शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

श्रीधर नाईक यांचे विचार आजही प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 18:57 IST

Kankavli Sindhudurg : श्रीधर नाईक यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. त्यामुळे ते विचार आत्मसात करतानाच त्यांचा सामाजिक कार्याचा वारसा युवा पिढीने पुढे नेत समाजातील विकृती नष्ट करावी. तसे झाले तर श्रीधर नाईक यांना तीच खरी आदरांजली ठरेल. असे मत श्रीधर नाईक स्मृती दिन कार्यक्रमात श्रध्दांजली व्यक्त करताना मान्यवरांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देश्रीधर नाईक यांचे विचार आजही प्रेरणादायीकणकवली येथे स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम ; मान्यवरांकडून आदरांजली

कणकवली : श्रीधर नाईक यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. त्यामुळे ते विचार आत्मसात करतानाच त्यांचा सामाजिक कार्याचा वारसा युवा पिढीने पुढे नेत समाजातील विकृती नष्ट करावी. तसे झाले तर श्रीधर नाईक यांना तीच खरी आदरांजली ठरेल. असे मत श्रीधर नाईक स्मृती दिन कार्यक्रमात श्रध्दांजली व्यक्त करताना मान्यवरांनी व्यक्त केले.येथील नरडवे नाका येथे श्रीधर नाईक यांच्या नूतन पुतळ्याचे अनावरण मंगळवारी करण्यात आले. यावेळी श्रीधर नाईक यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत , खासदार विनायक राऊत, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, गौरीशंकर खोत, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर,संजय पडते, काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, काका कुडाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत,विकास कुडाळकर, बाळा भिसे, अतुल रावराणे, कन्हैया पारकर, अबीद नाईक,नगरसेवक सुशांत नाईक, संकेत नाईक आदी उपस्थित होते.यावेळी उदय सामंत म्हणाले, २२ जून हा सिंधुदुर्गच्या राजकारणातला काळा दिवस आहे. या दिवशी श्रीधर नाईक यांची राजकीय हत्या झाली.राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणारे ते नेते होते.दहशती विरोधात लढण्यासाठी कोणी अंगावर आला तर शिंगावर घेण्याचा पायंडा त्यांनी पाडला आहे. दहशतवादी प्रवृत्ती सिंधुदुर्गातून हद्दपार झाली पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी एकसंघ होऊन या प्रवृत्तीविरोधात लढले पाहिजे. श्रीधर नाईक यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या सर्व निवडणुका आपल्याला जिंकाव्या लागतील.विनायक राऊत म्हणाले,काही समाजकंटकांनी श्रीधर नाईक यांची हत्त्या करून जिल्ह्यात दहशत माजविली. त्यामुळे जिल्ह्याचे नाव बदनाम झाले. मात्र,जिल्हयातील जनतेने या अपप्रवृत्ती विरोधात लढा देऊन जिल्ह्यातील दहशत हटविण्याचे काम केले. त्यामुळे जिल्ह्यात आता शांतता पसरली आहे. श्रीधर नाईक यांचे बलिदान व्यर्थ गेलेले नाही. त्यांच्या बलिदानातून अपप्रवृत्ती विरोधात लढण्यासाठी आमच्या सारखे अनेक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते निर्माण झाले.त्यांचा समाजसेवेचा आदर्श घेऊन आपण काम करू तसेच अनाथांना आधार देण्यासाठी श्रीधर नाईक यांच्या नावाने एक ट्रस्ट सुरु करण्याचे आवाहन त्यांनी श्रीधर नाईक प्रेमींना केले.

वैभव नाईक म्हणाले, श्रीधर नाईक यांची हत्या आम्हा कुटुंबियांच्या मनाला चटका लावणारीच होती.त्यांचे विचार नवीन पिढीला आत्मसात व्हावेत यासाठी त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रम आम्ही राबवून त्यांच्या कार्याचा वसा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. यावेळी गौरीशंकर खोत, संदेश पारकर यांनीही मनोगत व्यक्त केले.यापुढेही लढा सुरूच राहील !दहशतवादा विरोधातील आम्ही लढत आलो आहोत. यापुढेही तो लढा सुरू राहील. श्रीधर नाईक यांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देता त्यांचे विचार सर्व दूर पोहचविण्यासाठी आपल्याला पक्षभेद विसरून एकसंघपणे प्रयत्न करावे लागतील. असे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यावेळी म्हणाले.

कणकवली येथील श्रीधर नाईक स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी खासदार विनायक राऊत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

टॅग्स :Kankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक