शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारत बंदला अल्प प्रतिसाद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 14:45 IST

BharatBand, Kankavli, FarmarStrike, Sindhudurgnews कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी भारत बंदला अल्प प्रतिसाद मिळाला . एसटी , तीन व सहा आसनी रिक्षा वाहतुकीबरोबर जिल्ह्यातील बाजारपेठाही सुरू होत्या .

ठळक मुद्देव्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून बंदला दिला पाठिंबा पोलिसांचा कडक बंदोबस्त

कणकवली : कणकवलीसहसिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी भारत बंदला अल्प प्रतिसाद मिळाला . एसटी , तीन व सहा आसनी रिक्षा वाहतुकीबरोबर जिल्ह्यातील बाजारपेठाही सुरू होत्या . दरम्यान , व्यापारी संघटनेने या भारत बंदला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून आपला व्यवसाय सुरू ठेवला होता . तर मंगळवारी कणकवलीचा आठवडा बाजाराचा 'दिवस' असल्याने बाजारात दैनंदिन लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी होती .देशात शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले आहे . या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात कणकवलीसह सर्वच बाजारपेठांमध्ये बंदला अल्प प्रतिसाद मिळाला आहे . कणकवली बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरू होती . मात्र व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून व्यवसाय चालू ठेवला होता .विविध पक्षांनी नवीन शेतकरी कायद्याच्या विरोधात मंगळवारी "भारत बंद"ची हाक देशवासीयांना दिली होती. मात्र , सिंधुदुर्गासह पर्यटन जिल्ह्याचे ऐतिहासिक प्रवेशद्वार ठरलेल्या फोंडाघाट मध्ये व्यापाऱ्यांनी "भारत बंद" नाकारल्याने बाजारपेठ नेहमीप्रमाणे उत्साहात सुरू होती. त्यामुळे नाक्या-नाक्यावर उलट-सुलट चर्चांना ऊत आला होता . सिंधुदुर्ग भारतात येत नाही का ? येथ पासून हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा कसा आहे ? यावर समर्थक आणि विरोधकांच्या रंगलेल्या गप्पा हा इतर नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय होता.बाजारपेठेतील व्यापारी दुकाने, बँका,पोस्ट,एस् .टी, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू होती. तीन आसनी व सहा आसनी रिक्षा यांची वर्दळ नेहमीप्रमाणे सुरू होती.ओरोस येथील मुख्य चौकात रोजच्या प्रमाणे सर्व हॉटेल्स तसेच इतर दुकाने सुरू होती. शिरगांवसह देवगड तालुक्यातील बाजारपेठेत नेहमीप्रमाणे ग्राहकांची वर्दळ, सर्व व्यापारी अस्थापने, दुकाने सुरू होती . दूध,भाजीपाला मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने बंदचा कोणताही परिणाम जाणवला नाही. जनजीवनही सुरळीत होते. तर एसटी सेवाही नेहमीप्रमाणे सुरू होती.या भारत बंद आंदोलनाला मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटना, जलक्रीडा व्यावसायिक, श्रमिक मच्छीमार संघाने आपला पाठींबा दर्शविला होता.त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ला दर्शन, जलक्रीडा प्रकार बंद ठेवण्यात आले होते . मात्र, मालवणात पर्यटकही मोठ्या संख्येने दाखल झाले होते. त्यांना किल्ले दर्शन व जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटता न आल्याने त्यांचा काहीसा हिरमोड झाला आहे. अनेक पर्यटकानी बंदरजेटी येथून किल्ले सिंधुदुर्गला अभिवादन केले.भारत बंदचा मालवण बाजारपेठेवर कोणताही परिणाम जाणवला नाही. बाजारपेठ गजबजलेली दिसून येत होती. पोलीस प्रशासनानेही प्रमुख नाक्यांवर चोख बंदोबस्त ठेवला होता. नांदगाव, तळेरे, खारेपाटण मध्ये भारत बंदचा कोणताही परिणाम जाणवला नाही. सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. कसाल , कुडाळ , सावंतवाडी , वेंगुर्ला, दोडामार्ग ,वैभववाडी बाजारपेठ येथे नेहमीप्रमाणे सर्व दुकाने सुरु होती. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी बंदला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.प्रबळ शेतकरी संघटना कार्यरत नाही !काही राजकीय पक्ष प्रणित शेतकरी संघटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असल्या तरी त्यांचा म्हणावा तसा प्रभाव जाणवत नाही. त्यामुळे प्रबळ शेतकरी संघटना कार्यरत नसल्याने भारत बंदचा परिणाम जिल्ह्यात जाणवला नाही.कणकवलीत भाजपाकडून कांदे विक्री !भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपाच्यावतीने कणकवलीत ३० रुपये किलो दराने कांदे विक्री करण्यात आली. सध्या बाजारात ६० ते ७० रुपये किलो दराने कांदे विक्री सुरू असताना स्वस्त दराने कांदे मिळत असल्याने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. शेतकरी आपला माल देशभर कुठेही विकू शकतो . हे या कांदे विक्रीतून आम्ही दाखवून दिल्याचे भाजप नेते माजी आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी सांगितले. 

 

 

 

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदKankavliकणकवलीFarmer strikeशेतकरी संपsindhudurgसिंधुदुर्ग