शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग :  आचरा, मसुरे, पेंडूर ही व्यापाराची मोठी ठाणी :  विनायक परब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 17:37 IST

आचरा, पेंडूर, मसुरे ही व्यापाराची मोठी ठाणी होती. मध्ययुगात म्हणजे दहाव्या, बाराव्या शतकात ही व्यापार व्यवसायाची केंद्रे होती.

ठळक मुद्दे आचरा, मसुरे, पेंडूर ही व्यापाराची मोठी ठाणी : विनायक परब समजून घेऊया आचरे गावचा इतिहास कार्यक्रम

सिंधुदुर्ग : आचरा, पेंडूर, मसुरे ही व्यापाराची मोठी ठाणी होती. मध्ययुगात म्हणजे दहाव्या, बाराव्या शतकात ही व्यापार व्यवसायाची केंद्रे होती. या भागात राजा राज्य करीत होता. आचऱ्याचे नागरिक व्यापारी होते. त्यांच्याकडे राजाला कर देण्याएवढा पैसा उपलब्ध होता. आचरा बंदरातून विदेशात व्यापार चालत असे. याचे काही पुरावेही हाती लागले आहेत, असे विनायक परब यांनी सांगितले.आचरे गावात तयार होणाऱ्या रानगव्यांच्या शिंगावरील नक्षीकामाच्या कलाकृतीचा वापर विदेशात होत आहे. या नक्षीकामाला जगभरात मागणी आहे, अशी माहितीही परब यांनी दिली. आचरा येथे ह्यसमजून घेऊया आचरे गावचा इतिहासह्ण या कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम श्री देव रामेश्वर वाचन मंदिर व धी आचरा पीपल्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास डेक्कन महाविद्यालय पुणेचे पुरातत्त्व विभागाचे प्राध्यापक डॉ. अभिजीत दांडेकर, अशोक पाडावे, स्कूल कमिटीचे चेअरमन विजय गोखले, आचरा वाचन मंदिरचे श्रीकांत सांबारी, निलिमा सावंत, बाबाजी भिसळे, कपिल गुरव, अरुण पारकर, आचरा हायस्कूलचे मुख्याध्यापक महादेव हाके, सुरेश ठाकूर, सुरेश गावकर, निलेश सरजोशी, विद्यानंद परब आदी उपस्थित होते.आचरा येथील रामेश्वर मंदिर व गाव किती प्राचीन आहे याचे पुरावे मंदिरातच उपलब्ध असल्याची माहिती अभ्यासक विनायक परब यांनी दिली. आचरा येथील रामेश्वर मंदिरात असणारा शिलालेख हा आचरा गावच्या इतिहासाचा उलगडा करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.म्युझियम होण्याची गरज : परबआचरे गावच्या इतिहासाची माहिती देताना विनायक परब म्हणाले, आचरा रामेश्वर मंदिराच्या मागे हजार ते बाराशे वर्षांपूर्वीचे विरगळ २००९ सालापर्यंत अस्तित्वात होते. आता मात्र फक्त तीन विरगळ शिल्लक आहेत. २२ विरगळ आता गायब आहेत. त्यात आचरा गावच्या राजाचाही विरगळ असल्याची माहिती त्यांनी दिली.

२००९ साली आचऱ्याच्या राजाच्या विरगळाचा आपण फोटो काढला होता. त्याची माहिती घेऊन त्यावर शोधनिबंधही लिहिला होता. मात्र तो तेथून गायब करण्यात आला आहे. या विरगळाची जपणूक होऊन म्युझियम होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :historyइतिहासsindhudurgसिंधुदुर्ग