शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

सिंधुदुर्ग : गव्यांकडून शेती, बागायतीचे नुकसान, मडुरा, पाडलोसमधील शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 15:37 IST

मडुरा, पाडलोस परिसरात गव्यांकडून शेती, बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाला याची कल्पना देऊनही पंचनामा करण्यात न आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देगव्यांकडून शेती, बागायतीचे नुकसान, मडुरा, पाडलोसमधील शेतकरी हैराणसिंधुदुर्ग वनविभागाला कल्पना देऊनही पंचनामा न केल्याने नाराजी

बांदा : मडुरा, पाडलोस परिसरात गव्यांकडून शेती, बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाला याची कल्पना देऊनही पंचनामा करण्यात न आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.मडुरा परिसरात आतापर्यंत मगरींची दहशत होती. आता मात्र गव्यांकडूनही शेतकऱ्यांनी मेहनतीने फुलविलेल्या बागायती रातोरात नष्ट करण्यात येत असल्याने शेतकरी आर्थिक मेटाकुटीला आले आहेत.मडुरा परबवाडी, चौवडीवाडी, शेर्लेकरवाडी तसेच पाडलोस भाकरवाडी, केणीवाडा, न्हावेली रेवटेवाडी आदी भागात गव्यांनी वायंगणी शेती, मिरची बागा, चवळी, फजाव, मका आदी पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. याची शेतकऱ्यांनी वनविभागाला कल्पना दिली आहे. तसेच नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांचा वनखात्याने वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.रात्रीच्या वेळी गव्यांकडून शेतीचे नुकसान करण्यात येत आहे. मात्र काहीवेळा हे गवे भर दिवसादेखील शेतात येऊन शेती फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितालादेखील धोका निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांनी नुकसानीची कल्पना वनविभागाला दिली होती. मात्र अद्यापपर्यंत नुकसानीचा पंचनामा करण्यात आलेला नाही. एक आठवडा उलटूनही वनकर्मचारी पंचनाम्यासाठी आले नसल्याचे शेतकरी राजन पंडित यांनी सांगितले.९0 हजारांचे नुकसानमडुरा परबवाडी व चौवडीवाडी येथील राधाबाई वामन परब (चवळी, फजाव), प्रकाश विष्णू मोरजकर (मिरची), राजन यशवंत पंडित (मिरची), प्रकाश यशवंत पंडित (मिरची), राजश्री वामन मोरजकर (मिरची), दीपक सदाशिव घाडी (मिरची), ज्ञानेश पांडुुरंग परब (मिरची) या शेतकऱ्यांचे सुमारे ८0 ते ९0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर पाडलोस केणीवाडा येथील राजन तुकाराम नाईक (भातशेती), प्रशांत अंकुश नाईक (चवळी) यांचेही नुकसान झाले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforestजंगल