शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्रसाद लोके खून प्रकरण तपास सीआयडीकडे द्या, संदेश पारकर यांनी केली मागणी

By सुधीर राणे | Updated: September 27, 2023 13:23 IST

कणकवली: मिठबाव येथील प्रसाद लोके याचा निर्घृण खून आणि त्याची पत्नी मनवा लोके यांची आत्महत्या या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा ...

कणकवली: मिठबाव येथील प्रसाद लोके याचा निर्घृण खून आणि त्याची पत्नी मनवा लोके यांची आत्महत्या या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा, अशी स्थानिक जनतेची आग्रही मागणी आहे. शिवसेना स्थानिक जनतेच्या भावनांशी सहमत आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा अशी शिवसेनेचीही मागणी आहे. ती पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरात पोलिस यंत्रणा कमालीची अकार्यक्षम झाली आहे. शिवसेना या संदर्भात सातत्याने आवाज उठवीत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या खात्यावरील पकड ढिली झाली आहे. हे भाजपच्या माजी आमदार यांनी मोर्चात सहभागी होत सिद्ध केले आहे. प्रसाद लोके प्रकरणात स्थानिक पोलिसांच्या कारभारावर भाजपच्याच स्थानिक आमदारांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. हे प्रकरण सीआयडीकडे देण्याची मागणी केली आहे. यावरून भाजपच्या अखत्यारीतील पोलिस यंत्रणेवर भाजपच्याच लोकप्रतिनिधींचा विश्वास राहिलेला नाही, हेच सिद्ध होते. आरोपीने वैद्यकीय कारणांची ढाल समोर केली आहे. स्थानिक पोलिस यासंदर्भात ठोस माहिती देण्यास कुचराई करीत आहेत. जर आरोपीची प्रकृती ठीक नसेल तर तो एवढी मोठी हत्या एकटा कसा काय करू शकतो? याप्रकरणी अन्य काही आरोपी असल्याचा पोलिसांनाही संशय आहे, मग त्यांच्यापर्यंत आतापर्यंत पोलिस का पोहोचू शकत नाहीत? स्थानिक पोलिस या प्रकरणाचा तपास करण्यास सक्षम नसल्याचा स्थानिक जनतेचा आरोप आहे.

स्थानिकांच्या सोबत राहणे हा शिवसेनेचा धर्म आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करावे. तसेच आरोपीला कठोरात कठोर शासन करण्यासाठी प्रयत्न करावेत. तपासात दिरंगाई अथवा ढिलाई आढळून आल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संदेश पारकर यांनी दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस