शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

अभूतपूर्व उत्साहात शिक्षक परिषदेचे अधिवेशन

By admin | Updated: February 10, 2015 00:27 IST

महत्त्वपूर्ण चर्चा : रामनाथ मोते यांच्या उपस्थितीत शिक्षकांना मार्गदर्शन

वाटुळ : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कोकण विभागाचे द्वैवार्षिक अधिवेशन चिपळूण येथे युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनामध्ये माजी आमदार अशोक मोडक, नीता माळी, कवीवर्य प्रा. अशोक बागवे, माजी शिक्षक आमदार भगवान साळुंखे, कोकण विभागाचे शिक्षक आमदार रामनाथ मोते अशा मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले.अधिवेशनाला पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. अधिवेशनाचे उद्घाटन मोडक, संयोजक गंगाराम इदाते यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ‘संघटनेचा कार्यकर्ता कसा असावा’ या विषयावर मोडक यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये मुंबई येथील लेखीका नीता माळी यांनी ‘शिक्षकांची उपक्रमशिलता’ या विषयावर बहुविध उदाहरणासह उपस्थितांना मार्गदर्शन केले.या अधिवेशनाचे उद्घाटक माजी आमदार विनय नातू स्वागताध्यक्ष माधव गवळी, शिक्षक आमदार मोते, शिक्षणाधिकारी राजेंद्र अहिरे यांचे ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चाचे यांच्या उपस्थितांमध्ये जिल्हा गुणगौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रांत अध्यक्ष वेणूनाथ कडू, कोकण विभाग अध्यक्ष शंकर मोरे, कार्यवाह सुधाकर तावडे, सहकार्यवाह रवींद्र इनामदार, जिल्हा अध्यक्ष रमेश जाधव, बागवे, माळी संयोजक इदाते उपस्थित होते. गुणगौरव सोहळ्याचे सूत्रसंचालन आनंद त्रिपाठी यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विनय नातू यांनी या उपक्रमांचे कौतुक करीत शासनाने माध्यमिक शिक्षकांनाही पुरस्कार द्यावेत, यासाठी आपण आग्रही राहणार असल्याचे अभिवचन दिले.गुणगौरव सोहळ्यानंतरचे सत्र खऱ्या अर्थाने गाजविले, ते प्रख्यात कवीवर्य प्रा. बागवे यांच्या अमोघ वक्तृत्त्वाने. आपल्या दीड तासाच्या मार्गदर्शनामध्ये प्रचंड हास्यविनोद करत शिक्षकाना खिळवून ठेवले. बागवे यांची व्याख्याने उपस्थित कार्यकर्त्यांसाठी खास पर्वणी ठरली. शिक्षकांच्या पेन्शन समस्या या विषयावर ठाणे येथील व्यक्तीमत्त्व खेमानी यांनी मार्गदर्शन केले. संमेलनाच्या अंतिम सत्रामध्ये मोते यांनी शंका-समाधान या खुल्या चर्चा सत्रामध्ये शिक्षकांच्या अनेक समस्यांवर मार्गदर्शन केले. सध्या राज्यात शासकीय अधिकारीच शासन चालवत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विद्यमान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना शिक्षकांच्या समस्यांची चांगली माहिती असून अल्पावधीतच संचमान्यता, अतिरिक्त शिक्षक, शिक्षण सेवकांची सेवा यावर ठोस निर्णय होणार असल्याचे सांगितले.दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनाची सांगता मोते यांच्या मार्गदर्शनाने झाली. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी संयोजक इदाते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षक परिषद, चिपळूण तालुका कार्यकारिणीने विशेष मेहनत घेतली. जिल्हा कार्यवाह राधाकृष्ण जोशी यांनी आभार मानले. या अधिवेशनात राज्यभरातून शिक्षक प्रतिनिधी, नेतेमंडळी चिपळुणात दाखळ झाली होती. शिबिराचे संयोजन उत्तम होते. (वार्ताहर)