शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

रोजगारातही सिंधुदुर्ग धरतो गोव्याची कास, अनेक प्रकल्प बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 18:15 IST

sindhudurg News- सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यांमध्ये रोजगार निर्मितीसाठी प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात युवकांना रोजगाराची प्रतीक्षा असल्याचे दिसून येत आहे. अनेक प्रकल्प रखडल्याने युवकवर्ग नाराज आहे. त्यामुळे आरोग्याप्रमाणे रोजगारातही सिंधुदुर्गला गोव्याची कास धरावी लागत आहे.

ठळक मुद्देरोजगारातही सिंधुदुर्ग धरतो गोव्याची कास, अनेक प्रकल्प बंद संपादित केलेल्या जमिनी पडून; आरोग्याबाबतही तीच स्थिती

अनंत जाधवसावंतवाडी : सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यांमध्ये रोजगार निर्मितीसाठी प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात युवकांना रोजगाराची प्रतीक्षा असल्याचे दिसून येत आहे. अनेक प्रकल्प रखडल्याने युवकवर्ग नाराज आहे. त्यामुळे आरोग्याप्रमाणे रोजगारातही सिंधुदुर्गला गोव्याची कास धरावी लागत आहे.दोडामार्ग तालुक्यात आडाळी एमआयडीसी, सावंतवाडी तालुक्यात उत्तम स्टील अँड पॉवर प्रकल्प, आरोंदा किरणपाणी पोर्ट, वाफोली चष्मा प्रकल्प आणि अन्य प्रकल्प, सावंतवाडी रेल्वे टर्मिनस, वेंगुर्ला तालुक्यातील रेडी पोर्ट, टाटा मेटॅलिक प्रकल्प बहुचर्चित राहिले. बेकारांना नोकऱ्या देणार असे स्वप्न रंगविले. पण प्रत्यक्षात स्वप्नभंग झाला.

उत्तम स्टील अँड पॉवर प्रकल्पासाठी सुमारे दोन हजार एकर जमीन सातार्डा, सातोसे, मडुरा येथे संपादित केली आहे. तसेच टाटा मेटॅलिक प्रकल्प रेडी येथे सुरू होता. तो बंद झाल्याने तेथेही जमीन पडून आहे. माजी अर्थमंत्री प्रा. मधु दंडवते यांनी रेडी येथे इस्पात कंपनीचा प्रकल्प सुरू केला होता. तो प्रकल्प बंद झाल्यानंतर तेथे टाटा मेटॅलिक प्रकल्प सुरू झाला. त्यामुळे तोही प्रकल्प बंद झाला. तो प्रकल्प सुरू करण्यासाठी बेरोजगार व टाटा मेटॅलिकमध्ये नोकरी असणाऱ्या लोकांनी सतत प्रयत्न केले. मात्र, प्रकल्प होऊ शकला नाही.रेडी समुद्राच्या जवळ टाटा मेटॅलिक प्रकल्प होता. गोवा, तेरेखोल किल्ला जवळ असणाऱ्या या प्रकल्पामुळे रोजगार निर्माण होत होता. तसेच रेडी, शिरोडा, आरोंदा भागांमध्ये अप्रत्यक्ष व्यवसाय व रोजगाराची दालने खुली झाली होती. मात्र, बंद झालेला प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी आश्वासनापलीकडे फक्त राजकीय चर्चा झाली.

रेडी पोर्ट या सुमारे पाच हजार कोटींच्या ह्यबांधा वापरा आणि हस्तांतरित कराह्ण प्रकल्पाची घोषणा झाली. रेडी पोर्ट खासगी विकासकाकडे हस्तांतरित करण्यात आले. त्यानंतर या विकासकांनी याठिकाणी काय विकास केला व किती लोकांना रोजगार दिला, याचा लेखाजोखा मांडला गेला पाहिजे. प्रत्यक्षात रेडी पोर्ट विकसित झाले नाही. मात्र, शासनाचे मेरिटाईम बोर्ड रेडी पोर्ट खनिज वाहतूक करण्यासाठी चालवित होते. ते खासगी विकासकाकडे गेल्याने निर्यात फायदा झाला.रोजगार निर्माण करणारे प्रकल्पच उभे राहिले नाहीतबांदा, वाफोली याठिकाणी खासगी कंपनीच्या माध्यमातून चष्मा प्रकल्प आणि अन्य प्रकल्प उभे राहणार होते. मात्र, तेही उभे राहू शकले नाहीत. या प्रकल्पांच्या घोषणा आणि चर्चा झाल्या. सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यांमधील नमूद केलेले प्रकल्प उभे राहिले असते तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार होता. मात्र, घोषणाबाजी करून जमिनी संपादित केल्या. प्रत्यक्षात रोजगार निर्माण करणारे प्रकल्प उभे राहिले नाहीत. त्यामुळे तरुणवर्गाला गोवा, मुंबई व अन्य ठिकाणी जावे लागत आहे.जनतेच्या पदरी उपेक्षाचसिंधुदुर्गाने महाराष्ट्रालाच नाही तर देशाला अनेक नेते दिले. मात्र, येथील जनतेच्या पदरात उपेक्षाच आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, दीपक केसरकर, प्रवीण भोसले असे एकापेक्षा एक नेते सध्या कार्यरत आहेत.

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्गgoaगोवा