता. तो बंद झाल्याने तेथेही जमीन पडून आहे. माजी अर्थमंत्री प्रा. मधु दंडवते यांनी रेडी येथे इस्पात कंपनीचा प्रकल्प सुरू केला होता. तो प्रकल्प बंद झाल्यानंतर तेथे टाटा मेटॅलिक प्रकल्प सुरू झाला. त्यामुळे तोही प्रकल्प बंद झाला. तो प्रकल्प सुरू करण्यासाठी बेरोजगार व टाटा मेटॅलिकमध्ये नोकरी असणाऱ्या लोकांनी सतत प्रयत्न केले. मात्र, प्रकल्प होऊ शकला नाही.रेडी समुद्राच्या जवळ टाटा मेटॅलिक प्रकल्प होता. गोवा, तेरेखोल किल्ला जवळ असणाऱ्या या प्रकल्पामुळे रोजगार निर्माण होत होता. तसेच रेडी, शिरोडा, आरोंदा भागांमध्ये अप्रत्यक्ष व्यवसाय व रोजगाराची दालने खुली झाली होती. मात्र, बंद झालेला प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी आश्वासनापलीकडे फक्त राजकीय चर्चा झाली.

रेडी पोर्ट या सुमारे पाच हजार कोटींच्या ह्यबांधा वापरा आणि हस्तांतरित कराह्ण प्रकल्पाची घोषणा झाली. रेडी पोर्ट खासगी विकासकाकडे हस्तांतरित करण्यात आले. त्यानंतर या विकासकांनी याठिकाणी काय विकास केला व किती लोकांना रोजगार दिला, याचा लेखाजोखा मांडला गेला पाहिजे. प्रत्यक्षात रेडी पोर्ट विकसित झाले नाही. मात्र, शासनाचे मेरिटाईम बोर्ड रेडी पोर्ट खनिज वाहतूक करण्यासाठी चालवित होते. ते खासगी विकासकाकडे गेल्याने निर्यात फायदा झाला.रोजगार निर्माण करणारे प्रकल्पच उभे राहिले नाहीतबांदा, वाफोली याठिकाणी खासगी कंपनीच्या माध्यमातून चष्मा प्रकल्प आणि अन्य प्रकल्प उभे राहणार होते. मात्र, तेही उभे राहू शकले नाहीत. या प्रकल्पांच्या घोषणा आणि चर्चा झाल्या. सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यांमधील नमूद केलेले प्रकल्प उभे राहिले असते तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार होता. मात्र, घोषणाबाजी करून जमिनी संपादित केल्या. प्रत्यक्षात रोजगार निर्माण करणारे प्रकल्प उभे राहिले नाहीत. त्यामुळे तरुणवर्गाला गोवा, मुंबई व अन्य ठिकाणी जावे लागत आहे.जनतेच्या पदरी उपेक्षाचसिंधुदुर्गाने महाराष्ट्रालाच नाही तर देशाला अनेक नेते दिले. मात्र, येथील जनतेच्या पदरात उपेक्षाच आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, दीपक केसरकर, प्रवीण भोसले असे एकापेक्षा एक नेते सध्या कार्यरत आहेत.

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्गgoaगोवा