शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या विश्वासघातकीपणामुळे शिवसेनेला दूर जावे लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 13:02 IST

Politics ShivSena Bjp Vinayak Raut shindhudurg- केवळ भाजपच्या विश्वासघातकीपणामुळे शिवसेनेला दूर जावे लागले. अमित शहा ज्या बंद खोलीत चर्चा झाली म्हणतात, ती त्यांच्या दृष्टीने खोली असेल. मात्र, शिवसेना आणि संपूर्ण देशासाठी एका दैवताचे मंदिर आहे, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.

ठळक मुद्देभाजपच्या विश्वासघातकीपणामुळे शिवसेनेला दूर जावे लागले विनायक राऊत यांनी केले स्पष्ट; शहांच्या टीकेला प्रत्युत्तर

सिंधुदुर्गनगरी : केवळ भाजपच्या विश्वासघातकीपणामुळे शिवसेनेला दूर जावे लागले. अमित शहा ज्या बंद खोलीत चर्चा झाली म्हणतात, ती त्यांच्या दृष्टीने खोली असेल. मात्र, शिवसेना आणि संपूर्ण देशासाठी एका दैवताचे मंदिर आहे, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.ते पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, बाळासाहेबांच्या खोलीत ज्या चर्चा झाल्या, त्यांचे साक्षीदार अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि लालकृष्ण अडवाणीही आहेत. त्याच दैवताचा आशीर्वाद नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही लाभला; म्हणूनच तर ते सध्या दिसत आहेत. नाहीतर त्यांचे काय झाले असते हे मी आता सांगू शकत नाही. गोध्रा हत्याकांड प्रकरणात बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पाठीमागे उभे राहिले म्हणूनच ते वाचले, असा गौप्यस्फोटही खासदार राऊत यांनी केला.निवडणूक प्रचारात आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढत आहोत, असे भाजप सांगत होते. त्यावेळी तुम्ही काही बोलला नाहीत असे शहा यांचे म्हणणे आहे, असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, निवडणूक प्रचाराची वेळ एकमेकांना सांभाळून घ्यायची वेळ असते. त्यावेळी भांडायचे नसते. ही निवडणूक शिवसेना-भाजप असे आम्ही एकत्र लढत होतो; त्यामुळे त्यावेळी काही बोललो नाही.आम्ही फसवले नाही. निवडणूक झाल्यानंतर ज्याप्रमाणे भाजपने कृतघ्नता दाखवायला सुरुवात केली; त्यामुळे भाजपला शहाणपण शिकवणे गरजेचे होते. म्हणून आम्ही महाविकास आघाडीचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या पाठीमागून किती वेळा आरत्या फिरवत फिरायचे असा प्रश्न यावेळी खासदार राऊत यांनी करतानाच युती मोडल्याचे दुःख आम्हांला बिलकुल नाही. मात्र, ही युती तोडण्यास भाजप आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आदी कारणीभूत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.शहा-राणेंची युती लाईफ टाईम टिकोराज्यसभेचे खासदार नारायण राणे आणि अमित शहा यांच्यासारख्या समविचारी लोकांची युती झाली आहे. ही युती लाईफटाईम टिकावी अशी अपेक्षा आहे. भाजपकडून खोटारडेपणाचे राजकारण सुरू आहे. केंद्रात जी सत्ता आली आहे, ती निष्ठूरपणे राबवायची, हा त्यांचा एकमेव धंदा आहे. जो विरोधात गेला त्याच्यापाठी ह्यईडीह्ण लावायची, अशी टीकाही खासदार राऊत यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAmit Sadhअमित संधsindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत