शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सिंधुदुर्ग : घेराओनंतर सावंतवाडी पालिकेला अखेर वीज कर्मचारी मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 15:09 IST

विद्युत विभागाने जुने नियम दाखवून नगरपालिकेचे विद्युत कर्मचारी काढून घेतले होते. मात्र, या विरोधात नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह नगरसेवक व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विद्युत विभागाचे उपविभागीय अभियंता अमोल राजे यांना शुक्रवारी घेराओ घालत जाब विचारताच पुन्हा वीज कर्मचारी पूर्ववत देण्याचे मान्य करत तसे पत्रही नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना दिले.

ठळक मुद्देघेराओनंतर सावंतवाडी पालिकेला अखेर वीज कर्मचारी मिळालेजाब विचारताच पुन्हा वीज कर्मचारी पूर्ववत देण्याचे मान्य

सावंतवाडी : विद्युत विभागाने जुने नियम दाखवून नगरपालिकेचे विद्युत कर्मचारी काढून घेतले होते. मात्र, या विरोधात नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह नगरसेवक व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विद्युत विभागाचे उपविभागीय अभियंता अमोल राजे यांना शुक्रवारी घेराओ घालत जाब विचारताच पुन्हा वीज कर्मचारी पूर्ववत देण्याचे मान्य करत तसे पत्रही नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना दिले. त्यानंतर हा घेराओ मागे घेण्यात आला.सावंतवाडी विद्युत विभागाने १९८४ चे नियम दाखवून नगरपालिकेला दिलेले दोन वीज कर्मचारी काढून घेतले होते. नगरपालिका शहरवासीयांना विद्युत सुविधा देत असतात, मात्र विद्युत पोलवर चढण्याचे काम विद्युत विभागाचे कर्मचारी म्हणजेच वायरमनचे असते.गेले काही दिवस शहराला वायरमनच नसल्याने अनेक पोलवरील ट्युबलाईट बंद होत्या. त्यामुळे नागरिक चांगलेच आक्रमक होत याबाबत सतत पालिका प्रशासनास जाब विचारत असत. त्यामुळे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेविका अनारोजीन लोबो, शुभांगी सुकी, माधुरी वाडकर, सभापती आनंद नेवगी, मनोज नाईक, बाबू कुडतरकर, माजी नगरसेवक विलास जाधव, शहरप्रमुख शब्बीर मणियार, शुभांगी पारकर, नितीन कारेकर, राजा वाडकर आदींनी मिळून विद्युत विभागाचे उपकार्यकारी अभियंता अमोल राजे यांना घेराओ घालत जाब विचारला. तसेच वीज कर्मचारी प्रथमच काढून घेण्यात आले त्याचे कारण काय, असा सवाल केला.त्यावर उपविभागीय अभियंता राजे यांनी मार्चची कामे असल्याने हे कर्मचारी काढून घेतले. ते आम्ही पूर्वतत देणार असे सांगितले. मात्र नगराध्यक्ष यांनी यापूर्वी कधीच असे झाले नाही. मग आताच का कर्मचारी काढून घेण्यात आले, असा सवाल केला. त्यावर त्यांच्याकडे काही उत्तर नव्हते.यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव तसेच शहरप्रमुख शब्बीर मणियार चांगलेच आक्रमक झाले होते. मात्र, आंदोलनकर्त्यांनी घेतलेले आक्रमक रूप बघून अखेर विद्युत विभागाने तातडीने वीज कर्मचारी पालिकेला देण्यात येतील, असे जाहीर केले. तसेच याबाबतचे लेखी पत्रही पालिकेला दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.आम्हाला आंदोलन करावे लागते हे दुर्दैव : साळगावकरविद्युत विभागाचा कारभार योग्य नाही. ते पोल आणण्यापासून विजेचा मीटर एखाद्याच्या घरात लागेपर्यंत ग्राहकाला पैशांसाठी सोडत नाहीत. मग आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी काय करायचे, असा सवाल करत आम्हाला आंदोलन करावे लागत असेल तर ते दुर्दैव आहे. पण आम्ही शहराच्या हिताचे असेल त्याला प्राधान्य देऊ, असे मत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मांडले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गmahavitaranमहावितरण