शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसप्रश्नी शरद पवारांचा पुढाकार, रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार

By अनंत खं.जाधव | Updated: June 23, 2023 17:43 IST

सावंतवाडी - मळगाव येथे रेल्वे टर्मिनस मंजूर झाले. त्याचे काम काही अंशी झाले. परंतु त्यानंतर या कामाला पुढे गती मिळालेली नाही.

सावंतवाडी : रखडलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या प्रश्नात आपण लक्ष घालू असे आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. याबाबत ते दिल्लीत रेल्वेमंत्र्यांशी २६ जूनला चर्चा करणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा म्हणून मला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आली असल्याची माहिती अर्चना घारे-परब यांनी दिली. यावेळी नियोजित बांदा-संकेश्वर महामार्ग सावंतवाडी शहरातून जाण्यासाठी पवार यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले. सावंतवाडी - मळगाव येथे रेल्वे टर्मिनस मंजूर झाले. त्याचे काम काही अंशी झाले. परंतु त्यानंतर या कामाला पुढे गती मिळालेली नाही. यातील बरेचसे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे टर्मिनस मंजूर असूनही कोणताही फायदा सावंतवाडीला झालेला नाही. वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. त्यावेळी सावंतवाडीत वंदे भारतला थांबा देण्याची मागणी करण्यात आली.या पार्श्वभूमीवर घारे - परब यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून हा प्रश्न पक्षाध्यक्ष पवार यांच्याकडे मांडला. त्यावेळी हा प्रश्न सोडविणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांना दिल्लीत पाचारण केले आहे. येत्या २६ जूनला दिल्लीत याबाबत बैठक होणार आहे. त्यासाठी खासदार विनायक राऊत यांनाही बोलावण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही दोघे तसेच पक्षातील महत्वाचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, असे घारे यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गrailwayरेल्वेSharad Pawarशरद पवार