शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

श्रीधर नाईक यांचे विचार आजही प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 18:57 IST

Kankavli Sindhudurg : श्रीधर नाईक यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. त्यामुळे ते विचार आत्मसात करतानाच त्यांचा सामाजिक कार्याचा वारसा युवा पिढीने पुढे नेत समाजातील विकृती नष्ट करावी. तसे झाले तर श्रीधर नाईक यांना तीच खरी आदरांजली ठरेल. असे मत श्रीधर नाईक स्मृती दिन कार्यक्रमात श्रध्दांजली व्यक्त करताना मान्यवरांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देश्रीधर नाईक यांचे विचार आजही प्रेरणादायीकणकवली येथे स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम ; मान्यवरांकडून आदरांजली

कणकवली : श्रीधर नाईक यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. त्यामुळे ते विचार आत्मसात करतानाच त्यांचा सामाजिक कार्याचा वारसा युवा पिढीने पुढे नेत समाजातील विकृती नष्ट करावी. तसे झाले तर श्रीधर नाईक यांना तीच खरी आदरांजली ठरेल. असे मत श्रीधर नाईक स्मृती दिन कार्यक्रमात श्रध्दांजली व्यक्त करताना मान्यवरांनी व्यक्त केले.येथील नरडवे नाका येथे श्रीधर नाईक यांच्या नूतन पुतळ्याचे अनावरण मंगळवारी करण्यात आले. यावेळी श्रीधर नाईक यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत , खासदार विनायक राऊत, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, गौरीशंकर खोत, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर,संजय पडते, काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, काका कुडाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत,विकास कुडाळकर, बाळा भिसे, अतुल रावराणे, कन्हैया पारकर, अबीद नाईक,नगरसेवक सुशांत नाईक, संकेत नाईक आदी उपस्थित होते.यावेळी उदय सामंत म्हणाले, २२ जून हा सिंधुदुर्गच्या राजकारणातला काळा दिवस आहे. या दिवशी श्रीधर नाईक यांची राजकीय हत्या झाली.राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणारे ते नेते होते.दहशती विरोधात लढण्यासाठी कोणी अंगावर आला तर शिंगावर घेण्याचा पायंडा त्यांनी पाडला आहे. दहशतवादी प्रवृत्ती सिंधुदुर्गातून हद्दपार झाली पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी एकसंघ होऊन या प्रवृत्तीविरोधात लढले पाहिजे. श्रीधर नाईक यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या सर्व निवडणुका आपल्याला जिंकाव्या लागतील.विनायक राऊत म्हणाले,काही समाजकंटकांनी श्रीधर नाईक यांची हत्त्या करून जिल्ह्यात दहशत माजविली. त्यामुळे जिल्ह्याचे नाव बदनाम झाले. मात्र,जिल्हयातील जनतेने या अपप्रवृत्ती विरोधात लढा देऊन जिल्ह्यातील दहशत हटविण्याचे काम केले. त्यामुळे जिल्ह्यात आता शांतता पसरली आहे. श्रीधर नाईक यांचे बलिदान व्यर्थ गेलेले नाही. त्यांच्या बलिदानातून अपप्रवृत्ती विरोधात लढण्यासाठी आमच्या सारखे अनेक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते निर्माण झाले.त्यांचा समाजसेवेचा आदर्श घेऊन आपण काम करू तसेच अनाथांना आधार देण्यासाठी श्रीधर नाईक यांच्या नावाने एक ट्रस्ट सुरु करण्याचे आवाहन त्यांनी श्रीधर नाईक प्रेमींना केले.

वैभव नाईक म्हणाले, श्रीधर नाईक यांची हत्या आम्हा कुटुंबियांच्या मनाला चटका लावणारीच होती.त्यांचे विचार नवीन पिढीला आत्मसात व्हावेत यासाठी त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रम आम्ही राबवून त्यांच्या कार्याचा वसा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. यावेळी गौरीशंकर खोत, संदेश पारकर यांनीही मनोगत व्यक्त केले.यापुढेही लढा सुरूच राहील !दहशतवादा विरोधातील आम्ही लढत आलो आहोत. यापुढेही तो लढा सुरू राहील. श्रीधर नाईक यांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देता त्यांचे विचार सर्व दूर पोहचविण्यासाठी आपल्याला पक्षभेद विसरून एकसंघपणे प्रयत्न करावे लागतील. असे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यावेळी म्हणाले.

कणकवली येथील श्रीधर नाईक स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी खासदार विनायक राऊत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

टॅग्स :Kankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक