शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

वरिष्ठ नेत्यांमुळे भाजपचा पराभव? रवींद्र चव्हाण यांच्या विधानाची कणकवलीत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 18:24 IST

चिंतन बैठकीत कणकवलीतील पराभवावर चर्चा

कणकवली : वरिष्ठ नेते कमी पडल्यानं कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागल्याचं राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मान्य केल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. कणकवली शहरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या चिंतन बैठकीत चव्हाण यांनी 'वरिष्ठ नेत्यांना पराभव पत्करावा लागला', असं म्हटल्याची जोरदार चर्चा आहे. याशिवाय त्यांनी कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याचा नारा दिला. वरिष्ठ स्तरावरून कार्यकर्त्यांना बळ देण्यात येईल. पराभवानं खचून न जाता पुढील निवडणुकीसाठी आतापासूनच कामाला लागा, अशा सूचना रवींद्र चव्हाण यांनी केल्याचं समजतं. भाजपचे १०० कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली व माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी या बैठकीला दांडी मारली. त्यामुळे भाजपमध्ये एकी नसल्याचे दिसून आले. या बैठकीत पराभवाबद्दल आत्मचिंतन करण्यात आलं. चार प्रभागांमध्ये शिवसेनेशी झालेली मैत्रीपूर्ण लढत अंगलट आल्यामुळे पुढील निवडणुकीत कुबड्या नकोच असा सूर बैठकीत उमटला. शिवसेनेच्या कुरबुरी सांगू नका, तर आलेले अनुभव उराशी बाळगून मार्गक्रमण करा, यश नक्कीच मिळेल असा विश्वास चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला. भाजपने अनेक पराभव पचवले आहेत. पण भाजप कधीच डळमळला नाही. त्याच ताठ मानेने भाजपने केंद्रात व राज्यातही मुसंडी मारली. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यानं न डगमगता पुढील निवडणुकीला धैर्याने सामोरे जा, अशा सूचना चव्हाण यांनी केल्या. संदेश पारकर यांचा फक्त ३७ मतांनी पराभव झाला. पारकर यांना ऐन निवडणुकीत रिंगणात उतरवलं. तरीही त्यांनी चांगली कामगिरी केली. संदेश पारकर यांनी जिद्दीनं रणांगणात उतरून शत्रूच्या तोंडाला फेस आणला, असं म्हणत चव्हाण यांनी  पारकर यांचं कौतुक केलं. 

टॅग्स :BJPभाजपा