शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

देवगड तालुक्यातील कट्टा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 16:36 IST

देवगड तालुक्यातील कालवी-कट्टा येथील परिसरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत गेल्या चार दिवसांत एक गाय, एक वासरू व एक बैल अशी तीन जनावरे त्याने फस्त केली असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे या परिसरामध्ये बिबट्याच्या भितीमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

ठळक मुद्देकालवी-कट्टा परिसरामध्ये गेले चार दिवस बिबट्याचे वास्तव्यपरिसरामध्ये बिबट्याच्या भितीमुळे दहशतीचे वातावरण बिबट्याचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थांतून मागणी

देवगड : तालुक्यातील कालवी-कट्टा येथील परिसरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत गेल्या चार दिवसांत एक गाय, एक वासरू व एक बैल अशी तीन जनावरे त्याने फस्त केली असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे या परिसरामध्ये बिबट्याच्या भितीमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

कालवी-कट्टा परिसरामध्ये गेले चार दिवस बिबट्याचे वास्तव्य असून सायंकाळी गुरे चरून आल्यानंतर बिबट्याने या जनावरांना मारल्याचे समजते. यात श्रीजीत मराठे यांची ४ वर्षांची गाय, प्रमोद जावकर यांचे ३ वर्षांचे वासरू यांना या बिबट्याने मारले असून त्यानंतर कट्टा येथील एका बैलाला मारल्याची घटना घडली आहे. 

मृत जनावरांचा वनविभागामार्फत रितसर पंचनामा करण्यात आला असून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याकरिता आवश्यक ती कार्यवाही वनविभागामार्फत न झाल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. रविवारी सकाळी हा बिबट्या ग्रामस्थांना कट्टा परिसरामध्ये दिसून आला असून वनविभागाने त्याचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी, ग्रामस्थांतून होत आहे.

 

टॅग्स :Tigerवाघsindhudurgसिंधुदुर्ग