शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

अभूतपूर्व उत्साहात शिक्षक परिषदेचे अधिवेशन

By admin | Updated: February 10, 2015 00:27 IST

महत्त्वपूर्ण चर्चा : रामनाथ मोते यांच्या उपस्थितीत शिक्षकांना मार्गदर्शन

वाटुळ : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कोकण विभागाचे द्वैवार्षिक अधिवेशन चिपळूण येथे युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनामध्ये माजी आमदार अशोक मोडक, नीता माळी, कवीवर्य प्रा. अशोक बागवे, माजी शिक्षक आमदार भगवान साळुंखे, कोकण विभागाचे शिक्षक आमदार रामनाथ मोते अशा मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले.अधिवेशनाला पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. अधिवेशनाचे उद्घाटन मोडक, संयोजक गंगाराम इदाते यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ‘संघटनेचा कार्यकर्ता कसा असावा’ या विषयावर मोडक यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये मुंबई येथील लेखीका नीता माळी यांनी ‘शिक्षकांची उपक्रमशिलता’ या विषयावर बहुविध उदाहरणासह उपस्थितांना मार्गदर्शन केले.या अधिवेशनाचे उद्घाटक माजी आमदार विनय नातू स्वागताध्यक्ष माधव गवळी, शिक्षक आमदार मोते, शिक्षणाधिकारी राजेंद्र अहिरे यांचे ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चाचे यांच्या उपस्थितांमध्ये जिल्हा गुणगौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रांत अध्यक्ष वेणूनाथ कडू, कोकण विभाग अध्यक्ष शंकर मोरे, कार्यवाह सुधाकर तावडे, सहकार्यवाह रवींद्र इनामदार, जिल्हा अध्यक्ष रमेश जाधव, बागवे, माळी संयोजक इदाते उपस्थित होते. गुणगौरव सोहळ्याचे सूत्रसंचालन आनंद त्रिपाठी यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विनय नातू यांनी या उपक्रमांचे कौतुक करीत शासनाने माध्यमिक शिक्षकांनाही पुरस्कार द्यावेत, यासाठी आपण आग्रही राहणार असल्याचे अभिवचन दिले.गुणगौरव सोहळ्यानंतरचे सत्र खऱ्या अर्थाने गाजविले, ते प्रख्यात कवीवर्य प्रा. बागवे यांच्या अमोघ वक्तृत्त्वाने. आपल्या दीड तासाच्या मार्गदर्शनामध्ये प्रचंड हास्यविनोद करत शिक्षकाना खिळवून ठेवले. बागवे यांची व्याख्याने उपस्थित कार्यकर्त्यांसाठी खास पर्वणी ठरली. शिक्षकांच्या पेन्शन समस्या या विषयावर ठाणे येथील व्यक्तीमत्त्व खेमानी यांनी मार्गदर्शन केले. संमेलनाच्या अंतिम सत्रामध्ये मोते यांनी शंका-समाधान या खुल्या चर्चा सत्रामध्ये शिक्षकांच्या अनेक समस्यांवर मार्गदर्शन केले. सध्या राज्यात शासकीय अधिकारीच शासन चालवत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विद्यमान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना शिक्षकांच्या समस्यांची चांगली माहिती असून अल्पावधीतच संचमान्यता, अतिरिक्त शिक्षक, शिक्षण सेवकांची सेवा यावर ठोस निर्णय होणार असल्याचे सांगितले.दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनाची सांगता मोते यांच्या मार्गदर्शनाने झाली. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी संयोजक इदाते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षक परिषद, चिपळूण तालुका कार्यकारिणीने विशेष मेहनत घेतली. जिल्हा कार्यवाह राधाकृष्ण जोशी यांनी आभार मानले. या अधिवेशनात राज्यभरातून शिक्षक प्रतिनिधी, नेतेमंडळी चिपळुणात दाखळ झाली होती. शिबिराचे संयोजन उत्तम होते. (वार्ताहर)