शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

गणेश चतुर्थीपूर्वी मुंबई-गोवा महामार्ग सुरक्षीत करा, पत्रकार संघाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 16:26 IST

भविष्यात खड्यांमुळे पुल कोसळून फार मोठी जीवीतहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीपूर्वी मुुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीस सुरक्षीत करा, अशी मागणी कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने प्रांताधिकारी तथा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या सक्षम प्राधिकारी नीता सावंत-शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देगणेश चतुर्थीपूर्वी मुंबई-गोवा महामार्ग सुरक्षीत कराकणकवली तालुका पत्रकार संघाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदनसंयुक्त पाहणीची केली मागणी

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होत असताना मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्याचबरोबर ब्रिटीश कालीन पुलांचे कोसळलेले कठडे व भलेमोेठे पडलेले खड्डे धोकादायक बनले आहेत.

भविष्यात खड्यांमुळे पुल कोसळून फार मोठी जीवीतहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीपूर्वी मुुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीस सुरक्षीत करा, अशी मागणी कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने प्रांताधिकारी तथा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या सक्षम प्राधिकारी नीता सावंत-शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी निता सावंत-शिंदे यांची सोमवारी भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, जिल्हा पत्रकार संघाचे सचिव गणेश जेठे, उपाध्यक्ष अशोक करंबेळकर, तालुकाध्यक्ष भगवान लोके, सचिव नितीन सावंत, खजिनदार माणिक सावंत, माजी अध्यक्ष संतोष राऊळ, रमेश जोगळे, अजित सावंत, जिल्हा कार्यकारणी सदस्य राजेश सरकारे, मोहन पडवळ, सुधीर राणे, तुषार सावंत, स्वप्नील वरवडेकर, प्रदीप भोवड, संजय राणे, अनिकेत उचले, पंढरीनाथ गुरव, तुळशीदास कुडतरकर, संजय बाणे, भास्कर रासम आदींसह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.मुंबई-गोवा महामार्गाचे काम करत असताना खारेपाटण ते ओसरगाव या ५७ किमीच्या कार्यक्षेत्रात अत्यंत धोकादायक खड्डे पडले आहेत. महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.महामार्गावर पडलेले जीवघेणे खड्डे, गडनदी पुल, जानवली पुल, बेळणे पुल, पियाळी पुल, कसाल पुल यासह अन्य पुलांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.या खड्यांमुळे दिवसेंदिवस ही ब्रिटीशकालीन पुले कमकुवत होत चालली आहेत. जीवघेण्या खड्यांमधून प्रवास करताना वाहनाची हानी व चालकांना, प्रवाशांना मान, मनका, कंबर दुखी यासारखे आजार जडत आहेत. या समस्येबाबत गणेश चतुर्थीपूर्वी तोडगा काढण्यासाठी संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी, काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे अधिकारी असा संयुक्त निरीक्षण दौरा करून या समस्येवर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी भगवान लोके यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली.त्यावर प्रांताधिकारी नीता सावंत-शिंदे यांनी महामार्गाच्या दुरावस्थेबाबत येत्या कालावधीत दुरूस्तीसाठी संबंधित यंत्रणेला सूचना ताबडतोब करण्यात येतील़ तसेच संयुक्त पाहणी दौरा संबंधित यंत्रणेसोबत करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी शिष्टमंडळातील ज्येष्ठ पत्रकारांनी महामार्गाच्या समस्यांबाबत अनेक ठिकाणी असलेल्या दुरावस्थेची परिपुर्ण माहिती प्रांताधिकाऱ्यांना दिली. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवsindhudurgसिंधुदुर्गreporterवार्ताहर