शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नियोजन आराखडा निधी कमी होण्यास शिवसेनाच जबाबदार :नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 11:13 IST

शिवसैनिकांना सांगून स्वत:ला वाघ म्हणवून घेणाऱ्या वैभव नाईक यांचे अजितदादांसमोर मांजर कसे झाले? २४० कोटींचा आराखडा ११८ कोटी रुपयांचा मंजूर कसा झाला? या अपयशाला शिवसेनेचे खासदार, पालकमंत्री, आमदार जबाबदार आहेत, असा आरोप भाजपा आमदार नीतेश राणे यांनी कणकवली येथे  केला.

ठळक मुद्दे नियोजन आराखडा निधी कमी होण्यास शिवसेनाच जबाबदारनीतेश राणे यांची टीका, नारायण राणे यांनी मांडलेला मुद्दा खरा ठरला

कणकवली : शिवसैनिकांना सांगून स्वत:ला वाघ म्हणवून घेणाऱ्या वैभव नाईक यांचे अजितदादांसमोर मांजर कसे झाले? २४० कोटींचा आराखडा ११८ कोटी रुपयांचा मंजूर कसा झाला? या अपयशाला शिवसेनेचे खासदार, पालकमंत्री, आमदार जबाबदार आहेत, असा आरोप भाजपा आमदार नीतेश राणे यांनी कणकवली येथे  केला.ते म्हणाले, जिल्हा नियोजनच्या सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या विकासनिधीच्या वक्तव्यांवर बोट ठेवत खासदार नारायण राणे यांनी ४० टक्के अखर्चित निधी असल्याचे लक्षात आणून दिले. त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार यांना मी चांगला ओळखतो.

तुमच्या निधीला निश्चितच कट लागणाऱ, असे त्यांनी सांगितले होते. त्याकडे दुर्लक्ष करीत सत्ताधाऱ्यांनी सभागृहात केवळ वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नियोजनच्या सभेत वैभव नाईक जोरजोराने ओरडून आपण अभ्यासू असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करीत होते. ते या निधीच्या आकडेवारीवरून सपशेल तोंडावर पडले आहेत़.सभागृहात बोलताना पालकमंत्र्यांनी २४० कोटी रुपयेच आणले जातील, असे आश्वासित केले होते़ मात्र, शेवटी अर्थमंत्र्यांनी या शिवसेनेच्या नेत्यांची कुवत ओळखून निधी दिला आहे. जे गेल्यावर्षीचा निधी १०० टक्के खर्च करू शकत नाहीत ते २४० कोटी कुठल्या तोंडाने मागतात? असा प्रश्न अर्थमंत्र्यांनी विचारला. या अपशयाला शिवसेना जबाबदार असल्याचा टोला आमदार राणे यांनी यावेळी लगावला.नारायण राणे पालकमंत्री असताना सातत्याने जिल्हा नियोजनचा आराखडा वाढत गेला. मात्र, उदय सामंत यांच्या सुरुवातीलाच जिल्हा नियोजनचा आराखडा ५० टक्के कपात झाला़ हे सिंधुदुर्गचे मोठे नुकसान आहे. याची जाणीव जनतेला झाली आहे.

शेतकरी व मच्छिमारांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. फसव्या कर्जमाफीमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. या निधीच्या कमतरतेमुळे संपूर्ण व्यवसाय व आर्थिक उलाढालीवर परिणाम होणार असल्याने जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसेल, अशी भीती आमदार राणे यांनी यावेळी व्यक्त केली़

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे