शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सिंधुदुर्ग : गव्यांकडून शेती, बागायतीचे नुकसान, मडुरा, पाडलोसमधील शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 15:37 IST

मडुरा, पाडलोस परिसरात गव्यांकडून शेती, बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाला याची कल्पना देऊनही पंचनामा करण्यात न आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देगव्यांकडून शेती, बागायतीचे नुकसान, मडुरा, पाडलोसमधील शेतकरी हैराणसिंधुदुर्ग वनविभागाला कल्पना देऊनही पंचनामा न केल्याने नाराजी

बांदा : मडुरा, पाडलोस परिसरात गव्यांकडून शेती, बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाला याची कल्पना देऊनही पंचनामा करण्यात न आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.मडुरा परिसरात आतापर्यंत मगरींची दहशत होती. आता मात्र गव्यांकडूनही शेतकऱ्यांनी मेहनतीने फुलविलेल्या बागायती रातोरात नष्ट करण्यात येत असल्याने शेतकरी आर्थिक मेटाकुटीला आले आहेत.मडुरा परबवाडी, चौवडीवाडी, शेर्लेकरवाडी तसेच पाडलोस भाकरवाडी, केणीवाडा, न्हावेली रेवटेवाडी आदी भागात गव्यांनी वायंगणी शेती, मिरची बागा, चवळी, फजाव, मका आदी पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. याची शेतकऱ्यांनी वनविभागाला कल्पना दिली आहे. तसेच नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांचा वनखात्याने वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.रात्रीच्या वेळी गव्यांकडून शेतीचे नुकसान करण्यात येत आहे. मात्र काहीवेळा हे गवे भर दिवसादेखील शेतात येऊन शेती फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितालादेखील धोका निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांनी नुकसानीची कल्पना वनविभागाला दिली होती. मात्र अद्यापपर्यंत नुकसानीचा पंचनामा करण्यात आलेला नाही. एक आठवडा उलटूनही वनकर्मचारी पंचनाम्यासाठी आले नसल्याचे शेतकरी राजन पंडित यांनी सांगितले.९0 हजारांचे नुकसानमडुरा परबवाडी व चौवडीवाडी येथील राधाबाई वामन परब (चवळी, फजाव), प्रकाश विष्णू मोरजकर (मिरची), राजन यशवंत पंडित (मिरची), प्रकाश यशवंत पंडित (मिरची), राजश्री वामन मोरजकर (मिरची), दीपक सदाशिव घाडी (मिरची), ज्ञानेश पांडुुरंग परब (मिरची) या शेतकऱ्यांचे सुमारे ८0 ते ९0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर पाडलोस केणीवाडा येथील राजन तुकाराम नाईक (भातशेती), प्रशांत अंकुश नाईक (चवळी) यांचेही नुकसान झाले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforestजंगल