शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वरिष्ठ नेत्यांमुळे भाजपचा पराभव? रवींद्र चव्हाण यांच्या विधानाची कणकवलीत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 18:24 IST

चिंतन बैठकीत कणकवलीतील पराभवावर चर्चा

कणकवली : वरिष्ठ नेते कमी पडल्यानं कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागल्याचं राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मान्य केल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. कणकवली शहरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या चिंतन बैठकीत चव्हाण यांनी 'वरिष्ठ नेत्यांना पराभव पत्करावा लागला', असं म्हटल्याची जोरदार चर्चा आहे. याशिवाय त्यांनी कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याचा नारा दिला. वरिष्ठ स्तरावरून कार्यकर्त्यांना बळ देण्यात येईल. पराभवानं खचून न जाता पुढील निवडणुकीसाठी आतापासूनच कामाला लागा, अशा सूचना रवींद्र चव्हाण यांनी केल्याचं समजतं. भाजपचे १०० कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली व माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी या बैठकीला दांडी मारली. त्यामुळे भाजपमध्ये एकी नसल्याचे दिसून आले. या बैठकीत पराभवाबद्दल आत्मचिंतन करण्यात आलं. चार प्रभागांमध्ये शिवसेनेशी झालेली मैत्रीपूर्ण लढत अंगलट आल्यामुळे पुढील निवडणुकीत कुबड्या नकोच असा सूर बैठकीत उमटला. शिवसेनेच्या कुरबुरी सांगू नका, तर आलेले अनुभव उराशी बाळगून मार्गक्रमण करा, यश नक्कीच मिळेल असा विश्वास चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला. भाजपने अनेक पराभव पचवले आहेत. पण भाजप कधीच डळमळला नाही. त्याच ताठ मानेने भाजपने केंद्रात व राज्यातही मुसंडी मारली. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यानं न डगमगता पुढील निवडणुकीला धैर्याने सामोरे जा, अशा सूचना चव्हाण यांनी केल्या. संदेश पारकर यांचा फक्त ३७ मतांनी पराभव झाला. पारकर यांना ऐन निवडणुकीत रिंगणात उतरवलं. तरीही त्यांनी चांगली कामगिरी केली. संदेश पारकर यांनी जिद्दीनं रणांगणात उतरून शत्रूच्या तोंडाला फेस आणला, असं म्हणत चव्हाण यांनी  पारकर यांचं कौतुक केलं. 

टॅग्स :BJPभाजपा