शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

निवती समुद्रात पर्यटकांची ‘शिडा’ची बोट भरकटली; पोलिसांच्या सतर्कतेमुळे चौघांना वाचविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 22:17 IST

मुंबई ते गोवा असा समुद्रमार्गे प्रवास करीत असताना मुंबई येथील चार पर्यटकांसह शिडाची बोट वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक येथील खोल समुद्रात भरकटली. मालवण पोलीस व सागरी पोलीस समुद्री गस्त घालत असताना त्यांना सुमारे २५ ते ३० वाव खोल समुद्रात बोट असल्याचे निदर्शनास आले.

मालवण : मुंबई ते गोवा असा समुद्रमार्गे प्रवास करीत असताना मुंबई येथील चार पर्यटकांसह शिडाची बोट वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक येथील खोल समुद्रात भरकटली. मालवण पोलीस व सागरी पोलीस समुद्री गस्त घालत असताना त्यांना सुमारे २५ ते ३० वाव खोल समुद्रात बोट असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी आपल्या ताब्यातील ‘अप्सरा’ या गस्तीनौकेच्या सहाय्याने भरकटलेल्या शिडाच्या बोटीला वाचविले. या बोटीतील इंधन संपल्याने तसेच समुद्रात वादळी वा-याची स्थिती असल्याने बोट भरकटल्याचे पर्यटकांनी सांगितले. हा प्रकार सोमवारी सकाळी १०.३० वाजता घडला.मुंबई येथील चार सहका-यांच्या चमूने ५ आॅक्टोबर रोजी पर्यटनासाठी गोव्याला जाण्याचा बेत आखला. मुंबई ते गोवा असा त्यांचा प्रवास ५ तारीखपासून शिडाच्या बोटीच्या सहाय्याने सुरू झाला. मात्र सध्या पश्चिम किनारपट्टीवर वादळी वा-यासह पावसाचे वातावरण असल्याने या पर्यटकांना समुद्रातून मार्गक्रमण करत असताना वेळोवेळी ‘आपण भरकटणार’ याची प्रचिती येत होती. सोमवारी सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक  समुद्रापासून सुमारे २५ वाव खोल समुद्रात त्यांची सुनीता नामक शिडाची बोट भरकटली. यात त्यांच्या बोटीतील इंधन (पेट्रोल) संपल्याने मिलिंद प्रभू, हेमंत आरोंदेकर, किरीट मगनलाल, जयदास चुनेकर हे चौघे पर्यटक काहीकाळ मृत्यूच्या दाढेत होते. पोलीस बनले देवदूतमालवण येथून सागरी पोलीस व मालवण पोलीस स्थानकाच्या पोलिसांचे समुद्रात ‘अप्सरा’ या गस्तीनौकेतून सकाळी ९ वाजता पेट्रोलिंग सुरू होते. यावेळी पोलिसांना निवती समुद्राच्या दिशेने खोल समुद्रात संशयास्पद बोट असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी बोटीपर्यंत जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला, तेव्हा पर्यटनासाठी पर्यटक आल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी बोटीचे इंधन संपले असल्याने आपण समुद्रात भरकटल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी भर समुद्रात माणुसकीचे दर्शन घडवत त्यातील दोन पर्यटकांना वेंगुर्ले किनारी आणून त्यांना पुढील प्रवासासाठी इंधन उपलब्ध करून दिले. त्यामुळे मृत्यूच्या दाढेत असणाºया या चार पर्यटकांसाठी मालवण पोलीस जणू देवदूतच बनले. समुद्री गस्ती पथकात असणाºया पोलीस उपनिरीक्षक ए. बी. साठे, एस. पी. खांदारे, पी. डी. टेकाळे, पोलीस उपनिरीक्षक विलास तोरसकर, के. ई. कुमठेकर, झेड. एच. शिरगावकर, आशिष भाबल, महादेव साबळे यांच्या कामाचे पोलीस प्रशासन तसेच नागरिकांकडून कौतुक होत आहे.पर्यटक गोव्याच्या दिशेने रवानापोलिसांनी पर्यटकांना पुढील गोवा प्रवासासाठी इंधनाची सोय करून दिल्यानंतर ‘त्या’ चारही पर्यटकांनी पोलिसांचे आभार मानले. आमच्यासाठी तुम्ही देवदूत ठरलात. आमच्या बोटीतील इंधन संपले तसेच समुद्रातही हवामान खराब असल्याने बोट भरकटल्याचे आम्हांला समजले. मात्र कोणाशीही संपर्क होत नसल्याने आम्ही खूप घाबरलो होती. त्यावेळी एवढ्या खोल समुद्रात तुम्ही दाखविलेले माणुसकीचे दर्शन कधीच विसरणार नाही, असे सांगत ते पर्यटक भावनाविवश झाले. त्यानंतर पोलिसांनी वेंगुर्ले बंदर येथून त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी गोव्याच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. 

टॅग्स :Policeपोलिस