शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

वरिष्ठ नेत्यांमुळे भाजपचा पराभव? रवींद्र चव्हाण यांच्या विधानाची कणकवलीत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 18:24 IST

चिंतन बैठकीत कणकवलीतील पराभवावर चर्चा

कणकवली : वरिष्ठ नेते कमी पडल्यानं कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागल्याचं राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मान्य केल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. कणकवली शहरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या चिंतन बैठकीत चव्हाण यांनी 'वरिष्ठ नेत्यांना पराभव पत्करावा लागला', असं म्हटल्याची जोरदार चर्चा आहे. याशिवाय त्यांनी कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याचा नारा दिला. वरिष्ठ स्तरावरून कार्यकर्त्यांना बळ देण्यात येईल. पराभवानं खचून न जाता पुढील निवडणुकीसाठी आतापासूनच कामाला लागा, अशा सूचना रवींद्र चव्हाण यांनी केल्याचं समजतं. भाजपचे १०० कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली व माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी या बैठकीला दांडी मारली. त्यामुळे भाजपमध्ये एकी नसल्याचे दिसून आले. या बैठकीत पराभवाबद्दल आत्मचिंतन करण्यात आलं. चार प्रभागांमध्ये शिवसेनेशी झालेली मैत्रीपूर्ण लढत अंगलट आल्यामुळे पुढील निवडणुकीत कुबड्या नकोच असा सूर बैठकीत उमटला. शिवसेनेच्या कुरबुरी सांगू नका, तर आलेले अनुभव उराशी बाळगून मार्गक्रमण करा, यश नक्कीच मिळेल असा विश्वास चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला. भाजपने अनेक पराभव पचवले आहेत. पण भाजप कधीच डळमळला नाही. त्याच ताठ मानेने भाजपने केंद्रात व राज्यातही मुसंडी मारली. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यानं न डगमगता पुढील निवडणुकीला धैर्याने सामोरे जा, अशा सूचना चव्हाण यांनी केल्या. संदेश पारकर यांचा फक्त ३७ मतांनी पराभव झाला. पारकर यांना ऐन निवडणुकीत रिंगणात उतरवलं. तरीही त्यांनी चांगली कामगिरी केली. संदेश पारकर यांनी जिद्दीनं रणांगणात उतरून शत्रूच्या तोंडाला फेस आणला, असं म्हणत चव्हाण यांनी  पारकर यांचं कौतुक केलं. 

टॅग्स :BJPभाजपा