शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना जैतापूरचे फुकुशिमा होऊ देणार नाही..

By admin | Updated: May 28, 2015 00:56 IST

अनंत गीते : जनकल्याण पर्व कार्यक्रम, केंद्र सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा.

रत्नागिरी : सुरक्षिततेच्या मुख्य मुद्द्यावर जैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्प होण्यास शिवसेनेचा प्रखर विरोध आहे. प्रकल्पाचे ठिकाण किनारपट्टीवर असून, दहशतवाद्यांपासूनही संभाव्य धोका आहे. हे क्षेत्र भूकंपप्रवण आहे. त्यामुळे धोका अधिकच वाढला आहे. त्सुनामीचाही धोका नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर येथे हा प्रकल्प उभारायला देऊन जैतापूरचे फुकुशिमा होऊ दिले जाणार नाही, अशी शिवसेनेची स्पष्ट भूमिका असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी पत्रकार परिषदेत दिली. अन्य देश अणुऊर्जा प्रकल्प गुंडाळले असताना आपल्याकडे असे प्रकल्प उभारले जात आहेत. त्याला सेनेचा विरोध असल्याचे ते म्हणाले. पत्रकारपरिषदेपूर्वी सावरकर नाट्यगृहात जनकल्याण पर्व मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेश प्रवक्ते बाळ माने, सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक व सचिन कदम, भाजप जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, आमदार राजन साळवी, रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, विनय नातूू, सेनेच्या जिल्हा महिला आघाडीप्रमुख शिल्पा सुर्वे, अ‍ॅड. बाबा परुळेकर, अ‍ॅड. विलास पाटणे, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, पंचायत समिती सभापती प्रकाश साळवी, उपनगराध्यक्ष संजय साळवी, जिल्हा परिषद सदस्य उदय बने, संजय पुनसकर उपस्थित होते.मोदी सरकारने वर्षभरात पूर्ण केलेल्या कामांबाबत मेळाव्यात गीते यांनी माहिती दिली. मोदी सरकारच्याआधीची दहा वर्षे घोटाळ्याची म्हणून नोंदली गेली. पण, गेल्या वर्षात मोदी सरकारमध्ये एकही घोटाळा झाला नाही.मोदी सरकारने देशात स्वच्छता मोहीम राबवली. सर्वसामान्यांसाठी तीन प्रकारच्या विमा योजना सुुरू केल्या. त्यामुळे गेल्या महिनाभरात देशात विमा सुरक्षेखाली ६ कोटी नवीन खाती उघडली गेली आहेत. सामाजिक सुरक्षा देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. देशातील सर्व बंदरे रेल्वेला जोडली जाणार आहेत. कोकणातील रायगडचे दिघी व रत्नागिरीतील जयगड बंदर रेल्वेने जोडण्याचा निर्णय झाला असून, कार्यवाही सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)साळवींचा भाजपला घरचा आहेरवर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेसाठी अनेक निर्णय घेतले. मात्र, कोकणच्या भवितव्याचा विचार केला नाही. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. भविष्यात जैतापूर प्रकल्पामुळे कोकणाचा होऊ शकणारा विनाश लक्षात घेता हा प्रकल्प रद्द करणे आवश्यक आहे. हा विनाशकारी प्रकल्प करण्याची घोषणा केली जात असताना कोकणात अच्छे दिन कसे काय असू शकतात, असा घरचा आहेर शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी भाजपला जनकल्याण मेळाव्यात बोलताना दिला.उद्योगांना सुविधा निर्माण करून देतानाच रायगड, रत्नागिरी व सिंधुुदुर्ग या तीन जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प उभारले जाणार आहेत. रत्नागिरीत आणखी एक प्रकल्प उभारण्यात येईल. तसेच रेल्वेचा एकतरी कारखाना कोकणात आणावा, अशी मागणी आपण रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे.