शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
2
आधी भारताविरोधात गरळ ओकली; आता PM मोदींच्या स्वागतासाठी मंत्रिमंडळासह मुइझ्झू हजर
3
'तो' अखेरचा व्हिडिओ कॉल, त्यानंतर मृत्यूची बातमी आली; महिला इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू
4
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
5
अनिल अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स विकण्यासाठी रांगा; सर्वांनाच लागलं लोअर सर्किट, गुंतवणूकदारांत भीती
6
"मी आज पुण्याचा खासदार असतो, काँग्रेसचं तिकिट मला फायनल झालं होते, पण..."; वसंत मोरेंचा दावा
7
पहिला श्रावण शुक्रवार: वसुमान योगात 'या' राशींवर होणार लक्ष्मीकृपेची बरसात!
8
Raju Shetti :'५०० एकराची कागदपत्रे त्यांनी द्यावीत, २५ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा'; राजू शेट्टींचे एकनाथ शिंदेंच्या आमदाराला ओपन चॅलेंज
9
मुस्लीम धर्मगुरुंसोबत RSS प्रमुख मोहन भागवतांनी केली चर्चा; ३ तासांच्या बैठकीत काय ठरले?
10
'सैयारा' चित्रपट पाहिला अन् एका गर्लफ्रेंडसाठी दोन तरुण भिडले; तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
11
ऑगस्टमध्ये बँका 'इतके' दिवस बंद राहणार! महत्त्वाचे काम असेल तर लगेच करा, अन्यथा अडचण होईल!
12
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
13
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण
14
मोठी दुर्घटना! राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळले, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, मदतकार्य सुरू
15
झारखंडमधील ACB पथकाने अटक केलेला अमित साळुंखे कोण?; संजय राऊतांचा शिंदे पिता-पुत्रावर खळबळजनक आरोप
16
घटनेच्या उद्देशिकेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द हटवणार का?; केंद्र सरकारने संसदेत दिले उत्तर
17
इलेक्ट्रिक टुव्हीलरनंतर आता थ्री-व्हीलर! 'या' कंपनीने बाजारात उतरवले रिक्षाचे २ मॉडेल्स; किंमत आणि फीचर्स काय?
18
NSDL IPO: बहुप्रतीक्षित एनएसडीएल आयपीओचा प्राईज बँड निश्चित; GMP किती, कधीपासून गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या
19
श्रावण शुक्रवार: नैवेद्याला करा 'कोकोनट मलई खीर'; तांदळाच्या खिरीला खोबऱ्याचा ट्विस्ट!
20
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र सरकारतर्फे अभ्यासक्रम पुरवणार; आशिष शेलारांचे आश्वासन

भाजपच्या विश्वासघातकीपणामुळे शिवसेनेला दूर जावे लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 13:02 IST

Politics ShivSena Bjp Vinayak Raut shindhudurg- केवळ भाजपच्या विश्वासघातकीपणामुळे शिवसेनेला दूर जावे लागले. अमित शहा ज्या बंद खोलीत चर्चा झाली म्हणतात, ती त्यांच्या दृष्टीने खोली असेल. मात्र, शिवसेना आणि संपूर्ण देशासाठी एका दैवताचे मंदिर आहे, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.

ठळक मुद्देभाजपच्या विश्वासघातकीपणामुळे शिवसेनेला दूर जावे लागले विनायक राऊत यांनी केले स्पष्ट; शहांच्या टीकेला प्रत्युत्तर

सिंधुदुर्गनगरी : केवळ भाजपच्या विश्वासघातकीपणामुळे शिवसेनेला दूर जावे लागले. अमित शहा ज्या बंद खोलीत चर्चा झाली म्हणतात, ती त्यांच्या दृष्टीने खोली असेल. मात्र, शिवसेना आणि संपूर्ण देशासाठी एका दैवताचे मंदिर आहे, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.ते पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, बाळासाहेबांच्या खोलीत ज्या चर्चा झाल्या, त्यांचे साक्षीदार अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि लालकृष्ण अडवाणीही आहेत. त्याच दैवताचा आशीर्वाद नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही लाभला; म्हणूनच तर ते सध्या दिसत आहेत. नाहीतर त्यांचे काय झाले असते हे मी आता सांगू शकत नाही. गोध्रा हत्याकांड प्रकरणात बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पाठीमागे उभे राहिले म्हणूनच ते वाचले, असा गौप्यस्फोटही खासदार राऊत यांनी केला.निवडणूक प्रचारात आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढत आहोत, असे भाजप सांगत होते. त्यावेळी तुम्ही काही बोलला नाहीत असे शहा यांचे म्हणणे आहे, असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, निवडणूक प्रचाराची वेळ एकमेकांना सांभाळून घ्यायची वेळ असते. त्यावेळी भांडायचे नसते. ही निवडणूक शिवसेना-भाजप असे आम्ही एकत्र लढत होतो; त्यामुळे त्यावेळी काही बोललो नाही.आम्ही फसवले नाही. निवडणूक झाल्यानंतर ज्याप्रमाणे भाजपने कृतघ्नता दाखवायला सुरुवात केली; त्यामुळे भाजपला शहाणपण शिकवणे गरजेचे होते. म्हणून आम्ही महाविकास आघाडीचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या पाठीमागून किती वेळा आरत्या फिरवत फिरायचे असा प्रश्न यावेळी खासदार राऊत यांनी करतानाच युती मोडल्याचे दुःख आम्हांला बिलकुल नाही. मात्र, ही युती तोडण्यास भाजप आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आदी कारणीभूत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.शहा-राणेंची युती लाईफ टाईम टिकोराज्यसभेचे खासदार नारायण राणे आणि अमित शहा यांच्यासारख्या समविचारी लोकांची युती झाली आहे. ही युती लाईफटाईम टिकावी अशी अपेक्षा आहे. भाजपकडून खोटारडेपणाचे राजकारण सुरू आहे. केंद्रात जी सत्ता आली आहे, ती निष्ठूरपणे राबवायची, हा त्यांचा एकमेव धंदा आहे. जो विरोधात गेला त्याच्यापाठी ह्यईडीह्ण लावायची, अशी टीकाही खासदार राऊत यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAmit Sadhअमित संधsindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत