शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

एकी दाखवा, अन्यथा काजूचा कांदा व्हायला वेळ लागणार नाही : गणेश हिमगिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 16:41 IST

तळवडे : काजूवरचा व्हॅट कमी केल्याने बाहेरचा काजू मोठ्या प्रमाणात बाजारात आला आहे. याचा फायदा आपल्या काजूला होण्यापेक्षा बाहेरच्या ...

ठळक मुद्देएकी दाखवा, अन्यथा काजूचा कांदा व्हायला वेळ लागणार नाही : गणेश हिमगिरे मळगाव येथील काजू बी जीआय मानांकन कार्यशाळेत प्रतिपादन

तळवडे : काजूवरचा व्हॅट कमी केल्याने बाहेरचा काजू मोठ्या प्रमाणात बाजारात आला आहे. याचा फायदा आपल्या काजूला होण्यापेक्षा बाहेरच्या देशातील काजूला अधिकचा झाला आहे. त्यामुळे आता यापुढे काजू बी जीआय मानांकनासाठी सर्वांनी एकत्रित येऊन लढा दिला तरच ब्रँड तयार होईल. अन्यथा आपल्या काजूची अवस्था कांद्यासारखी होईल, असा इशारा अनेक वस्तंूना जीआय मानांकन मिळवून देणारे सांगली येथील प्रा. गणेश हिमगिरे यांनी दिला आहे.ते मळगाव येथे सिंधुदुर्ग जिल्हा बँक, भगिरथ प्रतिष्ठान व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काजू बी जीआय मानांकन कार्यशाळेत बोलत होते. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संचालक व्हिक्टर डान्टस, प्रमोद कामत, प्रमोद धुरी, गुरूनाथ पेडणेकर, माजी अध्यक्ष गजानन गावडे, डॉ. प्रसाद देवधर, विद्याधर बांदेकर, सुधाकर नेरूरकर, एकनाथ नाडकर्णी, मनीष दळवी आदी उपस्थित होते.हिमगिरे पुढे म्हणाले, काजू उत्पादनाला अधिक किंमत जागतिक बाजारपेठेत मिळवायची असल्यास काजू पिकास जीआय मानांकन प्राप्त करणे आवश्यक आहे. एकजूट ठेवल्यास आपण आपले शेती उत्पादन जागतिक बाजारपेठेत नेऊ शकतो. काजू शेतकऱ्यांची संघटना मजबूत करा. तरच आपण आपले उत्पादन टिकवू शकतो. आज केरळचा काजू परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात होतो. याचे कारण म्हणजे केरळ काजू जीआय मानांकन प्राप्त आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू उत्पादनातून दरवर्षी १२०० ते १३०० कोटी रुपयांची उलाढाल होते. पण कोकणातील शेतकरी जागतिक जीआय मानांकनापासून अनभिज्ञ असल्याने मोठे नुकसान होत असल्याचे ते म्हणाले. या कार्यशाळेचे उद्घाटन गणेश हिमगिरे व सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. हिमगिरे यांचा जिल्हा बँकेमार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी आत्माराम ओटवणेकर, प्रकाश गवस, दादा साईल आदी उपस्थित होते.काजू शेतकऱ्यांना जिल्हा बँकेतर्फे कर्जसतीश सावंत म्हणाले, जीआय मानांकनामुळे आपण आपला काजू जागतिक बाजारपेठेत अधिक दराने विकू शकतो. यासाठी शेतकरीवर्गाने एकजूट दाखविणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू शेतकरीवर्गास जिल्हा बँक प्रति काजू झाड ६०० रुपये कर्ज देण्यात येणार आहे. तर जीआय मानांकन प्राप्त काजू झाडाला ७०० रुपये कर्ज देणार, असे यावेळी सावंत यांनी जाहीर केले. यासाठी नवीन योजना राबविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :foodअन्नsindhudurgसिंधुदुर्ग